शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

स्मार्ट सिटी बळीप्रकरणी 'आप'कडून शहर पोलिसात कंत्राटदार व इतरांविरुद्ध तक्रार

By किशोर कुबल | Updated: January 5, 2024 13:50 IST

प्रसंगी हायकोर्टातही जाऊ: अमित पालेकर

किशोर कुबल, पणजी : मळा येथे स्मार्ट सिटीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून आयुष हळर्णकर या माजी नगरसेवकपुत्राच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख ॲड. अमित पालेकर व नेते वाल्मिकी नायक यांनी शहर पोलिसात कंत्राटदार तसेच इतर संबंधितांविरुद्ध तक्रार सादर केली आहे. प्रसंगी उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या घटनेस जबाबदार असलेल्या प्रत्येकावर गुन्हा नोंदवून कारवाई केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रार सादर केल्यानंतर आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख ॲड. अमित पालेकर यांनी  दिलेल्या माहितीनुसार कंत्राटदार बागकिया कन्स्ट्रक्शनचे संचालक, इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, महापालिका अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी तसेच 'सुडा'चे अधिकारी, जे कोणी या घटनेला जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.केवळ भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ खाली सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून भागणार नाही. या सर्वाना कठोर कलमे लावावी लागतील.' 

 ॲड. पालेकर पुढे म्हणाले की, 'स्मार्ट सिटीच्या बेदबाबदारपणामुळेच हा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे हा एक फौजदारी गुन्हा ठरतो परंतु पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई  न केल्याने आम्ही कंत्राटदाराच्या नावासह तक्रार दिलेली आहे तसेच स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे त्या प्रकरणी ही कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केलेली आहे. कुठलाही कंत्राटदार त्याला अभय असल्याशिवाय एवढा बेजबाबदारपणे वागणार नाही.'ॲड. पालेकर म्हणाले की, 'स्मार्ट सिटीच्या कामांबद्दल सावळा गोंधळ चालू आहे. डांबरीकरण केलेले रस्ते पुन्हा फोडले जातात. काही ठिकाणी तर हॉटमिक्स केलेल्या रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत. जनतेच्या करांचा पैशांचा हा अपव्यय आहे. त्यामुळे जबाबदारी निश्चित करून संबंधितावर कारवाई करायला हवी.दरम्यान, वाल्मिकी नायक यांनी राजधानी शहरात ठीकठिकाणी फिरून अजूनही खड्ड्यांच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था केलेली नाही त्याचे फोटो काढून पोलिसांना दिलेले आहेत.

वाल्मिकी म्हणाले की,  'राजधानी शहरात स्मार्ट सिटीच्या कामांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था केलेली नाही. पाच ते सात फूट खड्डे खोदून ठेवले आहेत. असे मोठे खड्डे खोदले जातात त्यावेळी त्याला बॅरिकेड्स घालणे, रात्रीच्या वेळी ब्लिंकरिंग दिव्यांची व्यवस्था करणे, नियॉन रिबन बांधणे आवश्यक असते. अशी कोणतीही सुरक्षा व्यवस्था केलेली नाही. स्मार्ट सिटीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. काम चालू असताना अनेक अपघात घडले तसेच अजूनही रस्ते खचतच आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला हवी.

टॅग्स :goaगोवाAAPआप