शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राजीनामा द्यावा - क्लॉड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 21:09 IST

पणजी : खनिज लिज नूतनीकरणाचा निर्णय हा खासगी हितासाठी जेव्हा घेतला जातो तेव्हा मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मनोहर पर्रीकर यांना अधिकार राहत नाही. मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी गोवा फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. क्लॉड अल्वारीस यांनी प्रथमच जाहीरपणो केली आहे.

पणजी : खनिज लिज नूतनीकरणाचा निर्णय हा खासगी हितासाठी जेव्हा घेतला जातो तेव्हा मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मनोहर पर्रीकर यांना अधिकार राहत नाही. मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी गोवा फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. क्लॉड अल्वारीस यांनी प्रथमच जाहीरपणो केली आहे. अल्वारीस हे सातत्याने बेकायदा खाण धंदा व लिज नूतनीकरणाविरुद्ध कायद्याची लढाई लढत आले व आता ते सर्वोच्च न्यायालयातही जिंकले.

सरकारने गोव्याचे आणि गोव्याच्या समाजाचे हित न पाहता लिज नूतनीकरणावेळी काही ठराविक कुटुंबांचे हित पाहिले अशी टीका अल्वारीस यांनी केली आहे. अल्वारीस यांनी बुधवारी सायंकाळी प्रसिद्धी पत्रक जारी केले व एसआयटीने खाण घोटाळ्य़ाशी निगडीत गोवा फाऊंडेशनची तक्रार प्रथम सीबीआयकडे द्यावी व मग दक्षता खात्याकडे द्यावी अशी मागणी अल्वारीस यांनी केली आहे. लीज नूतनीकरणासारखे निर्णय हे केवळ चुकीचेच किंवा बेकायदाच ठरले नाहीत तर ते निर्णय खासगी हितासाठी केल्याचे स्पष्ट झाले आहे असे अल्वारीस यांनी म्हटले आहे. लीज नूतनीकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हायला हवी, असे अल्वारीस यांनी म्हटले आहे. 

नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करून स्वत:च्या खिशात ती लुट भरणा-या कंपन्यांविरुद्ध दाद मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालय हेच एकमेव आशास्थान आहे, हे न्यायालयाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. या चोरीमध्ये खाण कंपन्यांना सक्रियपणे राजकारण्यांनी पाठिंबा दिला असे अल्वारीस यांनी म्हटले आहे. मनोहर पर्रीकरांनी मास्टरमाईंड केलेल्या अनेक निर्णयांबाबत सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले व ते निर्णय रद्दबातल ठरवले आहे, असेही अल्वारीस यांनी म्हटले आहे. एमएमडीआर कायद्याच्या कलम 21(5) नुसार बरीच वसुली खाण कंपन्यांकडून सरकारला करावी लागणार आहे. 65 हजार 58 कोटी रुपये सरकारने खाण कंपन्यांकडून बेकायदा खाण धंद्याबाबत वसूल करावेत. यापूर्वीच्या सर्व खनिज लीज धारकांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश सरकारने द्यावेत. पर्यावरणाची अपरिमित हानी झाली आहे, राजकारणी व खनिज कंपन्यांमधील गैरनाते आता तोडायला हवे, असे अल्वारीस यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा