शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

यंदा काजू उत्पादन ५० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता : दरातही घसरण काजू उत्पादक नुकसानीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 16:54 IST

कृषी खात्यानुसार गेल्या वर्षी भरमसाठ काजूचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षी २२ हजार मेट्रिक टनपर्यंत काजूचे उत्पादन पाेहचले हाेते.

पणजी (नारायण गावस): यंदाचा काजू हंगाम हा शेतकऱ्यांसाठी खूपच नुकसानदायक ठरला असून यंदा ५० टक्के उत्पादन मिळणे कठीण झाले आहे. बदलत्या हवामानाचा काजू पिकावर परिणाम जाणवला त्यात दरातही कमतरता असल्याने शेतकरी पूर्णपणे नुकसानीत सापडला आहे.

कृषी खात्यानुसार गेल्या वर्षी भरमसाठ काजूचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षी २२ हजार मेट्रिक टनपर्यंत काजूचे उत्पादन पाेहचले हाेते. पण या हंगामात काजू उत्पादन १० हजार मेट्रिक टन हाेणेही कठीण झाले आहे. काही कलमी काजू लागले हाेते ते ही आता कमी झाले आहे. गावठी काजूला यंदा चांगला बहर आला नाही. तसेच दरही नसल्याने अनेक शेतकरी नुकसानीत सापडले आहेत.

सत्तरी पेडणे काणकोण या तालुक्यात अनेक शेतकरी काजू उत्पादनावर अवलंबून असतात. त्यांचे वार्षिक उत्पादन हे काजू पिकावर अवलंबून असते. काही जणांचा काजूच्या हंगामात ३ महिन्यात लाखो रुपयांचे उत्पादन केले जाते. पण मागील काही वर्षांपासून काजूचा दर खाली येत असल्याने शेतकऱ्यांना याचा बराच फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्चही उभा होत नाही.

काही वर्षापूर्वी काजूचा दर हा २०० रुपया प्रती किलो पर्यंत गेला होता. ताेच आता १११ रुपया प्रती किलाेवर आला आहे. काजू कारखानदार परदेशातील आफ्रिकन काजू आणत असल्याने स्थानिक काजू्ला दर दिला जात नाही. त्यामुळे सरकारने या आयात काजूवर आयात कर लागू करावा जेणे करुन हे कारखानदार बाहेरील काजू आणणार नाही. यामुळे आमच्या काजूला मागणी वाढणार असे काणकाेण येथील शेतकरी रामचंद्र गावकर यांनी सांगितले.

इतर भात शेती सोडून काजू उत्पादन केले आहे. सुरुवातीला चांगले पिक मिळाले आता उत्पादन घटले आहे आणि दरही कमी झाला आो. त्यामुळे कामगारांचा साफसफाईसाठी केलेला खर्चही उभा होत नाही त्यामुळे आता काजू बागायती करणे नकाे झाले आहे, असे सत्तरीतील उत्तम गावस या काजू बागायतदार शेतकऱ्यांने सांगितले.

टॅग्स :goaगोवा