शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

तटरक्षक दल सदैव जागरूक असणे महत्त्वाचे

By admin | Updated: February 22, 2017 04:36 IST

देशातील बंदरे विकसित आणि सुरक्षित असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी तटरक्षक दल नेहमी सदैव

वास्को (गोवा) : देशाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देणाऱ्या आयात-निर्यातीसाठी बहुतांशी जलमार्गाचा वापर केला जातो. त्यामुळे देशातील बंदरे विकसित आणि सुरक्षित असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी तटरक्षक दल नेहमी सदैव जागरूक असणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंगळवारी येथे केले़वास्को येथील गोवा शिपयार्ड कंपनीने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेल्या ‘आयसीजीएस शौनक’ या गस्ती नौकेच्या हस्तांतरण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राजेंद्र सिंह, नौदलाचे गोवा विभागीय ध्वजाधिकारी रिअर अ‍ॅडमिरल पुनितकुमार बहल, तटरक्षक दलाचे संयुक्त महासंचालक के . नटराजन, गोवा शिपयार्डचे कार्यकारी संचालक निवृत्त रिअर अ‍ॅडमिरल शेखर मित्तल व शौनक जहाजाचे नेतृत्व करणारे कमांडिंग आॅफि सर उपमहासंचालक टेकुर शशीकुमार आदी उपस्थित होते़ संरक्षण मंत्रालयाने भारतीय तटरक्षक दलासाठी ६ अत्याधुनिक गस्ती नौका बांधण्याचे काम गोवा शिपयार्ड कंपनीकडे दिले असून या मालिकेतील ‘आयसीजीएस शौनक’ ही चौथी नौका आहे़ ही नौका मुदतीपूर्वी ६२ दिवस आधीच बांधून पूर्ण करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)‘आयसीजीएस शौनक’ची वैशिष्ट्ये१०५ मीटर लांबीची ही नौका पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे़ त्यावर अत्याधुनिक जलवाहतुकीची व दळणवळणाची यंत्रणा, सेन्सर आणि अन्य यंत्रसामग्री आहे़ या नौकेवर ३० मिमी क्षमतेची नौदल तोफ, इंटिग्रेटेड ब्रीज सिस्टम, इंटिग्रेटेड मशिनरी कंट्रोल सिस्टम, पॉवर मॅनेजमेंट सिस्टम आणि हाय पावर एक्सटर्नल फ ायर फ ायटिंग पद्धतीची यंत्रणाही आहे़ तसेच दोन इंजिनाचे हेलिकॉप्टर आणि पाच वेगवान बोटी वाहून नेण्याची सुविधाही नौकेवर आहे़ या नौकेची कमाल वेग २६ सागरी मैल आहे. नौकेवर १४ अधिकारी आणि ९८ जवान तैनात असतील.