शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
4
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
5
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
6
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
7
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
8
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
9
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
10
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
11
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
12
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
13
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
14
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
15
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
16
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
17
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

आजचा अग्रलेखः चर्चिलना काय महत्त्व? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 10:17 IST

चर्चिल हे ज्योकिमचे बंधू, चर्चिल किंवा मिकी पाशेको यांच्या मागेही आता पूर्वीचा जनाधार नाही.

एक काळ असा होता की, चर्चिल आलेमाव, फ्रान्सिस सार्दिन, स्वर्गीय डॉ. विल्फ्रेड डिसोझा, ज्योकिम आलेमाव, लुईझिन फालेरो यांना गोव्याच्या राजकारणात खूपच महत्त्व होते. यापैकी सार्दिन अजून काँग्रेसचे खासदार आहेत, पण त्यांच्या मागे जनमत नाही. माजी मुख्यमंत्री लुईझिन हे अपमानित होऊन नुकतेच तृणमूल कॉंग्रेसमधून बाहेर पडले आहेत. कॉंग्रेस सोडल्यानंतर फालेरो यांचे महत्त्वच गेले. राज्यसभेचे खासदार होण्याची त्यांची हौस तेवढी पूर्ण झाली. आपली टर्म मात्र ते पूर्ण करू शकले नाहीत. फालेरो यांनी काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये जाणे ही हाराकिरी होती, असे 'लोकमत'ने याच स्तंभात म्हटले होते. ते खरे ठरले. फालेरो यांना तृणमूलमध्ये व गोव्याच्या राजकारणातही पूर्वीचे महत्त्व राहिलेले नाही. विद्यमान विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे वडील ज्योकिम आलेमाव यांचाही एकेकाळी मोठा आब होता. आता ते आजारी असल्याने राजकारणात सक्रिय नाहीत. चर्चिल हे ज्योकिमचे बंधू, चर्चिल किंवा मिकी पाशेको यांच्या मागेही आता पूर्वीचा जनाधार नाही.

चर्चिल यांनी दोन दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीसाठी आपली भूमिका जाहीर केली. निवडणूक तशी दूर असली, तरी चर्चिलना धीर धरवत नाही. चर्चिलसारखे नेते पूर्वी पडद्याआडून सेटिंगचे राजकारण करायचे. युगोडेपा पक्ष त्यासाठीच प्रसिद्ध होता. याविषयी राधाराव ग्रासियस कदाचित जास्त माहिती देऊ शकतील. आता आलेमाव उघडपणेच मैदानात उतरले आहेत. दाखव-लपत अशी भूमिका न घेता त्यांनी थेट सांगून टाकले की, आपला पाठिंबा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला राहील. मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्त्वाचे चर्चिल यांनी कौतुक केले. गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकेल व पुढील दहा-पंधरा वर्षे केंद्रात भाजपच सत्तेत असेल, असे विधान बाणावलीच्या बाणासुराने केले आहे. आमदार विजय सरदेसाई म्हणतात त्याप्रमाणे चर्चिल ज्योतिषीच बनले आहेत. चर्चिलना स्वतः ला गेल्या निवडणुकीत एका बाणावली मतदारसंघात जिंकता आले नाही. ज्या वार्का बाणावलीत त्यांचे घर आहे, त्या मतदारसंघानेदेखील त्यांना पराभूत केले. आपचे नवखे उमेदवार वेंझी व्हीएस यांनी चर्चिलना २०२२ च्या निवडणुकीत धूळ चारली. मात्र, आलेमाव यावरून काही शिकले आहेत, असे दिसत नाही. त्यांनी शिल्लक नसलेले राजकीय वजन दाखविण्यास आरंभ केला आहे.

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपची यावेळी तशी कसोटीच आहे. भाजपकडे संख्येने जास्त आमदार आहेत. त्यामुळे 'भिवपाची गरज ना' असे मुख्यमंत्री म्हणतील. दिगंबर कामत, सुदिन ढवळीकर, रवी नाईक, सुभाष शिरोडकर, रमेश तवडकर, आलेक्स रेजिनाल्ड, बाबू कवळेकर आदी सर्वच नेते सोबत आहेत. मात्र, दक्षिणेतील ख्रिस्ती मतदारांची (व काही शिक्षित हिंदूदेखील) नाडी अजून भाजपला कळलेली नाही. गृहमंत्री अमित शाह यांच्या फर्मागुडीतील सभेवेळी दक्षिणेतील आमदार हवी तेवढी गर्दी जमवू शकले नाहीत. त्यामुळेच उत्तर गोव्यातील आमदारांना सांगून भाजपला फर्मागुडीत लोक जमवावे लागले. दक्षिण गोव्यातील ख्रिस्ती मतदार त्या गर्दीत खूप कमी होते. भाजपने खूप कष्ट घेऊनदेखील ख्रिस्ती लोक शाह यांच्या सभेला जास्त आले नाहीत, याची नोंद पक्षानेही घेतली आहे. काँग्रेसने जर एखादा प्रभावी ख्रिस्ती धर्मीय उमेदवार लोकसभा निवडणुकीवेळी उभा केला तर दक्षिणेत काय होईल, याचा एक ढोबळ अंदाज काढता येतो. अर्थात निवडणूक अजून तेवढी जवळ नाही. २०१९ साली देशात मोदी लाट असतानादेखील दक्षिण गोव्यात भाजपचा पराभव झाला होता, हेही लक्षात घ्यावे लागेल.

चर्चिलनी भाजपला पाठिंबा देणे म्हणजे दक्षिणेतील ख्रिस्ती मतदार आणखी नाराज होणे, असा अर्थ होतो. निवडणुका अगदी जवळ आल्या की, खिस्ती धर्मगुरू स्वतः चे कार्ड उघड करतात. मग हे धर्मगुरू आलेक्स सिक्वेरा किंवा माविन गुदिन्हो यांचेही ऐकत नाहीत. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मंत्री नीलेश काब्राल हे कुडचडेत कसेबसे जिंकले. केपेत बलाढ्य वाटणाऱ्या बाबू कवळेकरांना गेल्या विधानसभा निवडणुकीत हिंदू मतदारांनीच पाडले. दक्षिणेतील मतदारांनी अगोदरच चर्चिलसह अनेक ख्रिस्ती नेत्यांना नाकारलेले आहे. चर्चिल व भाजपची मैत्री यातून भाजपला किती लाभ होईल, हे कदाचित निवडणुकीवेळीच कळेल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण