शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

स्मार्ट सिटी बळीप्रकरणी 'आप'कडून शहर पोलिसात कंत्राटदार व इतरांविरुद्ध तक्रार

By किशोर कुबल | Updated: January 5, 2024 13:50 IST

प्रसंगी हायकोर्टातही जाऊ: अमित पालेकर

किशोर कुबल, पणजी : मळा येथे स्मार्ट सिटीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून आयुष हळर्णकर या माजी नगरसेवकपुत्राच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख ॲड. अमित पालेकर व नेते वाल्मिकी नायक यांनी शहर पोलिसात कंत्राटदार तसेच इतर संबंधितांविरुद्ध तक्रार सादर केली आहे. प्रसंगी उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या घटनेस जबाबदार असलेल्या प्रत्येकावर गुन्हा नोंदवून कारवाई केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रार सादर केल्यानंतर आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख ॲड. अमित पालेकर यांनी  दिलेल्या माहितीनुसार कंत्राटदार बागकिया कन्स्ट्रक्शनचे संचालक, इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, महापालिका अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी तसेच 'सुडा'चे अधिकारी, जे कोणी या घटनेला जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.केवळ भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ खाली सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून भागणार नाही. या सर्वाना कठोर कलमे लावावी लागतील.' 

 ॲड. पालेकर पुढे म्हणाले की, 'स्मार्ट सिटीच्या बेदबाबदारपणामुळेच हा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे हा एक फौजदारी गुन्हा ठरतो परंतु पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई  न केल्याने आम्ही कंत्राटदाराच्या नावासह तक्रार दिलेली आहे तसेच स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे त्या प्रकरणी ही कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केलेली आहे. कुठलाही कंत्राटदार त्याला अभय असल्याशिवाय एवढा बेजबाबदारपणे वागणार नाही.'ॲड. पालेकर म्हणाले की, 'स्मार्ट सिटीच्या कामांबद्दल सावळा गोंधळ चालू आहे. डांबरीकरण केलेले रस्ते पुन्हा फोडले जातात. काही ठिकाणी तर हॉटमिक्स केलेल्या रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत. जनतेच्या करांचा पैशांचा हा अपव्यय आहे. त्यामुळे जबाबदारी निश्चित करून संबंधितावर कारवाई करायला हवी.दरम्यान, वाल्मिकी नायक यांनी राजधानी शहरात ठीकठिकाणी फिरून अजूनही खड्ड्यांच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था केलेली नाही त्याचे फोटो काढून पोलिसांना दिलेले आहेत.

वाल्मिकी म्हणाले की,  'राजधानी शहरात स्मार्ट सिटीच्या कामांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था केलेली नाही. पाच ते सात फूट खड्डे खोदून ठेवले आहेत. असे मोठे खड्डे खोदले जातात त्यावेळी त्याला बॅरिकेड्स घालणे, रात्रीच्या वेळी ब्लिंकरिंग दिव्यांची व्यवस्था करणे, नियॉन रिबन बांधणे आवश्यक असते. अशी कोणतीही सुरक्षा व्यवस्था केलेली नाही. स्मार्ट सिटीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. काम चालू असताना अनेक अपघात घडले तसेच अजूनही रस्ते खचतच आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला हवी.

टॅग्स :goaगोवाAAPआप