शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

गोव्यात बंदला संमिश्र प्रतिसाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 20:38 IST

खाजगी बसेस, फेरीबोटी बंद राहिल्याने प्रवाशांची परवड 

पणजी : विविध कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला गोव्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. खाजगी बसेस, फेरीबोटी बंद राहिल्याने प्रवाशांची परवड झाली. औद्योगिक आस्थापने तसेचे काही ठिकाणी टॅक्सीही बंद राहिल्या. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा नेहमीप्रमाणे चालू होत्या. दिवसभरात कोणत्याही अनुचित घटनेची नोंद झालेली नसून बंद शांततेत पार पडला. कामगार संघटनांनी हा बंद यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.

खाजगी बसगाड्या दिवसभर पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या. राजधानीतील बस स्थानकावर सकाळी एक दोन खाजगी बसेस आल्या. परंतु नंतर त्या बंद ठेवण्यात आल्या. चोडण आणि दिवाडी येथील फेरीबोटी सकाळी बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. विद्यार्थ्यांना शाळेत पोचता आले नाही. 

कदंब महामंडळाने अतिरिक्त १५0 बसेस रस्त्यावर आणल्या होत्या परंतु त्या अपुºया पडल्या. लोकांना कदंब बसगाड्यांची तासन्तास वाट पहावी लागत होती. रिक्षा, मोटरसायकल पायलटांनी व्यवसाय चालू ठेवला त्यामुळे त्यांची बरीच कमाई झाली. ‘गोवा माइल्स’अ‍ॅपच्या माध्यातून टॅक्सी सेवाही चालू होती. 

बाजारपेठा चालू होत्या परंतु लोकांनी घराबाहेर न पडणे पसंत केल्याने दुकानांमध्ये ग्राहक नव्हते. डिचोलीत बुधवारी आठवड्याच्या बाजारावरही परिणाम झाला. बस स्थानकांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.‘एस्मा’ धुडकावून फेरीबोट कर्मचाºयांनी बंदमध्ये भाग घेतला. सकाळी चोडण तसेच दिवाडी येथील फेरीबोटी बंद होत्या. नंतर त्या सुरु करण्यात आल्या. 

            बंद यशस्वी झाल्याचा दावा 

सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रीय स्तरावर दहा कामगार संघटनांनी संपाची हाक दिली होती. या अनुषंगाने ‘गोवा कन्वेंशन आॅफ वर्कर्स’च्या झेंड्याखाली कामगारांनी बंद पुकारला होता. आयटकचे सचिव अ‍ॅड. सुहास नाईक यांनी सायंकाळी या प्रतिनिधीशी बोलताना बंद पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. सरकारच्या धोरणाविरुध्द सर्वसामान्य जनतेची चीड दिसून आल्याचे ते म्हणाले. लोकांनी आपणहून उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग घेतल्याचा दावा त्यांनी केला. 

टॅग्स :goaगोवाBharat Bandhभारत बंद