शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

विशेष दर्जावरील चर्चेसाठी केंद्राचे निमंत्रण

By admin | Updated: July 23, 2014 00:48 IST

पणजी : विशेष दर्जाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी गोवा विधानसभेचे शिष्टमंडळ

पणजी : विशेष दर्जाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी गोवा विधानसभेचे शिष्टमंडळ सप्टेंबर महिन्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना भेटणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ही माहिती मंगळवारी विधानसभेत दिली. गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या मंगळवारी पहिल्या दिवसाच्या कामकाजात आमदार रोहन खंवटे यांनी हा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित केला. विशेष दर्जाच्या मागणीविषयी गोवा आग्रही असून गोव्याला त्याची किती गरज आहे, याविषयी केंद्रीय नेत्यांना समजविण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी आपल्याला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा फोन आला होता. गोवा मागत असलेला विशेष दर्जा हा कशा स्वरूपाचा आहे, याबद्दल त्यांना माहिती हवी आहे. विशेष दर्जाची मागणी गोवा व बिहारसह अनेक राज्यांनी केली आहे; परंतु विविध राज्यांना अपेक्षित असलेला विशेष दर्जा हा वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे. त्यामुळे गोवा विधानसभेचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्र्यांना चतुर्थीनंतर म्हणजेच सप्टेंबर महिन्यात भेटणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यापूर्वी विशेष दर्जाची मागणी केंद्र सरकारकडून घटनेशी विसंगत असल्याचे सांगण्यात आले होते, याची आठवण दिगंबर कामत यांनी करून दिली. त्यामुळे या वेळी काळजी घेण्यात यावी, असे त्यांनी सुचविले. (प्रतिनिधी)