शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पणजी महापालिकेत महापौर-आयुक्त संघर्ष शिगेला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 13:03 IST

कचरा उचलण्यावरुन निर्माण झालेला वाद टोकाला

पणजी : राजधानी शहरात स्मार्ट सिटीच्या कामावरुन महापौर उदय मडकईकर आणि आयुक्त शशांक त्रिपाठी यांच्यात सुरु झालेला संघर्ष शिगेला पोहोचला आहे. आयुक्तांनी पणजीतील ४४ इमारती, २६ हॉटेल्सना महापालिका कचरा उचलणे बंद करण्यासंबंधी नोटिसा बजावल्यानंतर या इमारतींना खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने कंपोस्टिंग युनिट बांधून देण्याची तयारी महापौरांनी दाखवली. दुसरीकडे कचरा उचलण्यासाठी शेजारी ताळगांव पंचायतीची मदत घेण्याचे त्यांनी जाहीर केले. कचरा बंद करु देणार नाही, असा इशारा देत गरज पडल्यास या लोकांना सीएसआरखाली आर्थिक मदत मिळवून कंपोस्टिंग युनिटस उपलब्ध करु, असे महापौरांनी सांगितले. मडकईकर म्हणाले की, ‘स्मार्ट सिटीचे प्रत्येक काम महापालिकेला विश्वासात न घेताच केलेले आहे. वरील इमारती तसेच हॉटेलांचा कचरा उचलणे बंद करण्याचा निर्णय आयुक्तांनी राजकीय दबावाखालीच घेतलेला आहे. १५ दिवसात स्वत:च्या कंपोस्टिंग युनिटची सोय करण्यास या हॉटेलमालकांना बजावले आहे. महापालिका कचरा कर गोळा करते त्यामुळे कचरा उचलणे बंद करुन चालणार नाही. मी कोणालाही वाºयावर सोडणार नाही. गरज पडल्यास बड्या कंपन्यांकडून पुरस्कृत मिळवून या इमारतींना कंपोस्टिंग युनिट उपलब्ध करुन देईन. नव्या इमारतींना कचºयाची विल्हेवाट स्वत: करण्याची अट बांधकामाआधीच घातली जाते. काही इमारतींनी ही व्यवस्था केलेली नाही. कचरा उचलणे बंद करायचे असेल तर आधी क र वसुली बंद करावी लागेल. महापालिकेने बैठकीत तो निर्णय घ्यावा लागेल. आयुक्तांनी याबाबतीत मनमानी करु नये, असे ते म्हणाले. दरम्यान, पावसाळ्यात पणजी बुडाल्यास मी जबाबदार नाही, असेही महापौर मडकर यांनी म्हटले असून खापर आयुक्तांवर खापर फोडले आहे. मडकईकर म्हणाले की, ‘स्मार्ट सिटीच्या कामांना आमचा विरोध नाही. नेमके कोणकोणत्या ठिकाणी खोदकाम करणार याचा प्लॅन आम्ही मागितला होता. तो स्मार्ट सिटीवाले सादर करु शकले नाहीत. ३0 एप्रिलपर्यंत खोदकामे बंद करणे अपेक्षित होते. मात्र शहरात ठिकठिकाणी खोदकामे केलेली आहेत. रायबंदर-पणजी भूमिगत वीज वाहिन्यांसाठी मान्सून तोंडावर असताना खोदकाम केलेले आहे. कांपाल येथे पदपथ फोडले तेव्हा आम्ही बंद केलेले काम आयुक्तांनी पुन्हा चालू करण्यास वाट मोकळी करुन दिली.

बायंगिणी कचरा प्रकल्प का रखडला?; महापौरांचा संतप्त सवाल दरम्यान, सरकारने ६ महिन्यात कचरा प्रक्रिया प्रकल्प बांधून देतो असे सांगून अडीच वर्षांपूर्वी महापालिकेची बायंगिणीतील जागा आपल्या ताब्यात घेतली परंतु अजून हा प्रक ल्प झालेला नाही. तो झाला असता तर पणजीतील कचºयाची समस्या कायमची मिटली असती. सरकारने महापालिकेवर त्यावेळी दबाव आणून ही जमीन ताब्यात घेतली. परंतु काहीच केले नाही. प्रकल्पासाठी आलेला पैसाही इतर कामांसाठी वळविला. शहरातील कचरा समस्येला खरे तर सरकारच जबाबदार आहे, असा आरोप महापौर मडकईकर यांनी केला.  

टॅग्स :Mayorमहापौर