शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या यादीत समाविष्ट हा ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण - CM प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 05:29 IST

किल्ल्यांचे शत्रूस गूढ वाटणारे प्रवेशद्वार, संरक्षणाची रणनीती व स्थापत्यशास्त्रीय उत्कृष्टता ही जगात कुठेही सापडणार नाही, अशी मराठ्यांची अमूल्य देणगी आहे. हेच खरे.'

किशोर कुबल

पणजी : 'ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण,' अशा शब्दांत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट केल्याबद्दल अभिनंदन केले. हा केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर संपूर्ण भारतासाठी गौरवाचा क्षण आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. 

युनेस्कोने 'अद्वितीय वैश्विक मूल्य' म्हणून ज्या किल्ल्यांचा समावेश केला आहे त्यात रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तमिळनाडूतील जिंजी या  किल्ल्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, 'हिंदवी स्वराज्याचे प्रणेते, रयतेचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांनी केवळ भूभागावर राज्य केले नाही, तर लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. त्यांनी उभारलेले किल्ले हे स्वराज्यनिर्मिती, रणनीती, स्थापत्य व स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. किल्ल्यांचे शत्रूस गूढ वाटणारे प्रवेशद्वार, संरक्षणाची रणनीती व स्थापत्यशास्त्रीय उत्कृष्टता ही जगात कुठेही सापडणार नाही, अशी मराठ्यांची अमूल्य देणगी आहे. हेच खरे.'

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,'हिंदवी स्वराज्याचे अद्वितीय वैश्विक मूल्य आहे.या ऐतिहासिक क्षणासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. विशेषतः मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन:पूर्वक अभिनंदन व आभार. मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग व संस्कृती मंत्रालयाने सक्रिय पाठिंबा दिला तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारच्या अथक प्रयत्नांतून हे शक्य झाले.' 

'छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी वारशाला ही जागतिक ओळख लाभणे हे आपल्या संस्कृतीचे आणि अस्मितेचे सर्वश्रेष्ठ सन्मानचिन्ह आहे., असे नमूद करून 'जय शिवराय ' या घोषणेने सावंत यांनी प्रतिक्रियेची सांगता केली आहे.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज