शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी धोरणांची मुख्यमंत्र्यांना माहिती नाही: विजय सरदेसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2024 09:28 IST

हे सरकार केवळ राम भरोसे चालत आहे, असा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भटक्या कुत्र्यांवर आळा घालण्यासाठी राज्य सरकारने दि. ६ जुलै २०२३ रोजी नवीन धोरण तयार केले होते. परंतु, याबाबत मी जेव्हा पशुसंवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना विचारले असता, त्यांनी सदर धोरण आपल्या खात्यांतर्गत येत नसल्याचे सांगून, आपली जबाबदारी पंचायत व पालिकेवर ढकलली. यापेक्षाही कळस म्हणजे मुख्यमंत्र्यांना देखील या धोरणाबाबत माहिती नाही. त्यांनी पूर्वी अशी योजना किंवा धोरण आहे की नाही? याची चौकशी न करताच नवीन धोरण राबविण्याचे जाहीर केले. यावरून स्पष्ट होते की हे सरकार केवळ राम भरोसे चालत आहे, असा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी केला.

भटक्या कुत्र्यांवर आळा घालण्यासाठी उच्च न्यायालयाने दि. २३ सप्टेंबर २०२२ रोजी राज्य सरकारला आदेश जारी करत एक धोरण राबविण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार धोरणही राबविण्यात आले. विधानसभेत जेव्हा हा विषय आला, त्यावेळी याची माहितीच कुणाला नाही. सरकारने स्वतःच तयार केलेले धोरण मुख्यमंत्र्यांनाच माहीत नाही. एक वर्षांपूर्वी तयार केलेल्या धोरणावेळी असलेले पशुसंवर्धन मंत्री, मुख्यमंत्री, मुख्य सचिव अजूनही तेच आहे, यात काहीच बदल नाही, तरीदेखील यांना कोणालाच या धोरणाबाबत माहित नाही असेही सरदेसाई यांनी सांगितले.

धोरणांबाबत सरकारच निष्काळजी

राज्यातील धोरणांबाबत सरकार निष्काळजीपणा करत आहे, असे वाटायला लागले आहे. प्रशासनाला मुख्यमंत्र्यांची भीती राहिलेली नाही. उलट प्रशासन एक प्रकारे मुख्यमंत्र्यांची खिल्लीच उडवित आहे. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. अन्यथा याचा परिणाम पर्यटन क्षेत्रावर देखील होऊ शकतो. एकीकडे सरकार राज्य रेबिसमुक्त म्हणून घोषित करते, आणि दुसरीकडे तळागाळात कुत्र्यांवर आळा घालण्यासाठी कुठलीच उपाययोजना होत नाही, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण