शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

रुग्ण शुल्क प्रकरणी मंत्री केसरकर, सिंधुदुर्गातील भाजप शिष्टमंडळाचे मुख्यमंत्री पर्रीकर यांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 15:59 IST

महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तसेच राजापुर रत्नागिरी आदी भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत असतात त्यांना 1 डिसेंबरपासून शुल्क लागू होणार आहे.

पणजी - गोवा मेडिकल कॉलेज इस्पितळात परप्रांतीय रुग्णांना येत्या महिन्यापासून शुल्क लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याच्या पार्श्वभूमीवर शेजारी महाराष्ट्राचे गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा तसेच गोमेकॉ चे डीन प्रदीप नाईक यांची भेट घेतली. दुसरीकडे सिंधुदुर्ग भाजप शिष्टमंडळाने प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना निवेदन सादर करून या निर्णयावर फेरविचाराची मागणी केली आहे.शेजारी महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तसेच राजापुर रत्नागिरी आदी भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत असतात त्यांना 1 डिसेंबरपासून शुल्क लागू होणार आहे.  तूर्त गोमेकॉत बाह्यरुग्ण विभागात तपासणी करून घेण्यासाठी येणाऱ्या परप्रांतीयांच्या वेगळ्या रांगा करण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग,कारवार भागात उपचारांची सोय नसल्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण गोमेकॉत येत असतात. या रुग्णाचा अतिरिक्त भार गोवा सरकारला सहन करावा लागत असल्याने नवे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी एक डिसेंबरपासून शुल्क लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्याचे पडसाद शेजारी सिंधुदुर्गात उमटले.लोकमत च्या या प्रतिनिधीने मंत्री केसरकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारच्या राजीव गांधी आरोग्यदायी योजनेंतर्गत रुग्णांना  उपचारासाठी लागणाऱ्या शुल्काचा परतावा देण्याची व्यवस्था करण्यात येणार असून हा प्रस्ताव मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे. कालांतराने सिंधुदुर्गातील कोणी रुग्ण उपचारासाठी गोमेकॉत आल्यास खर्चाचा पूर्ण परतावा मिळणार आह. या योजनेचे नामांतर आता महात्मा फुले आरोग्यदायी योजना असे करण्यात येणार आहे. ही योजना मार्गी लागेपर्यंत सिंधुदुर्गातील रुग्णांना शुल्क आकारले नये अशी मागणी केसरकर यांनी केली आहे. भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, पक्षाचे राज्य सरचिटणीस राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडीच्या उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, अतुल काळसेकर, बांद्याचे सरपंच मंदार कल्याणकर तालुकाध्यक्ष महेश सारंग, मंगेश तळवणेकर, दादू कविटकर, आनंद तेली, राजू राऊळ आदींनी मुख्यमंत्री पर्रिकर यांची भेट घेतली. सिंधुदुर्गातून गोमेकॉत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना वरील निर्णयाचा त्रास होणार आहे याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. परप्रांतीय रुग्णांच्या वेगळ्या रांगा लावल्याने गैरसमज निर्माण झाल्याचे निदर्शनास आणण्यात आले. महाराष्ट्र सरकारच्या राजीव गांधी आरोग्यदायी योजनेत लाभ सिंधुदुर्गातील रुग्णांना गोमेद होते ही मिळावा जेणेकरून त्यांना शुल्काचा परतावा मिळेल, असे मत जठार यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकर