शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

फेरीबोट भाड्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील - सुभाष फळदेसाई

By किशोर कुबल | Updated: November 3, 2023 14:57 IST

"लोकांची इच्छा नसेल तर सरकार त्यानुसार निर्णय घेईल. गरज पडल्यास मुख्यमंत्री हस्तक्षेप करतील."

पणजी : फेरीबोट भाड्याबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी जनतेच्या भावनांचा विचार केला जाईल, असे नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. लोकांची इच्छा नसेल तर सरकार त्यानुसार निर्णय घेईल. गरज पडल्यास मुख्यमंत्री हस्तक्षेप करतील, असे ते म्हणाले. फेरीबोट प्रवासासाठी दुचाक्यांना तिकीट लागू करण्याबरोबरच चारचाकींसाठी तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केल्याने लोकांमध्ये संतप्त भावना आहे त्या पार्श्वभूमीवर खात्याचे मंत्री फळदेसाई यांना विचारले असता ते म्हणाले की, ' या प्रश्नावर आम्ही आमदार आणि स्थानिक नेत्यांशीही बोलू. पण माझे असे प्रामाणिक मत आहे की, त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला पाहिजे.फळदेसाई पुढे म्हणाले की,  दुचाकींसाठी तिकीट सुरू करणे आणि चारचाकी वाहनांसाठी फेरीबोट प्रवासभाडे वाढवणे यामागचा उद्देश महसूल गळती रोखणणे व डिजिटायझेशन करून महसूल मिळवणे हा आहे. ते म्हणाले की, मोफत फेरी सेवा देण्यासाठी सरकार वर्षाकाठी ४५ ते ५० कोटी रुपये खर्च करत आहे. तिकीट व पासेस च्या माध्यमातून वर्षासाठी चार ते पाच कोटी रुपये मिळाले तरीजुन्या फेरीबोटी मोडीत काढून हा महसूल अत्याधुनिक नवीन फेरीबोटी खरेदी करण्यासाठी वापरता येईल.पास घेण्याची आणि नूतनीकरणाची तसेच दैनंदिन तिकीट काढण्याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल केली जाणार आहे कारण यापूर्वी तिकीट कलेक्टरनी केलेला घोटाळा व त्यांच्या वरील कारवाई सर्वश्रुत आहे. कोणत्याही परिस्थितीत महसूल गळती रोखली जाईल.

फेरीबोटी पाण्यावर चालतात का?, हॉटेलात  चहासाठी गेलात तर सहाशे रुपये खर्च करत नाही का?- फळदेसाईंचा सवाल

फेरीबोटींसाठी इंधन तसेच इतर गोष्टींवर खर्च करावा लागतो त्या पाण्यावर चालतात का?, असा सवाल करून फळदेसाई म्हणाले की, हॉटेलात चहा पिण्यासाठी मित्रांबरोबर गेलात तरी तरी सहाशे रुपये खर्च होतात. त्यामुळे तिकीट भाड्यावर गळा काढणे योग्य नव्हे. दुचाकींसाठी महिन्याचा १५० रुपयांचा पास काढला तरी प्रति ट्रिप ५ रुपये आणि चार चाकींसाठी सहाशे रुपयांचा पास काढला तरीप्रति ट्रीप १० रुपये खर्च येईल. हे सहज परवडण्यासारखे आहे. 

टॅग्स :goaगोवा