शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

माध्यान्ह आहारात 'तृणधान्य' दिसणार: मुख्यमंत्री, वीजदरात केवळ ६० ते ९० पैसे वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2024 12:30 IST

वीज दरवाढीचे समर्थन करताना तामनार प्रकल्पाचे येत्या ऑक्टोबरपर्यंत उद्घाटन करण्यात येईल, असेही सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : शाळकरी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह आहारात आता तृणधान्याचा वापर केला जाईल. त्यासाठी आहार पुरवणाऱ्या स्वयंसाहाय्य गटांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. यावेळी त्यांनी वीज दरवाढीचे समर्थन करताना तामनार प्रकल्पाचे येत्या ऑक्टोबरपर्यंत उद्घाटन करण्यात येईल, असेही सांगितले.

पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, युनिटमागे केवळ ६० ते १० पैसेच वीज दरवाढ केलेली आहे. तशी एकूण बिलांत ८ ते १० रुपयांची वाढ होणार आहे. ही वाढ तशी सर्वसामान्य जनतेसाठी मोठी नव्हे. तसेच वीज दरवाढ संयुक्त वीज नियामक आयोग ठरवतो, सरकार नव्हे. ही दरवाढ केली नाही तर केंद्र सरकारकडून अनुदान मिळणार नाही. दरवाढ न करता राज्य सरकार अनुदान देत राहिले तर केंद्र काहीच देणार नाही. घरगुती वापराच्या विजेसाठी ही दरवाढ तशी मोठी नाही. काही प्रमाणात व्यावसायिक आस्थापनांना झळ बसेल. सरकारने गेल्या पाच वर्षांत भूमिगत वीज वाहिन्या व इतर सुधारणांवर २ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. लोकांना वीज खंडित झाली तरीही ते चालत नाही. दर्जेदार वीज हवी असेल तर खर्चही करावा लागणार. त्यासाठी दरवाढ अटळ असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्र सरकारकडून २,५०० कोटी अनुदान मिळू शकते. दर न वाढवल्यास हा निधी मिळू शकणार नाही. आम्ही प्रस्ताव पाठवणार आहोत. राज्यात विजेच्या संदर्भात पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी आणखी ३ हजार कोटी रुपयांची गरज आहे. देशभरात घरांना भूमिगत केबल देणारे गोवा हे पहिले राज्य आहे. इतर राज्यांमध्ये कारखान्यांना भूमिगत केबलसाठी प्राधान्य दिले जाते. तसेच गोव्यात भारनियमन किंवा शटडाउन केले जात नाही. शेजारील राज्यात हा प्रकार चालतो. संपूर्ण दिवस वीज बंद असते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, तामनार प्रकल्पाला विरोध होत असतानाच सरकारची भूमिका आता अधिक स्पष्ट झाली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, अवघेच काही काम बाकी आहे. येत्या ऑक्टोबरपर्यंत उद्घाटन होईल.

...तर कंत्राटदारांना 'ते' काम पुन्हा करावे लागणार

स्मार्ट सिटीचे कोणतेही काम निकृष्ट दर्जाचे केलेले आढळून आल्यास कंत्राटदारांना ते पुन्हा करून देण्यास भाग पाडू, असा इशारा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला. पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर ते म्हणाले की, स्मार्ट सिटीच्या कामाचा अहवाल तयार केला जाणार असून तो जाहीर करू, स्मार्ट सिटीची कामे लांबल्याने लोकांना जो त्रास झलेला आहे, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली. राजधानी शहरात मलनि:स्सारणाची मोठी समस्या होती. आता वाहिन्या टाकल्याने ती दूर हाईल.

प्रशिक्षण देणार

उद्या, २१ रोजी आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त तृणधान्य वापराचा प्रसार केला जाईल. महिला स्वयंसाहाय्य गटांना प्रशिक्षण देऊन आहारात तृणधान्य कसे वापरता येईल. कोणकोणते पदार्थ बनवता येतील, हे सांगितले जाईल. सध्या पावभाजी, उसळ आदी पदार्थ दिले जातात.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत