शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

यंदा काजू उत्पादन ५० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता : दरातही घसरण काजू उत्पादक नुकसानीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 16:54 IST

कृषी खात्यानुसार गेल्या वर्षी भरमसाठ काजूचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षी २२ हजार मेट्रिक टनपर्यंत काजूचे उत्पादन पाेहचले हाेते.

पणजी (नारायण गावस): यंदाचा काजू हंगाम हा शेतकऱ्यांसाठी खूपच नुकसानदायक ठरला असून यंदा ५० टक्के उत्पादन मिळणे कठीण झाले आहे. बदलत्या हवामानाचा काजू पिकावर परिणाम जाणवला त्यात दरातही कमतरता असल्याने शेतकरी पूर्णपणे नुकसानीत सापडला आहे.

कृषी खात्यानुसार गेल्या वर्षी भरमसाठ काजूचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षी २२ हजार मेट्रिक टनपर्यंत काजूचे उत्पादन पाेहचले हाेते. पण या हंगामात काजू उत्पादन १० हजार मेट्रिक टन हाेणेही कठीण झाले आहे. काही कलमी काजू लागले हाेते ते ही आता कमी झाले आहे. गावठी काजूला यंदा चांगला बहर आला नाही. तसेच दरही नसल्याने अनेक शेतकरी नुकसानीत सापडले आहेत.

सत्तरी पेडणे काणकोण या तालुक्यात अनेक शेतकरी काजू उत्पादनावर अवलंबून असतात. त्यांचे वार्षिक उत्पादन हे काजू पिकावर अवलंबून असते. काही जणांचा काजूच्या हंगामात ३ महिन्यात लाखो रुपयांचे उत्पादन केले जाते. पण मागील काही वर्षांपासून काजूचा दर खाली येत असल्याने शेतकऱ्यांना याचा बराच फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्चही उभा होत नाही.

काही वर्षापूर्वी काजूचा दर हा २०० रुपया प्रती किलो पर्यंत गेला होता. ताेच आता १११ रुपया प्रती किलाेवर आला आहे. काजू कारखानदार परदेशातील आफ्रिकन काजू आणत असल्याने स्थानिक काजू्ला दर दिला जात नाही. त्यामुळे सरकारने या आयात काजूवर आयात कर लागू करावा जेणे करुन हे कारखानदार बाहेरील काजू आणणार नाही. यामुळे आमच्या काजूला मागणी वाढणार असे काणकाेण येथील शेतकरी रामचंद्र गावकर यांनी सांगितले.

इतर भात शेती सोडून काजू उत्पादन केले आहे. सुरुवातीला चांगले पिक मिळाले आता उत्पादन घटले आहे आणि दरही कमी झाला आो. त्यामुळे कामगारांचा साफसफाईसाठी केलेला खर्चही उभा होत नाही त्यामुळे आता काजू बागायती करणे नकाे झाले आहे, असे सत्तरीतील उत्तम गावस या काजू बागायतदार शेतकऱ्यांने सांगितले.

टॅग्स :goaगोवा