शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

युती सरकारांचे बुरसटलेले राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 20:44 IST

राजकारणी ही या पृथ्वीतलावरची सगळ्यांत हीन प्रजाती असल्याचे विधान अमेरिकन जनरल जॉर्ज पॅटननी केले होते.

राजकारणी ही या पृथ्वीतलावरची सगळ्यांत हीन प्रजाती असल्याचे विधान अमेरिकन जनरल जॉर्ज पॅटननी केले होते. त्या बिरबलाच्या कथेतील हौदातल्या माकडीणीप्रमाणे नाकापर्यंत पाणी चढायला लागले की स्वत:च्या स्वार्थापोटी सगळी मूल्ये, तत्त्वे पायदळी तुडवणाऱ्या राजकारण्यांच्या देशातील इतर भागांतल्या कारवाया आपण पाहात आलोय.

गोव्याच्या दिवंगत मुख्यमंत्र्यांच्या अंत्यविधीच्या दिवशी हा प्रकार आपल्या येथे जवळून पाहायला मिळाला. अंतिम दर्शनासाठी लोटलेल्या जनसमुदायात दोन प्रकारच्या भावना प्रकर्षाने दिसल्या. आप्तेष्ट आणि जनसामान्यांच्या चेहऱ्यावर दु:ख ओसंडत होते; पण यात एक चमू असाही होता जो दु:खग्रस्त कमी आणि चिंताग्रस्त जास्त दिसत होता. तो होता जनप्रतिनिधी आणि मंत्रिगणांचा. त्यातले सत्तापक्ष आणि युतीतले ज्येष्ठ आपली पुढची चाल ठरवण्यात व्यग्र असावेत तर कनिष्ठ ‘अब अपना क्या होगा’ या विवंचनेत.

राजकारण्यांतर्फे श्रध्दासुमने, भावभीनित श्रध्दांजली वाहणे जगाला दाखवले जात असताना पडद्यामागे मात्र सरकार स्थापनेसाठी युती घडवून आणण्याचे अनेक अंकी बहुपात्रीय भन्नाट राजकीय नाट्य चालू होते. त्यात साम, दाम, दंड, भेद समावेशी सामोपचार, शह, काटशह, दगाबाजी, सस्पेन्स असलेले सगळे सीन होते. मुख्य म्हणजे पटकथा उत्स्फूर्त असल्याने वेळ जात होता तसा तिच्यात बदल घडवले जात होते. भाजप आणि काँग्रेस यांना मुळात भीती वाटत होती ती रात्रीच्या काळोखात खंजीर घेऊन हिंडणाºया स्वकीयांची. कोण कोणत्या घटकेला आपल्या पाठीत खंजीर खुपसून विरोधकांच्या तंबूची वाट धरेल याचा नेम नव्हता.

तिथे सरणावरच्या निखाऱ्यांची धग निवलीही नव्हती आणि येथे नव्या मुख्यमंत्र्यांचा आणि काही भावी मंत्र्यांचा शपथविधीही पार पडला. कारण उद्याची शाश्वती नव्हती. ‘कल किसने देखा है’ म्हणतात ते यासाठीच.त्यात विशेष म्हणजे नवा दिवस उजाडला तो राज्याच्या ‘उध्दारा’साठी दोन नव्या कोºया उपमुख्यमंत्र्यांचे लेणे घेऊन. सत्तास्वाद घ्यायला निघालेल्या काँग्रेसवाल्यांचे तोंड परत एकदा आंबट झाले. त्यांच्यात सर्वच स्वयंघोषित मुख्यमंत्री आणि मंत्रिगण भरलेत. त्यामुळे कसलाही निर्णय झाल्यास कोणीतरी हमखास काडी घालतो. त्यांना सरकार स्थापण्यासाठी केवळ एक मार्ग उरतो. तीन मुख्यमंत्री बनवायचे आणि सहा उपमुख्यमंत्री.

स्व. पर्रीकर हे साध्या राहणीचे, मनमिळावू, कामात स्वत:ला झोकून देणारे गुणी माणूस होते यात मुळीच शंका नाही; पण राजकारणातील अपरिहार्यतेमुळे घ्याव्या लागणाºया निर्णयांमुळे या गुणानां कुठेतरी ग्रहण लागले. राजकारणात हरिश्चंद्रांना स्थान नसते. तेथे वावरत असतात ते धूर्त मॅकियावेली आणि चाणक्य. गेल्या विधानसभेत कमी जागा पदरी पडल्यामुळे सत्तास्थापनेच्या निकडीपोटी युती घडवून आणण्याच्या दिशेने पर्रीकरांना स्वत: ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले अशांना आणि खुद्द त्यांच्यावर आरोप करणाºयांना निमंत्रित करून त्यांच्या पंक्तीत बसून युतीचे घोंगडे विणण्याची नामुष्की ओढवून घ्यावी लागली होती. कैकवेळा राजकारणातील असहायतेमुळे दिलेला शब्द उचलून धरता आला नसल्याने यू टर्न घ्यायचीही पाळी आली. सरकारचा राजधर्म पाळणेसारख्या वाक्प्रचारांचा हल्ली सुळसुळाट वाढलाय. खरे तर युती सरकार म्हणजे मतदारांवर उपकार करत असल्याचा आव आणत स्वार्थासाठी मूल्ये, तत्त्वे खुंटीला टांगून एकत्र आलेला जमावडा एवढीच काय ती त्याची व्याख्या.

निवडणुकांत मत टाकून झाल्यावर मतदाराच्या बोटाला शाईचा स्पर्श होताच आपल्या लोकशाहीतील मतदानाच्या हक्काचा, कर्तव्याचा भाग येथेच संपतो. तद्नंतर आमदाराने पक्ष बदलत कितीही कोलांट्या उड्या मारल्या तरी स्थितप्रज्ञ मतदाराला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. त्यामुळे विरोधकांशी संधान साधण्यापूर्वी आपल्या मतदारांशी संवाद साधण्याची गरजही आज आमदाराला तशी वाटत नसते. समजा मतदार नाराज झालाच तर पुढची निवडणूक येईपर्यंत त्याची समजूत यशस्वीपणे कशी काढायची ती कला त्याला आज अवगत झालीय. त्यामुळे दोन-तीन पक्षांची वारी करूनही यशस्वीरीत्या अनेक वर्षे राजकारणात फतकल मारून बसलेले अनेक महारथी आपण पाहतोय.सगळ्या पक्षांत पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांचा गट असतो. पक्षाचे आमदार, नेते यांच्यावर हे बंधन नसते. हल्ली काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या शिरोडकर, सोपटे द्वयींची मागच्या निवडणुकीत खिल्ली उडवणारे भाजपचे कार्यकर्ते आता त्यांना डोक्यावर घेऊन नाचतील तर या उलट मागच्या निवडणुकीत त्यांचा जयजयकार करत गळा फाडणारे काँग्रेस कार्यकर्ते आता त्याच्या नावाने शंख करतील. घटक पक्षांचे रुसवे फुगवे दूर करणे, समेट घडवून आणणे ही तारेवरची कसरत करण्यातच युती सरकारांचा वेळ जात असल्याने जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तसा तो कमीच उरतो. पण युतीविना यापुढेही या गोव्यात सरकार घडणे अशक्यप्राय. हे पचनी पाडून घेतल्याशिवाय जनतेलाही दुसरा पर्याय नाही.

- दीपक लाड (राजकीय भाष्यकार)

टॅग्स :goaगोवा