शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

यंदा काजू उत्पादन ५० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता : दरातही घसरण काजू उत्पादक नुकसानीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 16:54 IST

कृषी खात्यानुसार गेल्या वर्षी भरमसाठ काजूचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षी २२ हजार मेट्रिक टनपर्यंत काजूचे उत्पादन पाेहचले हाेते.

पणजी (नारायण गावस): यंदाचा काजू हंगाम हा शेतकऱ्यांसाठी खूपच नुकसानदायक ठरला असून यंदा ५० टक्के उत्पादन मिळणे कठीण झाले आहे. बदलत्या हवामानाचा काजू पिकावर परिणाम जाणवला त्यात दरातही कमतरता असल्याने शेतकरी पूर्णपणे नुकसानीत सापडला आहे.

कृषी खात्यानुसार गेल्या वर्षी भरमसाठ काजूचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षी २२ हजार मेट्रिक टनपर्यंत काजूचे उत्पादन पाेहचले हाेते. पण या हंगामात काजू उत्पादन १० हजार मेट्रिक टन हाेणेही कठीण झाले आहे. काही कलमी काजू लागले हाेते ते ही आता कमी झाले आहे. गावठी काजूला यंदा चांगला बहर आला नाही. तसेच दरही नसल्याने अनेक शेतकरी नुकसानीत सापडले आहेत.

सत्तरी पेडणे काणकोण या तालुक्यात अनेक शेतकरी काजू उत्पादनावर अवलंबून असतात. त्यांचे वार्षिक उत्पादन हे काजू पिकावर अवलंबून असते. काही जणांचा काजूच्या हंगामात ३ महिन्यात लाखो रुपयांचे उत्पादन केले जाते. पण मागील काही वर्षांपासून काजूचा दर खाली येत असल्याने शेतकऱ्यांना याचा बराच फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्चही उभा होत नाही.

काही वर्षापूर्वी काजूचा दर हा २०० रुपया प्रती किलो पर्यंत गेला होता. ताेच आता १११ रुपया प्रती किलाेवर आला आहे. काजू कारखानदार परदेशातील आफ्रिकन काजू आणत असल्याने स्थानिक काजू्ला दर दिला जात नाही. त्यामुळे सरकारने या आयात काजूवर आयात कर लागू करावा जेणे करुन हे कारखानदार बाहेरील काजू आणणार नाही. यामुळे आमच्या काजूला मागणी वाढणार असे काणकाेण येथील शेतकरी रामचंद्र गावकर यांनी सांगितले.

इतर भात शेती सोडून काजू उत्पादन केले आहे. सुरुवातीला चांगले पिक मिळाले आता उत्पादन घटले आहे आणि दरही कमी झाला आो. त्यामुळे कामगारांचा साफसफाईसाठी केलेला खर्चही उभा होत नाही त्यामुळे आता काजू बागायती करणे नकाे झाले आहे, असे सत्तरीतील उत्तम गावस या काजू बागायतदार शेतकऱ्यांने सांगितले.

टॅग्स :goaगोवा