शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

वननिवासींचे दावे ३१ मार्चपर्यंत निकालात काढणार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By किशोर कुबल | Updated: January 5, 2024 16:16 IST

येत्या २६ रोजी प्रजासत्ताकदिनी विशेष ग्रामसभा

किशोर कुबल/पणजी

पणजी : वननिवासींचे जमिनींचे दावे येत्या ३१ मार्चपर्यंत निकालात काढले जातील. त्यासाठी वन हक्क समित्यांवरील सदस्य तसेच ग्रामसभेत ग्रामस्थांनीही सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. येत्या २६ रोजी प्रजासत्ताकदिनी वन निवासी आदिवासींचे वास्तव्य असलेल्या पंचायतींच्या ग्रामसभा घेऊन या दाव्यांचा सोक्षमोक्ष लावावा, असे त्यांनी म्हटले आहे.

वन निवासींच्या दाव्यांच्या बाबतीत उच्चस्तरीय बैठक काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत दावे निकालात करण्यासंबंधी असलेल्या अडचणींबाबत चर्चा- विनिमय झाला व त्या कशा दूर कराव्यात याविषयी चिंतन झाले.

बैठकीनंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलताना म्हणाले की,' अनेकदा वन हक्क प्रतिनिधी बैठकांना उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे दावे रेंगाळतात. प्रत्येक गावात अशा समित्या स्थापन केलेल्या आहेत. त्यावरील सदस्यांनी सहकार्य करायला हवे. तसेच ग्रामसभांमध्ये आवश्यक ती गणपूर्ती व्हायला हवी. त्यासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य करायला हवे.' 

राज्यात वनांमध्ये निवास करणारे अनेकजण तेथे जमिनीही कसतात. तेथे त्यांची वस्ती आहे. निवासी हक्क कायद्यानुसार त्यांना जमिनीच्या सनदा मिळणे क्रमप्राप्त आहेत. परंतु गेली अनेक वर्षे हे दावे पडून आहेत. स्पॉट वेरिफिकेशन अर्थात जागेची पडताळणी, ग्रामसभांमध्ये मंजुरी, त्यानंतर उपजिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील दावे मंजूर झाल्यानंतर सनदा दिल्या जातात.

मुख्यमंत्री म्हणाले की, 'सरकार वन निवासींना जमिनीचे हक्क देण्याबाबत पूर्णपणे सहकार्य करीत आहे. आदिवासी लोकांनीही सहकार्य करावे. या कमी जनतेच्या सहकार्याची अपेक्षा आम्ही करत आहोत.'

वन क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्यांनी का  जमिनींच्या हक्कासाठी दावे सादर केले आहेत. यात पारंपरिक शेतकºयांचाही समावेश आहे. गेली कित्येक वर्षे हे लोक वन क्षेत्रात वास्तव्य करीत असून तेथे शेतीही करीत आहेत. प्रामुख्याने काणकोण, धारबांदोडा, सांगे, केपें, फोंडा व सत्तरी या तालुक्यांमधून हे दावे आलेले आहेत. यात गावडा, कुणबी, वेळीप आदिवासींची संख्या जास्त आहे.

 दरम्यान, वन निवासी हक्क कायदा अंमलबजावणी तसेच अनुसूचित जमातींच्या लोकांना सरकारी नोकºयांमध्ये असलेल्या राखीवतेचा अनुशेष भरुन काढण्याच्या बाबतीत राज्य सरकारची कामगिरी समाधानकारक नसल्याचे निरीक्षण नोंदवित राष्ट्रीय आदिवासी आयोगाने याबाबत याआधी नाराजी व्यक्त केलेली आहे.

अशी आहे आकडेवारी

एकूण दावे                १०,१३६जागेवर पडताळणी       ६,५४३ग्रामसभेत आलेले दावे    ३२९३उपजिल्हाधिकाऱ्यांकडे असलेले दावे  १७७३