शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

गोव्यात नागरी पुरवठा खात्याच्या गोदामांमध्ये 707 मेट्रिक टन गहू कीड लागल्याने खराब

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 13:43 IST

गोव्यात नागरी पुरवठा खात्याच्या अकरा गोदामांमधील सुमारे 707 मेट्रिक टन गहू वेळीच कीटकनाशकांची फवारणी न झाल्याने कीड लागून खराब झाला आहे.

पणजी - गोव्यात नागरी पुरवठा खात्याच्या अकरा गोदामांमधील सुमारे 707 मेट्रिक टन गहू वेळीच कीटकनाशकांची फवारणी न झाल्याने कीड लागून खराब झाला आहे. जूना आणि खराब माल नवीन गव्हामध्ये मिसळून तो सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्दारे लोकांना वितरित केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. सरकारने यात हस्तक्षेप करावा,अशी मागणी होत आहे. दुसरीकडे खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी आचारसंहितेच्या फेऱ्यात कंत्राट अडकल्यानेच कीटकनाशकाची फवारणी रखडल्याचे सांगितले.

राज्यात दारिद्र्य रेषेवरील १ लाख ९0 हजार शिधापत्रिकाधारक आहेत. प्रती रेशन कार्ड ७ किलो गहू ९ रुपये १0 पैसे दराने तसेच ८ किलो तांदुळ प्रती किलो ११ रुपये ६0 पैसे दराने दरमहा दिले जातात. रेशन दुकानांवर पाठवलेला हे निकृष्ट धान्य सरकारने त्त्वरित मागे घ्यावे आणि नवीन माल पुरवावा, अशी मागणी होत आहे.

नागरी पुरवठा खात्याच्या गोदामांमधून दर महिन्याला साधारणपणे २ तारीखपासून त्या महिन्याचा कोटा उचलण्यास सुरवात होते व वाहतूकदार रेशन दुकानांना धान्य पुरवित असतात. गोव्याला धान्य पुरवठा पंजाबहून होतो. वास्को रेल्वे यार्डात हा माल आल्यानंतर हा माल आधी भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात आणि नंतर नागरी पुरवठा खात्याच्या गोदामांमध्ये पाठवला जातो. मिळालेल्या माहितीनुसार रेशनवर वितरणासाठी दर महिन्याला सुमारे ३६४0 मेट्रिक टन तांदुळ तर १३१३ मेट्रिक टन गहू लागतो. भटिंडा पंजाबहून सोलापूरमार्गे रेल्वे वाघिणीतून गहू तर लुधियानामधून तांदूळ येतो.

गहू कीड लागून खराब होण्याचे कारण शोधले असता खात्याने वेळीच कीटकनाशकांची फवारणी गोदामांमध्ये केली नसल्याचे निष्पन्न झाले. दर तीन महिन्यांनी दोनवेळा गोदामात किटकनाशकाची फवारणी केली जाते. ती गेले पाच महिने झालेली नाही. शिधापत्रिकाधारकांना धान्यावर सवलत देण्याऐवजी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर (डीटीएफ)अर्थात जी काही सवलत आहे त्याची रक्कम थेट खात्यात जमा करण्याची नवी योजना विचाराधीन आहे. ती केव्हाही लागू होऊ शकते याच कारणास्तव उचल होणार नसल्याच्या सबबीखाली कीटकनाशकांची फवारणी केली नसल्याचे कारण पुढे आले आहे.

आचारसंहितेमुळे कंत्राट रखडले

नागरी पुरवठा खात्याचे संचालक गोविंद गावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कीटकनाशकांच्या फवारणीचे कंत्राट देण्याचे काम सततच्या निवडणूक आचारसंहितेमुळे खात्याकडून राहून गेले. पण आता मी संचालकांना त्यांच्या अधिकारात कोटेशन घेऊन कंत्राट बहाल करण्याचे पूर्ण अधिकार दिलेले आहेत. नागरी पुरवठा खात्याच्या सर्व गोदामांची दैनावस्था झाल्याचे त्यांनी मान्य केले. त्याचबराबेर फोंडा येथील गोदामाच्या नूतनीकरणासाठी २१ लाख रुपये मंजूर केले असल्याचे सांगितले. मुरगांव आणि सासष्टी तालुक्यातील लोकांना धान्य पुरविणाऱ्या कुठठळी येथील गोदामाच्या नूतनीकरणाचेही काम प्राधान्यक्रमे हाती घेतले जाईल. ते पुढे म्हणाले की ‘ माझ्याकडे हे खाते आल्यास केवळ दोन महिने झाले आहेत. अनेक गोष्टी करण्याच्या आहेत त्यासाठी किमान सहा महिने तरी द्या’ गोदामात माल पडून राहण्यामागे स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्याची उचल न होणे हेही एक कारण आहे. लोकांच्या गरजेनुसार धान्य मागविले जाते मात्र लोक रेशनवर उचलच करीत नाहीत. जुने आणि खराब झालेले धान्य नव्या धान्यात मिसळ करुन देण्याचे प्रकार घडत असतील तर ते गंभीर आहेत. हे प्रकार त्वरित बंद करु, असे गावडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.