शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

गोव्यातील सिल्वर सँड कोलवा बीच आता होणार ‘आयकॉनिक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 16:56 IST

दक्षिण गोव्यातील लोकप्रिय समुद्र किनारा असलेला कोलवा आता लवकरच ‘आयकॉनिक’ होणार असून या समुद्र किनाऱ्याचा कायापालट करण्यासाठी 184 कोटींची योजना केंद्र सरकार समोर मांडण्यात आली आहे.

ठळक मुद्देदक्षिण गोव्यातील लोकप्रिय समुद्र किनारा असलेला कोलवा आता लवकरच ‘आयकॉनिक’ होणार असून या समुद्र किनाऱ्याचा कायापालट करण्यासाठी 184 कोटींची योजना केंद्र सरकार समोर मांडण्यात आली आहे. किनाऱ्यावरील रुपेरी वाळूमुळे या किनाऱ्याला सिल्वर सँड बीच असे नावही पडले आहे.योजनेअंतर्गत स्थानिक लोककलांनाही उत्तेजन दिले जाणार आहे.

सुशांत कुंकळय़ेकर

मडगाव - दक्षिण गोव्यातील लोकप्रिय समुद्र किनारा असलेला कोलवा आता लवकरच ‘आयकॉनिक’ होणार असून या समुद्र किनाऱ्याचा कायापालट करण्यासाठी 184 कोटींची योजना केंद्र सरकार समोर मांडण्यात आली आहे. या योजनेखाली कोलवा हा देशातील आदर्श समुद्र किनारा होणार आहे. या किनाऱ्यावरील रुपेरी वाळूमुळे या किनाऱ्याला सिल्वर सँड बीच असे नावही पडले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी शुक्रवारी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात देशातील एकूण 17 आयकॉनिक पर्यटन स्थळांची घोषणा केली. त्यात कोलवा बीचचाही समावेश आहे. या योजनेअंतर्गत कोलवा समुद्र किनाऱ्यावरील साधनसामग्रीत वाढ करण्याबरोबरच दर्जात्मक पर्यटन सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय या योजनेअंतर्गत स्थानिक लोककलांनाही उत्तेजन दिले जाणार आहे.

कोलवा समुद्र किनारा हा येथील वाळूसाठी प्रसिद्ध असून एवढय़ा चांगल्या प्रमाणात रुपेरी वाळू गोव्यात अन्य कुठेही सापडत नाही. याशिवाय हा किनारा पोहण्यासाठी इतर किनाऱ्यांच्या तुलनेत सुरक्षित असल्याने मोठय़ा प्रमाणावर पर्यटक आणि स्थानिक या किनाऱ्याला भेट देत असतात.

यासंबंधी बोलताना पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी, कोलवा बीचला आयकॉनिक करण्यासाठी नेमलेल्या सल्लागार कंपनीने आपला अहवाल यापूर्वीच केंद्र सरकारला सादर केला असून त्यात समुद्र किनाऱ्यावरील सुविधा वाढविण्याबरोबरच वाहतूक सुविधेत वाढ तसेच चांगल्या दर्जाचे पाणी उपलब्ध करुन देण्यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय जवळपासच्या परिसरात आणखी कुठले पर्यटन पोषक प्रकल्प उभे करता येतील का याचाही विचार केला गेला आहे. या योजनेखाली कोलवा समुद्र किनाऱ्यावर जागतिक दर्जाच्या सुविधा उभ्या केल्या जाणार आहेत. स्थानिक आमदार चर्चिल आलेमाव यांनीही या निर्णयामुळे गोव्यातील पर्यटनाला अधिकच उत्तेजन मिळेल अशी आशा व्यक्त करताना गोवा देशातील नंबर एकच समुद्र किनारा होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

कोलवा खाडीची सफाई

सध्या मोठ्या प्रमाणावर सांडपाणी सोडले जात असल्यामुळे प्रदुषित झालेली कोलवा समुद्र किनाऱ्याच्या मुखावरील खाडीची सफाई जलसंसाधन खात्याकडून हातात घेतली जाणार असून यासाठी  लवकरच सुमारे 12 कोटींची निविदा जारी होणार आहे. सध्या या खाडीत कोलव्यातील हॉटेलांचे सांडपाणी सोडले जाते. या गोष्टीची हरित लवादाने दखल घेत ही खाडी पूर्णपणो साफ करावी आणि प्रदुषण मुक्त करावी असा आदेश दिला होता.

 

टॅग्स :goaगोवा