शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

१५ जूनपर्यंत कामे संपवा; 'स्मार्ट सिटी'ला नवी डेडलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 10:58 IST

संजीत रॉड्रिग्ज यांच्याकडे ताबा.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: 'स्मार्ट सिटी'च्या रखडलेल्या कामांमुळे येत्या पावसाळ्यात पणजी तुंबणार, अशी भीती व्यक्त केली जात असतानाच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल याप्रश्नी कंत्राटदार, सल्लागार व संबंधित खातेप्रमुखांची बैठक घेऊन १५ जूनपर्यंत कामे पूर्ण करण्यासाठी नवी डेडलाइन दिली आहे.

दुसरीकडे इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व्यवस्थापकीय व संचालकपदाचा ताबा संजीत रॉड्रिग्ज यांच्याकडे देण्यात आला आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, स्मार्ट सिटीची कामे ठरल्याप्रमाणे वेळेत झालेली नाहीत. त्यामुळे आता ताबा महापालिकेचे माजी आयुक्त व स्मार्ट सिटीच्या कामाचे अनुभवी अधिकारी संजीत रॉड्रिग्ज यांच्याकडे द्यावा लागत आहे. संजीत यांनी यापूर्वी महापालिकेत आयुक्त म्हणून बरीच वर्षे काम केले आहे. तसेच अमृत मिशनच्या कामाचाही त्यांना अनुभव आहे. ते आयएएस अधिकारी असून सध्या नागरी पुरवठा व गृहनिर्माण खात्याचे सचिव आहेत.

खोदून ठेवलेले रस्ते तसेच इतर कारणामुळे यंदा पावसाळ्यात पणजी शहर बुडण्याचा धोका व्यक्त करण्यात येत होता. अलीकडेच बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी पाहणी केली. तेव्हा त्यांनी या कामावरून हात वर केले होते. कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे शक्य नसल्याचे त्यांनी प्रांजळपणे कबूल केले होते. त्यानंतर पणजीवासीयांमध्ये संताप पसरला होता.

आता दिवस-रात्र काम करा

मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट सिटीच्या कामांसंदर्भात बैठक घेतली आणि सर्व संबंधितांना कामे १५ जूनपर्यंत कामे हातावेगळी करा, असे निर्देश दिले आहेत. सकाळच्या सत्रात पहिली पाळी, दुपारनंतर दुसरी आणि रात्रपाळी अशा तीन पाळ्यांमध्ये अहोरात्र कामगार युद्धपातळीवर काम करतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- मुख्यमंत्र्यांनी काल स्मार्ट सिटीच्या रखडलेल्या कामांबद्दल कंत्राटदार, सल्लागार यांची बैठक घेत आढावा घेतला.

- बैठकीला विविध खातेप्रमुखही उपस्थित होते. १५ जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.- पणजी बुडणार की नाही, याबाबत काहीच सांगू शकत नसल्याचे मंत्री काब्राल व महापौर मोन्सेरात यांनी सांगताच पणजीवासीयांत तीव्र संताप पसरला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेत सूचना केल्या.

- खोदून ठेवलेले रस्ते तसेच इतर कारणामुळे यंदा पावसाळ्यात पणजी शहर बुडण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे.

काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार

काँग्रेसचे नेते एल्विस गोम्स यांनी उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करून स्मार्ट सिटीची कामे हातावेगळी न केल्यास पावसाळ्यात लोकांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जावी, अशी ही त्यांची मागणी आहे.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत