शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

घरांची पडझड, २ लाखांची मदत देणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विधानसभेत घोषणा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2024 09:39 IST

आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत अर्थसाह्य करणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात पाऊस तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे जर कुणाच्या घराचे किंवा फ्लॅटचे नुकसान झाले तर संबंधितांना आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत प्रत्येकी २ लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिले.

राज्यात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे लोकांच्या घरांना हानी पोहोचत आहे. या लोकांना मदत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत निधीची तरतूद असली तरी ती वेळेत मिळत नाही. सरकारने या प्रश्नी लक्ष घालावे, अशी चिंता मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी प्रश्नोत्तर तासात विधानसभेत व्यक्त केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले.

आमदार आमोणकर म्हणाले, पावसामुळे सध्या मुरगाव प्रमाणेच राज्याच्या अन्य भागांमध्येही दरडी कोसळून काहींच्या घरांचे नुकसान होत आहे. मुरगावमध्येच मागील दोन वर्षात आठ वेळा दरड कोसळली. या लोकांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून आपण प्रयत्न करीत आहे. या विषयीच्या आपण व्यवस्थापनाकडे आठ फाइल्स मंजुरीसाठी पाठवल्या होत्या. मात्र, त्या आपत्ती व्यवस्थापनाकडे प्रलंबित असून मंजूर झालेल्या नाहीत. नुकसानीचा आकडा निश्चित करणे बाकी असल्याची कारणे दिली जातात. प्रत्यक्षात ही मदत प्राधान्याने मिळणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

निधीत वाढ करणार

मुख्यमंत्री म्हणाले, की सरकार अटल आसरा योजनेंतर्गत घरे बांधण्यासाठी सरकार अडीच लाखांपर्यंत निधी देते. सरकार या निधीत वाढ करेल. पाऊस तसेच नैसर्गिक आपत्तीत जर घर पडले असेल किंवा मोठे नुकसान झाले असेल तर किती नुकसान झाले, याआधारे आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत प्रत्येकी २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळेल, असे त्यांनी सांगितले.

मागील वर्षीचीही प्रलंबित रक्कम देऊ

मुख्यमंत्री म्हणाले, पावसामुळे ज्या शेतीचे, कुळाघरांचे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांना दोन महिन्यांत म्हणजेच गणेश चतुर्थीपूर्वी भरपाई दिली जाईल. ही रक्कम शेतकयांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून यासंबंधीचे अर्ज जाऊन भरून घेतील. मागील वर्षाचीसुद्धा जर कुणाची नुकसानभरपाई देणे प्रलंबित असेल तर तीसुद्धा दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

चतुर्थीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई

पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे त्याचे सर्वेक्षण केले जाईल. गणेश चतुर्थीपूर्वी या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी लक्षवेधी सूचनेवेळी विधानसभेत दिले. 

आमदार अॅड. कार्ल्स फेरेरा यांनी राज्यात पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने या शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाईची रक्कम मिळावी, अशी लक्षवेधी सूचना मांडली होती. अॅड. फरेरा म्हणाले, पावसामुळे शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बांध फुटले आहेत. यामुळे चांगले उत्पन्न मिळेल याकडे लक्ष लावून असलेल्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे. सरकारने या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी रक्कम थेट बँक खात्यात जमा करणार त्यांनी केली. 

आमदार वीरेश बोरकर म्हणाले, सांतआंद्रेतही पावसामुळे शेती पाण्याखाली गेली आहे. मात्र, कृषी खात्याअंतर्गत असलेला निधी कमी झाला आहे. शेतकऱ्यांचे जर १ लाखाचे नुकसान झाले असेल तर नुकसानभरपाई म्हणून त्यांना फार कमी रक्कम मिळते. या रकमेसाठीही त्यांना वारंवार कृषी खात्याच्या कार्यालयात फेऱ्या माराव्यात लागतात असे त्यांनी सांगितले,

१२ तालुक्यांचे लवकरच सर्वेक्षण

कृषिमंत्री रवी नाईक म्हणाले, कौ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न असेल. जेणे करून त्यांना पुन्हा एकदा लागवड करता येईल. त्यासाठी राज्यातील सर्व १२ तालुक्यांमध्ये शेतीचे किती नुकसान झाले याचे सर्वेक्षण खात्याकडून केले जाईल असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतvidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवन