शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

मंत्र्याकडून घरचा अहेर; आक्रमक भूमिका अन् पक्षांतर्गत नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2024 07:31 IST

हा संघर्ष वाढू शकतो.

लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या ४ रोजी लागेल. गोव्यातील कोणत्या मंत्र्याने व आमदाराने प्रचार काम नीट केले होते व कुणी केले नाही, हे निकालातून कळेलच; मात्र सरकारमधील काही मंत्री सध्या ज्या पद्धतीने बोलू लागलेत, ते पाहता निकालानंतर बरेच काही घडू शकते, असे म्हणण्यास वाव आहे. मंत्री गोविंद गावडे यांनी काल-परवा काही विधाने केली आहेत. अर्थात गावडे हे निवडणुकीविषयी बोलले नाहीत; पण एका सरकारी खात्यावर जाहीरपणे जबरदस्त दुगाण्या झाडत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. 

तशातच सभापती रमेश तवडकर यांना यापुढील काळात मंत्रिपद मिळू शकते, अशा चर्चेचे पिल्लू काहीजणांनी सोडून गावडे यांना अस्वस्थ करण्याचा प्रयत्न केला आहे; पण गावडे यांनी त्याबाबत चिंता केलेली नाही. मंत्रिमंडळाची फेररचना होईल या फक्त अफवा आहेत, असे त्यांना वाटते. तो विषय वेगळा आहे; पण गावडे यांनी 'लोकमत'च्या प्रतिनिधीशी बोलताना पक्षाच्या नेतृत्वाविषयीही विधान केले आहे. आपल्याविरुद्ध राजकारण चाललेय; पण पक्षाचे नेतृत्व त्याबाबत गप्पच आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. तवडकर व माजी मंत्री दीपक ढवळीकर यांनी एकत्र येऊन प्रियोळ मतदारसंघात श्रमधामच्या नावाखाली काही घरे बांधण्याचे काम हाती घेतले. आपल्याला त्यावेळी डावलले गेले, अशी गावडे यांची भावना झाली असून, त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हा संघर्ष वाढू शकतो.

मंत्री गावडे स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्धच आहेत. आपले विचार बेधडक बोलून दाखवतात. उटा संघटनेचा प्रेरणा दिन कार्यक्रम शनिवारी फोंड्यात झाला. त्यावेळी गावडे यांनी आदिवासी कल्याण खात्याला शाब्दिक फटके दिले. एसटी समाजबांधवांच्या मागण्या मान्य होत नाहीत, त्यांना खात्याकडून न्याय मिळत नाही, अशी खंत गावडे यांनी जाहीरपणे व्यक्त केली. काही अधिकारी रात्री मद्यप्राशन करतात. त्यामुळे दुसऱ्या दिवशी हँग ओव्हरमध्ये असताना काम करू शकत नाहीत, असे मंत्री गावडे थेट बोलले आहेत. एसटी समाजाचा वापर केवळ मतांसाठी केला जाऊ नये. पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ समाजबांधवांवर आणू नका, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. 

मंत्री म्हणजेच सरकार असते; मात्र प्रशासनस्तरावरून जलदगतीने कामे होत नाहीत असे जेव्हा एखाद्या मंत्र्याला वाटू लागते, तेव्हा सब कुछ ठीक नहीं है, हे कळून येतेच. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे आदिवासी कल्याण खाते आहे. हे खाते मुद्दाम मुख्यमंत्र्यांनी गावडे यांना सोपवलेले नाही. या खात्याकडून सभापती तवडकर कामे करून घेतात; मात्र गावडे यांची कामे या खात्याकडून केली जात नसावीत, अशी शंका लोकांना येते. मंत्री गावडे यांनी मनातील उद्रेक कडक शब्दांत व्यक्त केला आहे. एसटी बांधवांवर कुणी अधिकारी मुद्दाम अन्याय करीत असतील, तर मुख्यमंत्री सावंत यांना त्याकडे लक्ष द्यावे लागेल. अधिकाऱ्यांना व एकूणच खात्याला सक्रिय करावे लागेल. 

गोविंद गावडे म्हणतात की, आपण एसटी समाजबांधवांमध्ये जो रोष आहे, तो आपण मांडत आहे गावडे यांचे म्हणणे खरेच आहे; पण त्यांच्याविरोधात राजकारण करण्यासाठी काही राजकारणी हाच रोष वापरात आणण्याची शक्यता आहे. शनिवारी प्रेरणा दिन कार्यक्रमाला मुख्यमंत्री सावंत उपस्थित नव्हते. याबाबत 'उटा'च्या काही नेत्यांनीही खंत व्यक्त केली आहेच. मुख्यमंत्री मुद्दाम प्रेरणा दिन कार्यक्रमापासून दूर राहिले की काय, अशी शंका लोकांना येते. याबाबतही मुख्यमंत्र्यांनी एसटी बांधवांसमोर भूमिका मांडण्याची गरज आहे. 

लोकसभा निवडणुकीवेळी सर्वच भाजप नेते एसटी समाजबांधवांना गोंजारत होते. मतदान झाल्यानंतर आता त्यांच्याकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी सरकारला घ्यावी लागेल. तवडकर यांचा श्रमदान कार्यक्रम खरोखरच चांगला आहे, गरजूंना घरे बांधून देण्याचे दैवी कामच ते करीत आहेत. काणकोणप्रमाणेच प्रियोळमध्येही हे काम होत आहे; मात्र याकामी चक्क दीपक ढवळीकर यांनाही तवडकर यांनी सोबत घेतल्याने गावडे यांच्या संतापाचा उद्रेक होऊ लागला आहे.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपा