शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्ये, दूध, भाजी महागणार

By admin | Updated: May 21, 2015 01:22 IST

पणजी : कोल्हापूर, बेळगाव, सिंधुदुर्ग, कारवार आदी जिल्ह्यांमधून माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश कर (साधनसुविधा कर) लागू झाल्याने कडधान्ये,

पणजी : कोल्हापूर, बेळगाव, सिंधुदुर्ग, कारवार आदी जिल्ह्यांमधून माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश कर (साधनसुविधा कर) लागू झाल्याने कडधान्ये, दूध, भाजीपाला महागणार आहे. वीज, पाणी आदी मूलभूत सुविधांवर आधीच मोठ्या प्रमाणात खिशाला फटका बसत असताना गोवेकरांना आता वरील दैनंदिन गरजेच्या वस्तूंवरही आणखी पैसे बाहेर काढावे लागतील.धारगळ, दोडामार्ग, चोर्ला, मोले, पोळे या पाच टोल बुथवर चारचाकींसाठी २५0 रुपये, ट्रक तसेच अन्य सहा चाकी वाहनांसाठी ५00 रुपये, तर मोठ्या ट्रेलरसाठी १ हजार रुपये याप्रमाणे प्रवेशकर लागू होणार आहे. या वाहनांना ३0 दिवसांचा पास घेतल्यास निम्मा प्रवेशकर लागेल. ९0 दिवसांचा पास घेतल्यास ४0 टक्के कर भरावा लागेल. एकाच टोल बुथवरून दिवसातून एकापेक्षा अधिक वेळा जावे लागल्यास दीडपट शुल्क भरण्याची मुभा आहे; परंतु यावर शेजारी राज्यांतील वाहतूकदार समाधानी नाहीत. प्रवेश कर नकोच, अशी त्यांची मागणी आहे. बांधकाम खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बेळगाव, कारवार, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांतील वाहतूकदारांना प्रवेश करातून वगळणे शक्य नाही. त्यांनी पास पद्धतीचा लाभ घ्यावा. ६ चाकी ट्रकला महिन्याचा पास घेतला, तर केवळ ७,५00 रुपये भरावे लागतील. ही रक्कम मोठी नाही. या पासवर कितीही फेऱ्या ते करू शकतात.अखिल गोवा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष नरेश तिवरेकर म्हणाले की, किलोमागे १0 पैसे वाढले, तरी सर्वसामान्य जनतेला ती मोठी झळ ठरणार आहे. वीज, पाणी आदी दैनंदिन गरजेच्या सुविधा महागल्या आहेत. आधीच जनता महागाईने भरडलेली आहे. त्यात शेजारील राज्यांमधून माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेशकर लागू झाल्याने आता कडधान्ये तसेच इतर वस्तू महागणार आहेत.मे २0१३ मध्ये तापला होता विषय मे २0१३ साली प्रवेशकराचा विषय तापला होता. शेजारील जिल्ह्यांमधील वाहतूकदारांनी माल वाहतूक बंद केली होती. अखिल भारतीय वाहतूकदार संघटनेचे चेअरमन षण्मुगम, बेळगाव चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर, कोल्हापूर लॉरी आॅपरेटर्स संघटनेचे अध्यक्ष सुभाष जाधव, महाराष्ट्र राज्य ट्रक-टेंपो संघटनेचे उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग लॉरीमालक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी घोगळे यांच्या शिष्टमंडळाने तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची त्या वेळी भेट घेतली होती. पर्रीकर यांनी वरील चार जिल्ह्यांतील मालवाहू वाहनांना प्रवेश करातून वगळले होते. आता त्यांच्यासाठी पास पद्धत लागू करण्यात आली असून साधारणपणे १ जूनपासून पूर्ण क्षमतेने ही वसुली सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)