शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

व्यावसायिकदृष्ट्या मराठी चित्रपट मागेच

By admin | Updated: November 24, 2014 01:28 IST

नंदू माधव : नव्या दमाच्या निर्मात्यांमुळे आशादायक चित्र

सुखदेव नारायणकर-पणजी : मराठी चित्रपट बदलतो आहे हे खरे आहे; मात्र व्यावसायिकदृष्ट्या ती एक चळवळ झाली आहे असे मात्र म्हणता येणार नाही. त्याकरिता सार्वत्रिक प्रयत्नांची गरज आहे. नव्या दमाचे चेहरे आता चित्रपट निर्मितीत येत असल्याने आगामी काळात अधिक आशादायक चित्र दिसेल, असा विश्वास मराठी चित्रपट अभिनेते नंदू माधव यांनी व्यक्त केला. इफ्फीनिमित्त गोव्यात आलेल्या या कसदार अभिनेत्याने ‘लोकमत’शी मनमोकळा संवाद साधला. नंदू माधव म्हणाले, मराठी चित्रपटांना चळवळीचे स्वरुप आले आहे असं म्हणणं धाडसाचं ठरेल. नाटक, पथनाट्य हा चळवळीचा भाग झाला; पण मराठी चित्रपटांमध्ये हा बदलही होत असल्याची काही सुचिन्हे दिसायला लागली आहेत. चळवळीचेच म्हणत असाल तर बंगालमध्ये चित्रपटांची चळवळ रुजली. नव्या दमाच्या दिग्दर्शकांमुळे सध्या मराठी चित्रपटसृष्टीस चांगले दिवस येत आहेत. नवे आशय विषय आणि तंत्रज्ञान यामुळे चित्रपटांची समज वाढीस लागत आहे हे चांगले लक्षण आहे. जागतिक स्तरावर मराठी चित्रपटांची दखल घेतली जात आहे हा मोठ्या बदलांचाच भाग आहे. ते म्हणाले, शासनाने थेट मदत देण्यापेक्षा जर मराठी चित्रपटांसाठी स्वत:ची हक्काची चित्रपटगृहे निर्माण केली तर मराठी चित्रपटांचे अनेक प्रश्न खऱ्या अर्थाने सुटतील. निर्मितीमूल्यांबरोबरच त्याच्या मार्केटिंगकडे विशेषत्वाने पाहण्याची गरज आहे. स्वत:चं घर असल्यावर मला जागा द्या, असं म्हणायची वेळच मराठी चित्रपटांवर येणार नाही. इफ्फीत विषयकेंद्रित चित्रपट पाहावयास मिळतात. त्यामुळे विविध देशातील सामाजिक, आर्थिक, राजकीय संस्कृती पाहावयास मिळते. नव्या दिग्दर्शकांच्या सामाजिक जाणिवा वाढण्यासाठी याचा निश्चित लाभ होतो. वेगळ्या संकल्पना, वेगळ्या समस्यांना भिडण्याची ताकद निर्माण होते. परिणामी त्याचे दृश्य परिणाम चित्रपटांच्या निर्मितीत दिसतात. चित्रपटांच्या दर्जा वाढीस ही गोष्ट अनुकूल आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटांची इफ्फीतील संख्याही वाढत आहे हेच आश्वासक चित्र आहे. गोव्यातही मराठी चित्रपट आता बऱ्यापैकी झळकू लागले आहेत. इंडियन पॅनोरमा विभागातील मराठी चित्रपटांची संख्या लक्षात घेता हे बदल दुर्लक्षित करण्यासारखे नाहीत, असेही त्यांनी सांगितले.