शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

सरकारी धोरणांची मुख्यमंत्र्यांना माहिती नाही: विजय सरदेसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2024 09:28 IST

हे सरकार केवळ राम भरोसे चालत आहे, असा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भटक्या कुत्र्यांवर आळा घालण्यासाठी राज्य सरकारने दि. ६ जुलै २०२३ रोजी नवीन धोरण तयार केले होते. परंतु, याबाबत मी जेव्हा पशुसंवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना विचारले असता, त्यांनी सदर धोरण आपल्या खात्यांतर्गत येत नसल्याचे सांगून, आपली जबाबदारी पंचायत व पालिकेवर ढकलली. यापेक्षाही कळस म्हणजे मुख्यमंत्र्यांना देखील या धोरणाबाबत माहिती नाही. त्यांनी पूर्वी अशी योजना किंवा धोरण आहे की नाही? याची चौकशी न करताच नवीन धोरण राबविण्याचे जाहीर केले. यावरून स्पष्ट होते की हे सरकार केवळ राम भरोसे चालत आहे, असा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी केला.

भटक्या कुत्र्यांवर आळा घालण्यासाठी उच्च न्यायालयाने दि. २३ सप्टेंबर २०२२ रोजी राज्य सरकारला आदेश जारी करत एक धोरण राबविण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार धोरणही राबविण्यात आले. विधानसभेत जेव्हा हा विषय आला, त्यावेळी याची माहितीच कुणाला नाही. सरकारने स्वतःच तयार केलेले धोरण मुख्यमंत्र्यांनाच माहीत नाही. एक वर्षांपूर्वी तयार केलेल्या धोरणावेळी असलेले पशुसंवर्धन मंत्री, मुख्यमंत्री, मुख्य सचिव अजूनही तेच आहे, यात काहीच बदल नाही, तरीदेखील यांना कोणालाच या धोरणाबाबत माहित नाही असेही सरदेसाई यांनी सांगितले.

धोरणांबाबत सरकारच निष्काळजी

राज्यातील धोरणांबाबत सरकार निष्काळजीपणा करत आहे, असे वाटायला लागले आहे. प्रशासनाला मुख्यमंत्र्यांची भीती राहिलेली नाही. उलट प्रशासन एक प्रकारे मुख्यमंत्र्यांची खिल्लीच उडवित आहे. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. अन्यथा याचा परिणाम पर्यटन क्षेत्रावर देखील होऊ शकतो. एकीकडे सरकार राज्य रेबिसमुक्त म्हणून घोषित करते, आणि दुसरीकडे तळागाळात कुत्र्यांवर आळा घालण्यासाठी कुठलीच उपाययोजना होत नाही, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण