शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

स्मार्ट सिटी बळीप्रकरणी 'आप'कडून शहर पोलिसात कंत्राटदार व इतरांविरुद्ध तक्रार

By किशोर कुबल | Updated: January 5, 2024 13:50 IST

प्रसंगी हायकोर्टातही जाऊ: अमित पालेकर

किशोर कुबल, पणजी : मळा येथे स्मार्ट सिटीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून आयुष हळर्णकर या माजी नगरसेवकपुत्राच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख ॲड. अमित पालेकर व नेते वाल्मिकी नायक यांनी शहर पोलिसात कंत्राटदार तसेच इतर संबंधितांविरुद्ध तक्रार सादर केली आहे. प्रसंगी उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या घटनेस जबाबदार असलेल्या प्रत्येकावर गुन्हा नोंदवून कारवाई केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रार सादर केल्यानंतर आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख ॲड. अमित पालेकर यांनी  दिलेल्या माहितीनुसार कंत्राटदार बागकिया कन्स्ट्रक्शनचे संचालक, इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, महापालिका अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी तसेच 'सुडा'चे अधिकारी, जे कोणी या घटनेला जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.केवळ भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ खाली सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून भागणार नाही. या सर्वाना कठोर कलमे लावावी लागतील.' 

 ॲड. पालेकर पुढे म्हणाले की, 'स्मार्ट सिटीच्या बेदबाबदारपणामुळेच हा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे हा एक फौजदारी गुन्हा ठरतो परंतु पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई  न केल्याने आम्ही कंत्राटदाराच्या नावासह तक्रार दिलेली आहे तसेच स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे त्या प्रकरणी ही कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केलेली आहे. कुठलाही कंत्राटदार त्याला अभय असल्याशिवाय एवढा बेजबाबदारपणे वागणार नाही.'ॲड. पालेकर म्हणाले की, 'स्मार्ट सिटीच्या कामांबद्दल सावळा गोंधळ चालू आहे. डांबरीकरण केलेले रस्ते पुन्हा फोडले जातात. काही ठिकाणी तर हॉटमिक्स केलेल्या रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत. जनतेच्या करांचा पैशांचा हा अपव्यय आहे. त्यामुळे जबाबदारी निश्चित करून संबंधितावर कारवाई करायला हवी.दरम्यान, वाल्मिकी नायक यांनी राजधानी शहरात ठीकठिकाणी फिरून अजूनही खड्ड्यांच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था केलेली नाही त्याचे फोटो काढून पोलिसांना दिलेले आहेत.

वाल्मिकी म्हणाले की,  'राजधानी शहरात स्मार्ट सिटीच्या कामांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था केलेली नाही. पाच ते सात फूट खड्डे खोदून ठेवले आहेत. असे मोठे खड्डे खोदले जातात त्यावेळी त्याला बॅरिकेड्स घालणे, रात्रीच्या वेळी ब्लिंकरिंग दिव्यांची व्यवस्था करणे, नियॉन रिबन बांधणे आवश्यक असते. अशी कोणतीही सुरक्षा व्यवस्था केलेली नाही. स्मार्ट सिटीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. काम चालू असताना अनेक अपघात घडले तसेच अजूनही रस्ते खचतच आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला हवी.

टॅग्स :goaगोवाAAPआप