शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस विधिमंडळ पक्ष विलीन झाला, मूळ पक्ष नाही; ८ आमदारांविरुद्ध अपात्रता याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2024 09:02 IST

काँग्रेस मूळ पक्ष भाजपात विलीन झालेला नाही तर काँग्रेस विधिमंडळ पक्ष विलीन झाल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे, असे निरीक्षण सभापतींनी याचिका फेटाळताना नोंदविले. 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: काँग्रेस मूळ पक्ष भाजपात विलीन झालेला नाही तर काँग्रेस विधिमंडळ पक्ष विलीन झाल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे, असे सभापती रमेश तवडकर यांनी डॉम्निक नोरोन्हा यांची आठ आमदारांविरुद्धची याचिका फेटाळताना निरीक्षण नोंदविले आहे. 

भारतीय घटनेच्या १०व्या परिशिष्टातील तरतुदींनुसार मूळ राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या दोन वेगळ्या घटनात्मक व्यवस्था आहेत. त्यामुळे मूळ काँग्रेस पक्ष भाजपमध्ये विलीन झाला, असे म्हणता येणार नाही. तसेच काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे गोव्यातील काँग्रेसचे विलीनीकरण होऊ शकत नाही, या याचिकादाराच्या मुद्द्यातही तथ्य आहे. परंतु विलीनीकरण हे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे झाले आहे. हे विलीनीकरण कायदेशीर झाले आहे का? हाच मुद्दा या ठिकाणी तपासणे आवश्यक आहे, असे सभापतींनी निवाड्यात म्हटले आहे.

११ आमदारांपैकी आठ आमदारांनी विरोधी पक्षनेत्याच्या चेंबरमध्ये विलीनीकरणाचा घेतलेला निर्णय हा दोन तृतीयांश बहुमताने घेण्यात आला आहे. त्यामुळे हे विलीनीकरण अवैध ठरविता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे. पक्षाच्या मताशी बहुतांश सदस्य जर सहमत नसतील तर त्यांना वेगळा विचार करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ते अपात्र ठरू शकत नाहीत, असेही निवाड्यात म्हटले आहे.

'सभापतींनी आपला रंग दाखवला' 

आजच्या निकालाने सभापतींनी आपला रंग दाखवायला सुरुवात केली आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे. काँग्रेस पक्षातर्फे आठ फुटीर आमदारांविरुद्ध माझीही अपात्रता याचिका सभापतींसमोर दीर्घकाळ प्रलंबित आहे. मला आशा आहे आणि माझ्या याचिकेवर लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल.

'निवाडा अपेक्षितच होता' 

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हा निवाडा अपेक्षितच होता, असे म्हटले आहे. फुटीर आमदारांना संरक्षण देण्यासाठी अपात्रता याचिका फेटाळली जाणार हे मला ठाऊकच होते. कारण फुटीर वजा केले, तर भाजप कुठेच राहणार नाही. भाजपने लोकशाहीचा अंत केला. सभापतींनी टाळाटाळ करून दोन वर्षे ही याचिका रखडवली व आता लोकशाहीची थट्टा केल्याचेही ते म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस