शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

तेरेखोलमधून बंदोबस्तात कोळसा वाहतूक

By admin | Updated: February 9, 2015 01:12 IST

महाराष्ट्र सागरी संरक्षण पोलिसांची दमदाटी

मांद्रे : तेरेखोल नदीमधून बेकायदा बार्जवाल्यांनी माशांची जाळी उद््ध्वस्त करून महाराष्ट्र कोस्टल दलाच्या पोलिसांच्या मदतीने मच्छीमारांना दमदाटी करून रविवारी कोळशाची बेकायदा वाहतूक केली. दुपारी १२.३० वा. केरी तेरेखोलचे पंच सदस्य डायगो फ्रान्सिस रॉड्रिगीस, पंच सदस्य यशवंत नार्वेकर, पंच सदस्य रत्नाकर हर्जी, तसेच समाजसेवक जनार्दन कासकर व इतर बेकायदा बार्ज वाहतुकीबद्दल जाब विचारण्यासाठी बार्जजवळ गेले असता बार्जच्या कॅप्टनने महाराष्ट्र सागरी पोलिसांना बोलावून घेतले. त्या पोलीस अधिकाऱ्यांनी पंच मंडळींना सहकार्य न करता उलट हुसकावण्याचा प्रयत्न केला. पंचायत मंडळाने ग्रामसभेमध्ये तेरेखोल नदीतून कुठल्याही प्रकारच्या खनिज वाहतुकीसाठी निर्बंध घालण्याचा ठराव संमत केला असल्याचे सांगितले. मात्र, महाराष्ट्र सागरी पोलीस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. एका पंचाने ‘तुम्ही गोव्याच्या हद्दीत येऊन दादागिरी करता’, असे सांगताच वातावरण तंग बनले होते. किरणपाणी जेटीवर संपूर्ण कोळसा खाली केल्यानंतर पुन्हा कोळसा आणण्यासाठी समुद्रामध्ये बार्ज निघाली. तेरेखोल किल्ल्याच्या जवळ समुद्रातील दगडावर बार्ज आपटून अडकून पडली. समुद्राच्या लाटांमुळे बार्ज खडकांवर आपटून खडक फुटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे किल्ल्याच्या बुरुंजालाही धोका पोहचू शकतो, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे. गोव्यातील नदीशी निगडित असलेली सगळी खाती निस्तेज किंवा बरबटलेली आहेत, असा आरोप पंच रॉड्रिगीस यांनी केला. गोवा सरकारच्या सगळ््या खात्यांना बेकायदा बार्ज (खनिज) मधून कोळसा वाहतुकीसंदर्भात दूरध्वनी करूनही काहीच उपयोग झाला नाही, असे ते म्हणाले. या कोळसा वाहतुकीकडे संबंधित खाती जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे सांगून ते म्हणाले की, रिकामी बार्ज लाटांमुळे खडकांवर आपटून धोका निर्माण होऊ शकतो. दरम्यान, या बेकायदा कोळसा वाहतुकीवर निर्बंध घालण्याची मागणी मच्छीमारांनी केली. (प्रतिनिधी)