शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सरकारी धोरणांची मुख्यमंत्र्यांना माहिती नाही: विजय सरदेसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2024 09:28 IST

हे सरकार केवळ राम भरोसे चालत आहे, असा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भटक्या कुत्र्यांवर आळा घालण्यासाठी राज्य सरकारने दि. ६ जुलै २०२३ रोजी नवीन धोरण तयार केले होते. परंतु, याबाबत मी जेव्हा पशुसंवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना विचारले असता, त्यांनी सदर धोरण आपल्या खात्यांतर्गत येत नसल्याचे सांगून, आपली जबाबदारी पंचायत व पालिकेवर ढकलली. यापेक्षाही कळस म्हणजे मुख्यमंत्र्यांना देखील या धोरणाबाबत माहिती नाही. त्यांनी पूर्वी अशी योजना किंवा धोरण आहे की नाही? याची चौकशी न करताच नवीन धोरण राबविण्याचे जाहीर केले. यावरून स्पष्ट होते की हे सरकार केवळ राम भरोसे चालत आहे, असा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी केला.

भटक्या कुत्र्यांवर आळा घालण्यासाठी उच्च न्यायालयाने दि. २३ सप्टेंबर २०२२ रोजी राज्य सरकारला आदेश जारी करत एक धोरण राबविण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार धोरणही राबविण्यात आले. विधानसभेत जेव्हा हा विषय आला, त्यावेळी याची माहितीच कुणाला नाही. सरकारने स्वतःच तयार केलेले धोरण मुख्यमंत्र्यांनाच माहीत नाही. एक वर्षांपूर्वी तयार केलेल्या धोरणावेळी असलेले पशुसंवर्धन मंत्री, मुख्यमंत्री, मुख्य सचिव अजूनही तेच आहे, यात काहीच बदल नाही, तरीदेखील यांना कोणालाच या धोरणाबाबत माहित नाही असेही सरदेसाई यांनी सांगितले.

धोरणांबाबत सरकारच निष्काळजी

राज्यातील धोरणांबाबत सरकार निष्काळजीपणा करत आहे, असे वाटायला लागले आहे. प्रशासनाला मुख्यमंत्र्यांची भीती राहिलेली नाही. उलट प्रशासन एक प्रकारे मुख्यमंत्र्यांची खिल्लीच उडवित आहे. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. अन्यथा याचा परिणाम पर्यटन क्षेत्रावर देखील होऊ शकतो. एकीकडे सरकार राज्य रेबिसमुक्त म्हणून घोषित करते, आणि दुसरीकडे तळागाळात कुत्र्यांवर आळा घालण्यासाठी कुठलीच उपाययोजना होत नाही, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण