शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

बदलत्या हवामानाचा काजू पिकावर परिणाम शक्य: शेतकऱ्यांमध्ये वाढली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2024 15:39 IST

राज्यात हवामान झपाट्याने बदलत आहे. सध्या जानेवारी पर्यंत कडाक्याची थंडी पडणे गरजेचे होते.

नारायण गावस

पणजी: राज्यात बदलत्या हवामानाचा फटका आता शेतीबागायतीवर दिसून येत आहेत. यंदा काजू तसेच आंब्याच्या पिकाला या हवामानाचा फटका बसण्याची शक्यता जास्त आहे. राज्यात ऐन थंडीच्या हंगामात हाेत असलेली उष्णता तसेच मधून मधून पडणाऱ्या पावसाच्या सरी काजूच्या तसेच आंब्याच्या बहर खराब होण्याची शक्यता आहे. तसेच अजून काही काजू आंब्यांना बहरही आलेला नाही.

बदलत्या हवामानाचा फटका राज्यात हवामान झपाट्याने बदलत आहे. सध्या जानेवारी पर्यंत कडाक्याची थंडी पडणे गरजेचे होते. हे थंडी काजू आंब्याच्या पिकाला लाभदायक आहे. पण या पिकांना हवी तशी थंडी पडत नसल्याने या पिकांना अजून मुबलक असा बहर आलेला नाही. त्यामुळे यंदाचा काजू हंगाम नुकसानीत जाण्याची भिती काही शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. गेल्या वर्षी काजूला चांगले पीक मिळाले होते. पण दर कमी मिळाला पण सरकारने आधारभूत किमत दिल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात लाभ झाला होता.गाेव्यात काजूचे पिक माेठ्या प्रमाणात येत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी इतर शेती बागायती साेडून काजू बागायतीवर भर दिली आहे. राज्यात सर्वात जास्त लागवड ही काजूची होत असते यातून शेतकऱ्यांना मोबदला जास्त मिळत असतो. पण मागील काही वर्षापासून वातावरणात होत असलेला सततच्या बदलांमुळे काजू पिकाची लागवड आता कमी होत आहे. याचा परिणाम आता शेतकऱ्यांना दिसून येत आहे. सत्तरी,काणकोण, डिचाेली, पडणे, सांगे तालुक्यामध्ये काजूचे पिक जास्त प्रमाणात घेतले जाते.

आम्ही मागील दहा वर्षांपासून भात शेती साेडून काजू बागायतीची शेती करत आहोत. सुरवातीला काजूच्या बागायतीतून चांगले उत्पन्न मिळत होते. पण आता वातावरणात हाेत असलेल्या बदलामुळे लागवड खूप कमी झाली आहे. या वर्षीही पीक खूप कमी येण्याची शक्यता आहे झाडांना आलेला बहरही जळाला आहे, रामा गावकर काजू शेतकऱ्यांने सांगितले.

काजू बागायती शेती आता न परवडणारी झालेली आहे. पूर्वी सारखी लागवड होत नाही. तसेच काजूला रोटा नामक कीड लागत असते. तसेच वातावरणाचा फटका बसत आहे. यंदाच्या वर्षीही आम्हाला जास्त पीक मिळण्याची शक्यता कमी आहे, असे महादेव वेळीप  काजू उत्पादक शेतकरी शेतकरी म्हणाल( नारायण गावस : पणजी, गोवा )बदलत्या हवामानाचा काजू पिकावर परिणाम शक्य: शेतकऱ्यांमध्ये वाढली चिंतापणजी: राज्यात बदलत्या हवामानाचा फटका आता शेतीबागायतीवर दिसून येत आहेत. यंदा काजू तसेच आंब्याच्या पिकाला या हवामानाचा फटका बसण्याची शक्यता जास्त आहे. राज्यात ऐन थंडीच्या हंगामात हाेत असलेली उष्णता तसेच मधून मधून पडणाऱ्या पावसाच्या सरी काजूच्या तसेच आंब्याच्या बहर खराब होण्याची शक्यता आहे. तसेच अजून काही काजू आंब्यांना बहरही आलेला नाही.बदलत्या हवामानाचा फटकाराज्यात हवामान झपाट्याने बदलत आहे. सध्या जानेवारी पर्यंत कडाक्याची थंडी पडणे गरजेचे होते. हे थंडी काजू आंब्याच्या पिकाला लाभदायक आहे. पण या पिकांना हवी तशी थंडी पडत नसल्याने या पिकांना अजून मुबलक असा बहर आलेला नाही. त्यामुळे यंदाचा काजू हंगाम नुकसानीत जाण्याची भिती काही शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. गेल्या वर्षी काजूला चांगले पीक मिळाले होते. पण दर कमी मिळाला पण सरकारने आधारभूत किमत दिल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात लाभ झाला होता.गाेव्यात काजूचे पिक माेठ्या प्रमाणात येत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी इतर शेती बागायती साेडून काजू बागायतीवर भर दिली आहे. राज्यात सर्वात जास्त लागवड ही काजूची होत असते यातून शेतकऱ्यांना मोबदला जास्त मिळत असतो. पण मागील काही वर्षापासून वातावरणात होत असलेला सततच्या बदलांमुळे काजू पिकाची लागवड आता कमी होत आहे. याचा परिणाम आता शेतकऱ्यांना दिसून येत आहे. सत्तरी,काणकोण, डिचाेली, पडणे, सांगे तालुक्यामध्ये काजूचे पिक जास्त प्रमाणात घेतले जाते.

आम्ही मागील दहा वर्षांपासून भात शेती साेडून काजू बागायतीची शेती करत आहोत. सुरवातीला काजूच्या बागायतीतून चांगले उत्पन्न मिळत होते. पण आता वातावरणात हाेत असलेल्या बदलामुळे लागवड खूप कमी झाली आहे. या वर्षीही पीक खूप कमी येण्याची शक्यता आहे झाडांना आलेला बहरही जळाला आहे, रामा गावकर काजू शेतकऱ्यांने सांगितले.

काजू बागायती शेती आता न परवडणारी झालेली आहे. पूर्वी सारखी लागवड होत नाही. तसेच काजूला रोटा नामक कीड लागत असते. तसेच वातावरणाचा फटका बसत आहे. यंदाच्या वर्षीही आम्हाला जास्त पीक मिळण्याची शक्यता कमी आहे, असे महादेव वेळीप  काजू उत्पादक शेतकरी शेतकरी म्हणाला.