शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बदलत्या हवामानाचा काजू पिकावर परिणाम शक्य: शेतकऱ्यांमध्ये वाढली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2024 15:39 IST

राज्यात हवामान झपाट्याने बदलत आहे. सध्या जानेवारी पर्यंत कडाक्याची थंडी पडणे गरजेचे होते.

नारायण गावस

पणजी: राज्यात बदलत्या हवामानाचा फटका आता शेतीबागायतीवर दिसून येत आहेत. यंदा काजू तसेच आंब्याच्या पिकाला या हवामानाचा फटका बसण्याची शक्यता जास्त आहे. राज्यात ऐन थंडीच्या हंगामात हाेत असलेली उष्णता तसेच मधून मधून पडणाऱ्या पावसाच्या सरी काजूच्या तसेच आंब्याच्या बहर खराब होण्याची शक्यता आहे. तसेच अजून काही काजू आंब्यांना बहरही आलेला नाही.

बदलत्या हवामानाचा फटका राज्यात हवामान झपाट्याने बदलत आहे. सध्या जानेवारी पर्यंत कडाक्याची थंडी पडणे गरजेचे होते. हे थंडी काजू आंब्याच्या पिकाला लाभदायक आहे. पण या पिकांना हवी तशी थंडी पडत नसल्याने या पिकांना अजून मुबलक असा बहर आलेला नाही. त्यामुळे यंदाचा काजू हंगाम नुकसानीत जाण्याची भिती काही शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. गेल्या वर्षी काजूला चांगले पीक मिळाले होते. पण दर कमी मिळाला पण सरकारने आधारभूत किमत दिल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात लाभ झाला होता.गाेव्यात काजूचे पिक माेठ्या प्रमाणात येत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी इतर शेती बागायती साेडून काजू बागायतीवर भर दिली आहे. राज्यात सर्वात जास्त लागवड ही काजूची होत असते यातून शेतकऱ्यांना मोबदला जास्त मिळत असतो. पण मागील काही वर्षापासून वातावरणात होत असलेला सततच्या बदलांमुळे काजू पिकाची लागवड आता कमी होत आहे. याचा परिणाम आता शेतकऱ्यांना दिसून येत आहे. सत्तरी,काणकोण, डिचाेली, पडणे, सांगे तालुक्यामध्ये काजूचे पिक जास्त प्रमाणात घेतले जाते.

आम्ही मागील दहा वर्षांपासून भात शेती साेडून काजू बागायतीची शेती करत आहोत. सुरवातीला काजूच्या बागायतीतून चांगले उत्पन्न मिळत होते. पण आता वातावरणात हाेत असलेल्या बदलामुळे लागवड खूप कमी झाली आहे. या वर्षीही पीक खूप कमी येण्याची शक्यता आहे झाडांना आलेला बहरही जळाला आहे, रामा गावकर काजू शेतकऱ्यांने सांगितले.

काजू बागायती शेती आता न परवडणारी झालेली आहे. पूर्वी सारखी लागवड होत नाही. तसेच काजूला रोटा नामक कीड लागत असते. तसेच वातावरणाचा फटका बसत आहे. यंदाच्या वर्षीही आम्हाला जास्त पीक मिळण्याची शक्यता कमी आहे, असे महादेव वेळीप  काजू उत्पादक शेतकरी शेतकरी म्हणाल( नारायण गावस : पणजी, गोवा )बदलत्या हवामानाचा काजू पिकावर परिणाम शक्य: शेतकऱ्यांमध्ये वाढली चिंतापणजी: राज्यात बदलत्या हवामानाचा फटका आता शेतीबागायतीवर दिसून येत आहेत. यंदा काजू तसेच आंब्याच्या पिकाला या हवामानाचा फटका बसण्याची शक्यता जास्त आहे. राज्यात ऐन थंडीच्या हंगामात हाेत असलेली उष्णता तसेच मधून मधून पडणाऱ्या पावसाच्या सरी काजूच्या तसेच आंब्याच्या बहर खराब होण्याची शक्यता आहे. तसेच अजून काही काजू आंब्यांना बहरही आलेला नाही.बदलत्या हवामानाचा फटकाराज्यात हवामान झपाट्याने बदलत आहे. सध्या जानेवारी पर्यंत कडाक्याची थंडी पडणे गरजेचे होते. हे थंडी काजू आंब्याच्या पिकाला लाभदायक आहे. पण या पिकांना हवी तशी थंडी पडत नसल्याने या पिकांना अजून मुबलक असा बहर आलेला नाही. त्यामुळे यंदाचा काजू हंगाम नुकसानीत जाण्याची भिती काही शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. गेल्या वर्षी काजूला चांगले पीक मिळाले होते. पण दर कमी मिळाला पण सरकारने आधारभूत किमत दिल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात लाभ झाला होता.गाेव्यात काजूचे पिक माेठ्या प्रमाणात येत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी इतर शेती बागायती साेडून काजू बागायतीवर भर दिली आहे. राज्यात सर्वात जास्त लागवड ही काजूची होत असते यातून शेतकऱ्यांना मोबदला जास्त मिळत असतो. पण मागील काही वर्षापासून वातावरणात होत असलेला सततच्या बदलांमुळे काजू पिकाची लागवड आता कमी होत आहे. याचा परिणाम आता शेतकऱ्यांना दिसून येत आहे. सत्तरी,काणकोण, डिचाेली, पडणे, सांगे तालुक्यामध्ये काजूचे पिक जास्त प्रमाणात घेतले जाते.

आम्ही मागील दहा वर्षांपासून भात शेती साेडून काजू बागायतीची शेती करत आहोत. सुरवातीला काजूच्या बागायतीतून चांगले उत्पन्न मिळत होते. पण आता वातावरणात हाेत असलेल्या बदलामुळे लागवड खूप कमी झाली आहे. या वर्षीही पीक खूप कमी येण्याची शक्यता आहे झाडांना आलेला बहरही जळाला आहे, रामा गावकर काजू शेतकऱ्यांने सांगितले.

काजू बागायती शेती आता न परवडणारी झालेली आहे. पूर्वी सारखी लागवड होत नाही. तसेच काजूला रोटा नामक कीड लागत असते. तसेच वातावरणाचा फटका बसत आहे. यंदाच्या वर्षीही आम्हाला जास्त पीक मिळण्याची शक्यता कमी आहे, असे महादेव वेळीप  काजू उत्पादक शेतकरी शेतकरी म्हणाला.