शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेखः चर्चिलना काय महत्त्व? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 10:17 IST

चर्चिल हे ज्योकिमचे बंधू, चर्चिल किंवा मिकी पाशेको यांच्या मागेही आता पूर्वीचा जनाधार नाही.

एक काळ असा होता की, चर्चिल आलेमाव, फ्रान्सिस सार्दिन, स्वर्गीय डॉ. विल्फ्रेड डिसोझा, ज्योकिम आलेमाव, लुईझिन फालेरो यांना गोव्याच्या राजकारणात खूपच महत्त्व होते. यापैकी सार्दिन अजून काँग्रेसचे खासदार आहेत, पण त्यांच्या मागे जनमत नाही. माजी मुख्यमंत्री लुईझिन हे अपमानित होऊन नुकतेच तृणमूल कॉंग्रेसमधून बाहेर पडले आहेत. कॉंग्रेस सोडल्यानंतर फालेरो यांचे महत्त्वच गेले. राज्यसभेचे खासदार होण्याची त्यांची हौस तेवढी पूर्ण झाली. आपली टर्म मात्र ते पूर्ण करू शकले नाहीत. फालेरो यांनी काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये जाणे ही हाराकिरी होती, असे 'लोकमत'ने याच स्तंभात म्हटले होते. ते खरे ठरले. फालेरो यांना तृणमूलमध्ये व गोव्याच्या राजकारणातही पूर्वीचे महत्त्व राहिलेले नाही. विद्यमान विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे वडील ज्योकिम आलेमाव यांचाही एकेकाळी मोठा आब होता. आता ते आजारी असल्याने राजकारणात सक्रिय नाहीत. चर्चिल हे ज्योकिमचे बंधू, चर्चिल किंवा मिकी पाशेको यांच्या मागेही आता पूर्वीचा जनाधार नाही.

चर्चिल यांनी दोन दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीसाठी आपली भूमिका जाहीर केली. निवडणूक तशी दूर असली, तरी चर्चिलना धीर धरवत नाही. चर्चिलसारखे नेते पूर्वी पडद्याआडून सेटिंगचे राजकारण करायचे. युगोडेपा पक्ष त्यासाठीच प्रसिद्ध होता. याविषयी राधाराव ग्रासियस कदाचित जास्त माहिती देऊ शकतील. आता आलेमाव उघडपणेच मैदानात उतरले आहेत. दाखव-लपत अशी भूमिका न घेता त्यांनी थेट सांगून टाकले की, आपला पाठिंबा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला राहील. मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्त्वाचे चर्चिल यांनी कौतुक केले. गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकेल व पुढील दहा-पंधरा वर्षे केंद्रात भाजपच सत्तेत असेल, असे विधान बाणावलीच्या बाणासुराने केले आहे. आमदार विजय सरदेसाई म्हणतात त्याप्रमाणे चर्चिल ज्योतिषीच बनले आहेत. चर्चिलना स्वतः ला गेल्या निवडणुकीत एका बाणावली मतदारसंघात जिंकता आले नाही. ज्या वार्का बाणावलीत त्यांचे घर आहे, त्या मतदारसंघानेदेखील त्यांना पराभूत केले. आपचे नवखे उमेदवार वेंझी व्हीएस यांनी चर्चिलना २०२२ च्या निवडणुकीत धूळ चारली. मात्र, आलेमाव यावरून काही शिकले आहेत, असे दिसत नाही. त्यांनी शिल्लक नसलेले राजकीय वजन दाखविण्यास आरंभ केला आहे.

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपची यावेळी तशी कसोटीच आहे. भाजपकडे संख्येने जास्त आमदार आहेत. त्यामुळे 'भिवपाची गरज ना' असे मुख्यमंत्री म्हणतील. दिगंबर कामत, सुदिन ढवळीकर, रवी नाईक, सुभाष शिरोडकर, रमेश तवडकर, आलेक्स रेजिनाल्ड, बाबू कवळेकर आदी सर्वच नेते सोबत आहेत. मात्र, दक्षिणेतील ख्रिस्ती मतदारांची (व काही शिक्षित हिंदूदेखील) नाडी अजून भाजपला कळलेली नाही. गृहमंत्री अमित शाह यांच्या फर्मागुडीतील सभेवेळी दक्षिणेतील आमदार हवी तेवढी गर्दी जमवू शकले नाहीत. त्यामुळेच उत्तर गोव्यातील आमदारांना सांगून भाजपला फर्मागुडीत लोक जमवावे लागले. दक्षिण गोव्यातील ख्रिस्ती मतदार त्या गर्दीत खूप कमी होते. भाजपने खूप कष्ट घेऊनदेखील ख्रिस्ती लोक शाह यांच्या सभेला जास्त आले नाहीत, याची नोंद पक्षानेही घेतली आहे. काँग्रेसने जर एखादा प्रभावी ख्रिस्ती धर्मीय उमेदवार लोकसभा निवडणुकीवेळी उभा केला तर दक्षिणेत काय होईल, याचा एक ढोबळ अंदाज काढता येतो. अर्थात निवडणूक अजून तेवढी जवळ नाही. २०१९ साली देशात मोदी लाट असतानादेखील दक्षिण गोव्यात भाजपचा पराभव झाला होता, हेही लक्षात घ्यावे लागेल.

चर्चिलनी भाजपला पाठिंबा देणे म्हणजे दक्षिणेतील ख्रिस्ती मतदार आणखी नाराज होणे, असा अर्थ होतो. निवडणुका अगदी जवळ आल्या की, खिस्ती धर्मगुरू स्वतः चे कार्ड उघड करतात. मग हे धर्मगुरू आलेक्स सिक्वेरा किंवा माविन गुदिन्हो यांचेही ऐकत नाहीत. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मंत्री नीलेश काब्राल हे कुडचडेत कसेबसे जिंकले. केपेत बलाढ्य वाटणाऱ्या बाबू कवळेकरांना गेल्या विधानसभा निवडणुकीत हिंदू मतदारांनीच पाडले. दक्षिणेतील मतदारांनी अगोदरच चर्चिलसह अनेक ख्रिस्ती नेत्यांना नाकारलेले आहे. चर्चिल व भाजपची मैत्री यातून भाजपला किती लाभ होईल, हे कदाचित निवडणुकीवेळीच कळेल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण