शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

माध्यान्ह आहारात 'तृणधान्य' दिसणार: मुख्यमंत्री, वीजदरात केवळ ६० ते ९० पैसे वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2024 12:30 IST

वीज दरवाढीचे समर्थन करताना तामनार प्रकल्पाचे येत्या ऑक्टोबरपर्यंत उद्घाटन करण्यात येईल, असेही सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : शाळकरी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह आहारात आता तृणधान्याचा वापर केला जाईल. त्यासाठी आहार पुरवणाऱ्या स्वयंसाहाय्य गटांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. यावेळी त्यांनी वीज दरवाढीचे समर्थन करताना तामनार प्रकल्पाचे येत्या ऑक्टोबरपर्यंत उद्घाटन करण्यात येईल, असेही सांगितले.

पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, युनिटमागे केवळ ६० ते १० पैसेच वीज दरवाढ केलेली आहे. तशी एकूण बिलांत ८ ते १० रुपयांची वाढ होणार आहे. ही वाढ तशी सर्वसामान्य जनतेसाठी मोठी नव्हे. तसेच वीज दरवाढ संयुक्त वीज नियामक आयोग ठरवतो, सरकार नव्हे. ही दरवाढ केली नाही तर केंद्र सरकारकडून अनुदान मिळणार नाही. दरवाढ न करता राज्य सरकार अनुदान देत राहिले तर केंद्र काहीच देणार नाही. घरगुती वापराच्या विजेसाठी ही दरवाढ तशी मोठी नाही. काही प्रमाणात व्यावसायिक आस्थापनांना झळ बसेल. सरकारने गेल्या पाच वर्षांत भूमिगत वीज वाहिन्या व इतर सुधारणांवर २ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. लोकांना वीज खंडित झाली तरीही ते चालत नाही. दर्जेदार वीज हवी असेल तर खर्चही करावा लागणार. त्यासाठी दरवाढ अटळ असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्र सरकारकडून २,५०० कोटी अनुदान मिळू शकते. दर न वाढवल्यास हा निधी मिळू शकणार नाही. आम्ही प्रस्ताव पाठवणार आहोत. राज्यात विजेच्या संदर्भात पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी आणखी ३ हजार कोटी रुपयांची गरज आहे. देशभरात घरांना भूमिगत केबल देणारे गोवा हे पहिले राज्य आहे. इतर राज्यांमध्ये कारखान्यांना भूमिगत केबलसाठी प्राधान्य दिले जाते. तसेच गोव्यात भारनियमन किंवा शटडाउन केले जात नाही. शेजारील राज्यात हा प्रकार चालतो. संपूर्ण दिवस वीज बंद असते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, तामनार प्रकल्पाला विरोध होत असतानाच सरकारची भूमिका आता अधिक स्पष्ट झाली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, अवघेच काही काम बाकी आहे. येत्या ऑक्टोबरपर्यंत उद्घाटन होईल.

...तर कंत्राटदारांना 'ते' काम पुन्हा करावे लागणार

स्मार्ट सिटीचे कोणतेही काम निकृष्ट दर्जाचे केलेले आढळून आल्यास कंत्राटदारांना ते पुन्हा करून देण्यास भाग पाडू, असा इशारा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला. पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर ते म्हणाले की, स्मार्ट सिटीच्या कामाचा अहवाल तयार केला जाणार असून तो जाहीर करू, स्मार्ट सिटीची कामे लांबल्याने लोकांना जो त्रास झलेला आहे, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली. राजधानी शहरात मलनि:स्सारणाची मोठी समस्या होती. आता वाहिन्या टाकल्याने ती दूर हाईल.

प्रशिक्षण देणार

उद्या, २१ रोजी आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त तृणधान्य वापराचा प्रसार केला जाईल. महिला स्वयंसाहाय्य गटांना प्रशिक्षण देऊन आहारात तृणधान्य कसे वापरता येईल. कोणकोणते पदार्थ बनवता येतील, हे सांगितले जाईल. सध्या पावभाजी, उसळ आदी पदार्थ दिले जातात.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत