शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
3
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
4
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
5
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
6
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
7
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
8
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
9
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
10
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
11
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
12
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
13
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
14
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
15
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
16
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
17
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
18
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
19
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
20
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस

‘ईव्हीएम’बाबत संभ्रम

By admin | Updated: March 9, 2017 02:16 IST

पणजी : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत घोळ निर्माण झाल्याची चर्चा

‘ईव्हीएम’बाबत संभ्रमपणजी : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत घोळ निर्माण झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगल्यामुळे गोव्यातील काही प्रमुख उमेदवारांनी ईव्हीएम यंत्रांबाबत संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे ईव्हीएम यंत्रांमधील मतांची मोजणी करतानाच व्हीव्हीपीएटी यंत्रामधील नोंदींचीही दखल घ्यावी व कुणाही उमेदवाराने फेरमतमोजणी मागितल्यास ती विनंती त्वरित मान्य व्हावी, अशी मागणी आमदार व काही उमेदवार करत आहेत.गेल्या ४ फेब्रुवारी रोजी गोव्यातील ४0 मतदारसंघांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) कडेकोट सुरक्षा व्यवस्थेखाली स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया सुरू होती, तेव्हा ४ फेब्रुवारी रोजी अनेक मतदान केंद्रांवर यंत्रांमध्ये बिघाड असल्याचा अनुभव आला. त्या वेळी निवडणूक यंत्रणेने झटपट ती यंत्रे बदलली. आके-मडगाव येथे तर बुथ क्रमांक आठवर इलेक्ट्रॉॅनिक यंत्रामधील बिघाडामुळे मतदान प्रक्रिया रद्द करून फेरमतदान घ्यावे लागले होते. या वेळी मतदान प्रक्रियेवेळी जेवढ्या संख्येने यंत्रांमध्ये बिघाड आढळून आला, तेवढा बिघाड कधी आढळला नव्हता. अर्थात त्याविरुद्ध लगेच निवडणूक यंत्रणेने उपाययोजना केल्यामुळे वाद निर्माण झाला नाही.या वेळी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून, आमदार व उमेदवारांकडून वेगळा सूर ऐकू येत आहे. मतमोजणीची प्रक्रिया अवघ्या ४८ तासांवर आलेली आहे. दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणीसाठी येत्या शनिवारी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मात्र, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एखाद्या उमेदवारास दिलेले मत दुसऱ्याच उमेदवाराच्या पारड्यात जाण्याचा प्रकार घडल्याची चर्चा सोशल मीडियावर गाजल्यामुळे गोव्यातील उमेदवारांनी धसका घेतला आहे. भाजपच्या उमेदवारांमध्ये मोठीशी चिंता नाही. विरोधी काँग्रेस व अपक्ष उमेदवार शंका व्यक्त करत आहेत. निवडणूक आयोगालाही आपल्या शंका राजकीय पक्षांनी यापूर्वी कळविल्या आहेत.जर एखाद्या उमेदवाराने फेरमतमोजणी मागितली, तर ती लगेच मान्य करून फेरमतमोजणी करायला हवी, अशी मागणी राजकीय पक्ष व उमेदवार करत आहेत. अपक्ष उमेदवार विजय सरदेसाई, काँग्रेसचे आमदार दिगंबर कामत, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स तसेच मगोपचे आमदार व अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनीही बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना तशीच मागणी केली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसोबतच व्हीव्हीपीएटी यंत्रांमधील कागदांद्वारे झालेले मतदानही मोजणीसाठी घेतले जावे. दोन्हींची मोजणी ही एकाचवेळी केली जावी, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर यांनी केली आहे. युनायटेड बहुजन आॅफ गोवा या पक्षानेही तशीच मागणी केली आहे.दरम्यान, ईव्हीएम यंत्रांबाबत आम्हाला शंका नाही. जर एखाद्या बुथवरील मतदानाविषयी मोजणीनंतर उमेदवारास शंका आली, तर त्वरित अर्ज करून त्या बुथापुरती फेरमतमोजणी करून घेता येईल; पण सरसकट सगळीकडेच फेरमतमोजणी घेण्याची गरज नाही, असे मत भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केले. (खास प्रतिनिधी)