शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

कडधान्ये, दूध, भाजी महागणार

By admin | Updated: May 21, 2015 01:22 IST

पणजी : कोल्हापूर, बेळगाव, सिंधुदुर्ग, कारवार आदी जिल्ह्यांमधून माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश कर (साधनसुविधा कर) लागू झाल्याने कडधान्ये,

पणजी : कोल्हापूर, बेळगाव, सिंधुदुर्ग, कारवार आदी जिल्ह्यांमधून माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश कर (साधनसुविधा कर) लागू झाल्याने कडधान्ये, दूध, भाजीपाला महागणार आहे. वीज, पाणी आदी मूलभूत सुविधांवर आधीच मोठ्या प्रमाणात खिशाला फटका बसत असताना गोवेकरांना आता वरील दैनंदिन गरजेच्या वस्तूंवरही आणखी पैसे बाहेर काढावे लागतील.धारगळ, दोडामार्ग, चोर्ला, मोले, पोळे या पाच टोल बुथवर चारचाकींसाठी २५0 रुपये, ट्रक तसेच अन्य सहा चाकी वाहनांसाठी ५00 रुपये, तर मोठ्या ट्रेलरसाठी १ हजार रुपये याप्रमाणे प्रवेशकर लागू होणार आहे. या वाहनांना ३0 दिवसांचा पास घेतल्यास निम्मा प्रवेशकर लागेल. ९0 दिवसांचा पास घेतल्यास ४0 टक्के कर भरावा लागेल. एकाच टोल बुथवरून दिवसातून एकापेक्षा अधिक वेळा जावे लागल्यास दीडपट शुल्क भरण्याची मुभा आहे; परंतु यावर शेजारी राज्यांतील वाहतूकदार समाधानी नाहीत. प्रवेश कर नकोच, अशी त्यांची मागणी आहे. बांधकाम खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बेळगाव, कारवार, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांतील वाहतूकदारांना प्रवेश करातून वगळणे शक्य नाही. त्यांनी पास पद्धतीचा लाभ घ्यावा. ६ चाकी ट्रकला महिन्याचा पास घेतला, तर केवळ ७,५00 रुपये भरावे लागतील. ही रक्कम मोठी नाही. या पासवर कितीही फेऱ्या ते करू शकतात.अखिल गोवा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष नरेश तिवरेकर म्हणाले की, किलोमागे १0 पैसे वाढले, तरी सर्वसामान्य जनतेला ती मोठी झळ ठरणार आहे. वीज, पाणी आदी दैनंदिन गरजेच्या सुविधा महागल्या आहेत. आधीच जनता महागाईने भरडलेली आहे. त्यात शेजारील राज्यांमधून माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेशकर लागू झाल्याने आता कडधान्ये तसेच इतर वस्तू महागणार आहेत.मे २0१३ मध्ये तापला होता विषय मे २0१३ साली प्रवेशकराचा विषय तापला होता. शेजारील जिल्ह्यांमधील वाहतूकदारांनी माल वाहतूक बंद केली होती. अखिल भारतीय वाहतूकदार संघटनेचे चेअरमन षण्मुगम, बेळगाव चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर, कोल्हापूर लॉरी आॅपरेटर्स संघटनेचे अध्यक्ष सुभाष जाधव, महाराष्ट्र राज्य ट्रक-टेंपो संघटनेचे उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग लॉरीमालक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी घोगळे यांच्या शिष्टमंडळाने तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची त्या वेळी भेट घेतली होती. पर्रीकर यांनी वरील चार जिल्ह्यांतील मालवाहू वाहनांना प्रवेश करातून वगळले होते. आता त्यांच्यासाठी पास पद्धत लागू करण्यात आली असून साधारणपणे १ जूनपासून पूर्ण क्षमतेने ही वसुली सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)