शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

वननिवासींचे दावे ३१ मार्चपर्यंत निकालात काढणार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By किशोर कुबल | Updated: January 5, 2024 16:16 IST

येत्या २६ रोजी प्रजासत्ताकदिनी विशेष ग्रामसभा

किशोर कुबल/पणजी

पणजी : वननिवासींचे जमिनींचे दावे येत्या ३१ मार्चपर्यंत निकालात काढले जातील. त्यासाठी वन हक्क समित्यांवरील सदस्य तसेच ग्रामसभेत ग्रामस्थांनीही सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. येत्या २६ रोजी प्रजासत्ताकदिनी वन निवासी आदिवासींचे वास्तव्य असलेल्या पंचायतींच्या ग्रामसभा घेऊन या दाव्यांचा सोक्षमोक्ष लावावा, असे त्यांनी म्हटले आहे.

वन निवासींच्या दाव्यांच्या बाबतीत उच्चस्तरीय बैठक काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत दावे निकालात करण्यासंबंधी असलेल्या अडचणींबाबत चर्चा- विनिमय झाला व त्या कशा दूर कराव्यात याविषयी चिंतन झाले.

बैठकीनंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलताना म्हणाले की,' अनेकदा वन हक्क प्रतिनिधी बैठकांना उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे दावे रेंगाळतात. प्रत्येक गावात अशा समित्या स्थापन केलेल्या आहेत. त्यावरील सदस्यांनी सहकार्य करायला हवे. तसेच ग्रामसभांमध्ये आवश्यक ती गणपूर्ती व्हायला हवी. त्यासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य करायला हवे.' 

राज्यात वनांमध्ये निवास करणारे अनेकजण तेथे जमिनीही कसतात. तेथे त्यांची वस्ती आहे. निवासी हक्क कायद्यानुसार त्यांना जमिनीच्या सनदा मिळणे क्रमप्राप्त आहेत. परंतु गेली अनेक वर्षे हे दावे पडून आहेत. स्पॉट वेरिफिकेशन अर्थात जागेची पडताळणी, ग्रामसभांमध्ये मंजुरी, त्यानंतर उपजिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील दावे मंजूर झाल्यानंतर सनदा दिल्या जातात.

मुख्यमंत्री म्हणाले की, 'सरकार वन निवासींना जमिनीचे हक्क देण्याबाबत पूर्णपणे सहकार्य करीत आहे. आदिवासी लोकांनीही सहकार्य करावे. या कमी जनतेच्या सहकार्याची अपेक्षा आम्ही करत आहोत.'

वन क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्यांनी का  जमिनींच्या हक्कासाठी दावे सादर केले आहेत. यात पारंपरिक शेतकºयांचाही समावेश आहे. गेली कित्येक वर्षे हे लोक वन क्षेत्रात वास्तव्य करीत असून तेथे शेतीही करीत आहेत. प्रामुख्याने काणकोण, धारबांदोडा, सांगे, केपें, फोंडा व सत्तरी या तालुक्यांमधून हे दावे आलेले आहेत. यात गावडा, कुणबी, वेळीप आदिवासींची संख्या जास्त आहे.

 दरम्यान, वन निवासी हक्क कायदा अंमलबजावणी तसेच अनुसूचित जमातींच्या लोकांना सरकारी नोकºयांमध्ये असलेल्या राखीवतेचा अनुशेष भरुन काढण्याच्या बाबतीत राज्य सरकारची कामगिरी समाधानकारक नसल्याचे निरीक्षण नोंदवित राष्ट्रीय आदिवासी आयोगाने याबाबत याआधी नाराजी व्यक्त केलेली आहे.

अशी आहे आकडेवारी

एकूण दावे                १०,१३६जागेवर पडताळणी       ६,५४३ग्रामसभेत आलेले दावे    ३२९३उपजिल्हाधिकाऱ्यांकडे असलेले दावे  १७७३