शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

गोव्यातील नारळांचे उत्पादन राष्ट्रीय सरासरीपेक्षाही निम्म्याने कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 19:44 IST

गोंयकारांच्या अन्नातील प्रमुख घटक असलेला नारळ हा दिवसेंदिवस कमी होत असून मागच्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदाच्या नारळ उत्पादनात बरीच मोठी घट झाली आहे.

ठळक मुद्देगोंयकारांच्या अन्नातील प्रमुख घटक असलेला नारळ हा दिवसेंदिवस कमी होत असून मागच्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदाच्या नारळ उत्पादनात बरीच मोठी घट झाली आहे.टंचाईवर मात करण्यासाठी आता कृषी खात्यातर्फे नवीन संकरित नारळाची रोपे राज्यात आणली जाणार आहेत.नारळाच्या राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत हे पीक 50 टक्क्यांपेक्षाही कमी असून राष्ट्रीय सरासरी दर हेक्टरी 12,500 नारळ एवढी आहे.

मडगाव - गोंयकारांच्या अन्नातील प्रमुख घटक असलेला नारळ हा दिवसेंदिवस कमी होत असून मागच्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदाच्या नारळ उत्पादनात बरीच मोठी घट झाली आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी आता कृषी खात्यातर्फे नवीन संकरित नारळाची रोपे राज्यात आणली जाणार आहेत.

कृषी खात्याच्या आकडेवारीप्रमाणो, 2016-17 या कालावधीत गोव्यात 25,913 हेक्टर क्षेत्रात 132.16 दशलक्ष नारळाचे उत्पादन झाले होते. दर हेक्टरी हे उत्पादन 5100 नारळ एवढे होते. 2017-18 या वर्षात एकूण 26,169 हेक्टर जमिनीत नारळाचे उत्पादन घेतले गेले असले तरी एकूण उत्पादन 131.63 दशलक्ष नारळ एवढेच झाले होते. त्यामुळे दर हेक्टरी नारळाचे पीक 5030 एवढे खाली उतरले होते. नारळाच्या राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत हे पीक 50 टक्क्यांपेक्षाही कमी असून राष्ट्रीय सरासरी दर हेक्टरी 12,500 नारळ एवढी आहे.

गोव्यातील या स्थितीत बदल करण्यासाठी कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी हल्लीच झालेल्या नारळ उत्पादन बोर्डाच्या एका परिसंवादात नारळाच्या संकरित जाती लागवडीखाली आणण्याचे सूतोवाच केले होते. याबद्दल बोलताना ते म्हणाले होते, प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघात किमान एक हजार नारळाची झाडे लावल्यास गोव्यातील उत्पादनात निश्चितच वाढ होऊ शकेल. राष्ट्रीयस्तराच्या तुलनेत गोव्यातील माड कमी उत्पादन देत असतात. त्यामुळेच संकरित नारळ गोव्यात लागवडीखाली आणण्याचा विचार कृषीमंत्र्यांनी व्यक्त केला होता. त्याशिवाय कोमुनिदादीच्या जागेत कंत्राटी पद्धतीने नारळाचे उत्पादन घेण्यासाठीही नवीन कायदा तयार करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले होते.

एकाबाजूने नारळाचे उत्पादन कमी होत असताना गोव्यातील बागायतदारांना नारळ काढण्यासाठी पाडेली मिळणे मुश्कील झाले आहे. राज्यात हे पाडेली उपलब्ध आहेत ते दर झाडामागे 80 ते 100 रुपये शुल्क आकारत असून त्यामुळे नारळाचे उत्पादन घेणे बागायतदारांना न परवडण्यासारखे झाले आहे. याशिवाय पाडलेला नारळ लवकरात लवकर विकला जावा याचीही सोय सरकारने उपलब्ध करुन देण्याची मागणी लोटली येथील सी.एफ. परेरा यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, नारळ पाडल्यावर दर हजार नगामागे ठराविक रक्कम देऊन व्यापारी तो विकत घेतात. बागायतदारांकडून कमीत कमी दरात हा नारळ विकत घेतला जातो. त्याऐवजी हा नारळ विकण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करुन दिल्यास मधल्या दलालांना बाजूला काढून थेट ग्राहकांपर्यंत जाण्याची सोय बागायतदारांना उपलब्ध होईल. त्यामुळे ग्राहकांनाही कमी किंमतीत नारळ मिळू शकेल आणि बागायतदारांनाही चांगला दर मिळेल असे ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवा