शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
2
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
3
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
4
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
5
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
6
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
7
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
8
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
9
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
10
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
11
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
12
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
13
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
14
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
15
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
16
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
17
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
18
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
19
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!

गोव्याबाहेर नोकरभरती करणाऱ्या कंपन्यांविरोधात 'खटला': बाबूश मोन्सेरात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2024 08:53 IST

कामगार कायद्यात कडक तरतुदी करणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्याबाहेर नोकरभरतीची जाहिरात देणाऱ्या खासगी कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी कामगार कायद्याअंतर्गत कडक तरतूद केली जाईल. वेर्णा येथील ज्या दोन कंपन्यांनी गोव्याबाहेर नोकरभरतीची जाहिरात दिली होती, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून न्यायालयात खटला दाखल केल्याची माहिती कामगार मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेवेळी दिली.

बाणावलीचे आमदार कॅप्टन वेन्झी व्हिएगश यांनी राज्यातील युवकांमध्ये बेरोजगारी वाढत आहे. सरकार बेराजगारी कमी करण्यासाठी कोणती ठोस पावले उचलत आहे, खासगी कंपन्यांमध्ये गोमंतकीयांना असलेल्या रोजगार संधी, अशी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर मंत्री मोन्सेरात यांनी वरील माहिती दिली.

आमदार व्हिएगस म्हणाले, गोव्यात बेरोजगारीचा टक्का वाढत आहे. खासगी नोकऱ्यांसाठी रोजगार मेळावा आयोजित करतानाच सरकारी नोकऱ्यांसाठी सुध्दा अशाच प्रकारे रोजगार मेळावा करावा. त्यामुळे कोणत्या सरकारी खात्यांमध्ये किती नोकऱ्या आहेत याची माहिती समजेल. नोकऱ्यांची पुरेशी संधी नसल्याने युवक राज्याबाहेर नोकरीच्या शोधात जात आहेत. शिपिंग कंपन्यांना गोव्यात आमंत्रित करावे, यातून रोजगार निर्मिती होईल. त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करावी, अशी मागणी त्यांनी केली.

सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर म्हणाले, की गोव्यात उद्योग आहेत. मात्र त्यात गोमंतकीय तरुणांना अपेक्षित नोकरीची संधी मिळत नाही. त्यामुळे खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गोमंतकीयांसाठी ८० टक्के नोकऱ्या आरक्षित करण्याचा ठराव सरकारने घ्यावा. गोव्यातील फार्मा कंपन्या राज्याबाहेर नोकरभरती करतात. गोव्याच्या युवकांवर हा अन्याय आहे. अशा कंपन्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली.

वेर्णा येथील इंडिको फार्मा व एनक्यूब या कंपन्यांनी गोव्याबाहेर नोकरभरतीची जाहिरात दिल्याची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. त्या दोन्ही कंपन्यांना नोटीस बजावून न्यायालयात त्यांच्याविरोधात खटला दाखला केला आहे. सरकार बेरो- जगारीच्या मुद्यावर गंभीर आहे. आतापर्यंत ४३ रोजगार मेळावे झाले असून त्यात २ हजारहून अधिकांना रोजगार मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

बेरोजगारीत गोवा दुसरा

गोवा देशात बेरोजगारीत दुसऱ्या स्थानावर आहे. केंद्र सरकारच्याच अहवालात ही माहिती आहे. सरकार रोजगार मेळावा करतो त्यावर पैसेही खर्च करतो. प्रत्यक्षात मात्र त्यातून किती जणांना नोकऱ्या मिळाल्या. यावर काहीच स्पष्टता नाही. रोजगार मेळावे म्हणजे इव्हेंट मेळावे बनल्याचा आरोप विरोधी पक्षनेता युरी आलेमाव यांनी केला.

 

टॅग्स :goaगोवाVidhan Bhavanविधान भवनvidhan sabhaविधानसभा