शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

शिवरायांची अ‍ॅलर्जी कशाला? छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय दैवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2024 1:51 PM

छत्रपती शिवरायांचा लाखो गोमंतकीयांना अभिमान आहे.

छत्रपती शिवरायांचा लाखो गोमंतकीयांना अभिमान आहे. उर्वरित देशाप्रमाणे गोव्यातही शिवाजी महाराजांची भक्ती वाढतेय, छत्रपती शिवाजी केवळ महाराष्ट्र किंवा मराठा साम्राज्यापुरते मर्यादित नव्हतेच. शिवाजी हे राष्ट्रीय दैवत आहे. ते जागतिक कीर्तीचे योद्धे आणि कुशल प्रशासक होते. रयतेचे राजे होते. त्यांना युगप्रवर्तक म्हटले जाते, हे त्यांच्या मूठभर विरोधकांना सांगावेसे वाटते. 

सासष्टी तालुक्यातील सां जुझे दी आरियल भागात काल तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ज्या छत्रपतींच्या गुणांची व तेजाची पूजा केली जाते, त्याच गोव्यात काही अवघ्याच शक्ती अशा आहेत, ज्यांना छत्रपतींविषयी पूर्ण ज्ञान नाही. ते केवळ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक नव्हते, तर अखिल मानवजातीच्या कल्याणाचा विचार त्यांच्याकडे होता. ते सर्व धर्माना समान न्याय देत असत. त्यांच्या सैनिकांमध्ये मुस्लीम बांधवही होते. 

छत्रपती शिवाजीविषयी ज्यांचे वाचन नाही, ज्ञान नाही असे काही घटक पूर्वीपासून ख्रिस्ती समाज बांधवांचा बुद्धिभेद व दिशाभूल करत आले आहेत. शिवाजी म्हणजे महाराष्ट्र एवढेच समीकरण काही ख्रिस्ती बांधवांसमोर पूर्वीपासून मांडले गेले आहे. अगदी अलीकडेदेखील एका म्हालगड्याने मुलाखतीत शिवाजी महाराजांचा गोव्याशी संबंधच नव्हता, असा दावा केला होता. गोव्यात शिवभक्ती वाढवताना आम्हाला वाद वाढवायचा नाही, मात्र, छत्रपतीविषयी ज्यांनी गैरसमज निर्माण केले आहेत, त्यांनी ते दूर करण्याचे कामही आता करायला हवे. जिजामाता, शहाजीराजे, शिवाजी महाराज, संभाजीराजे यांचा इतिहास खिस्ती बांधवांनाही समजून सांगावा लागेल. 

शिवाजी महाराज राष्ट्रवादी होते, देशप्रेमी होते, भारतीय भूमीत त्यांचा जन्म झाला होता व भारताच्या भूमीतच त्यांनी आपले शौर्य गाजविले. पराक्रम केले. त्यांची प्रतिमा एखाद्या वाड्यावर किंवा चौकात उभे राहणे हे अभिमानास्पद आहे, गौरवशाली आहे. त्याला नाक मुरडण्याचे कारण नाही, खिस्ती धर्मीयांच्या लोकवस्तीच्या परिसरातही शिवाजी महाराजांची प्रतिमा उभी केली जात असेल तर आक्षेप घेण्याचे कारण नाही. अर्थात हे काम करताना ग्रामपंचायत किंवा पालिका यांना विश्वासात घ्यावेच लागेल. त्यांच्याकडून परवानगीही घ्यावी लागेल. मोकळ्या जागेत छत्रपतींचा पुतळा उभा करण्यास आक्षेप असण्याचे कारण नाही, फक्त कायदेशीर सोपस्कार पार पाडावे लागतील. 

अलीकडे रस्त्यांच्या बाजूने जिकडे तिकडे क्रॉस उभे केले जातात. ते अपघातांनाही कारणीभूत ठरतात काही ठिकाणी घुमट्चादेखील आहेत. पण शिवाजी महाराजांची प्रतिमा किंवा अश्वारूढ पुतळा सुरक्षित ठिकाणी उभा केला जात असेल तर वाद घालण्याचे कारण नाही, जे वाद घालतात त्यांना कायद्याच्याच भाषेत समजवावे लागेल, दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुका हा गोव्याचाच अविभाज्य भाग आहे. तिथे सां जुझे दी आरियल गावात शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यावर बंदी नाही. एखादे क्षेत्र म्हणजे कुणा ठरावीक लोकांचे खासगी भाट नव्हे. काही तालुक्यांमध्ये साडेचारशे वर्षे पोर्तुगीजांची सत्ता होती. बाटाबाटी झाली. अनेकांचे सक्तीने धर्मातर झाले. 

पोर्तुगीजांचे पाय गोव्याच्या भूमीला लागले नसते तर या प्रदेशाची संस्कृती व इतिहास त्याकाळी (म्हणजे ४५० वर्षात) दूषित झालाच नसता. बाटाबाटी झाली नसती तर गोव्यात सर्वत्र एकच संस्कृती अनुभवास आली असती. भारतीय संस्कृती हाच गोव्याचा आत्मा आहे. गोवा मुक्त झाल्यानंतर देशाच्या मुख्य प्रवाहात आपण सामील झालो, काही जणांची मानसिकता अजून बदलत नसेल तर ती बदलावी लागेल. सां जुझे दी आरियलमध्ये जर बेकायदा पुतळा उभा केला गेला असेल तर त्याबाबत पंचायत काय ती भूमिका घेईल. तिथे जमावाचे काम नाही, आपल्या परिसरातील किती बेकायदा बांधकामांविषयी लोक जागृत असतात? 

कोमुनिदाद जमिनीतील बेकायदा बांधकामे हटवण्याचा आदेश शेवटी न्यायालयांना द्यावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराज फक्त ५० वर्षे जगले. नशिबाने थोडी साथ दिली असती तर गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त करण्याचे काम शिवाजी महाराज व संभाजीराजेंनीच करून टाकले असते आणि तसे घडले असते तर आज केवळ पुतळे नव्हे तर गोव्यात अनेक ठिकाणी छत्रपतींची मंदिरे उभी करावी लागली असती.

टॅग्स :goaगोवाShivjayantiशिवजयंती