शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

मनोज परब विरोधातील गुन्हा न्यायालयाकडून रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 08:33 IST

शेळ मेळावली आयआयटी विरोधातील आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : शेळ मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाविरोधात केलेल्या आंदोलनासाठी रेव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षाचे नेते मनोज परब यांच्या विरोधात दाखल केलेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने रद्द केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे व न्या. महेश सोनक यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. हे प्रकरण २०२१ मधील आहे. शेळ मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी जनआंदोलन उभारले होते.

त्यात आरजी नेत्यांनीही भाग घेतला होता. त्यावेळी वाळपई पोलिसांनी परब यांच्या समवेत २३ जणांविरोधात गुन्हा नोंद केला होता. यात एकाला अटकही झाली होती. वाळपई पोलिसांच्या या कारवाई विरोधात मनोज परब व इतरांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून गुन्हा रद्द करावा, अशी मागणी केली होती.

सदर आंदोलन प्रकरणाचा तपास वाळपई पोलिसांकडून गुन्हा अन्वेषण विभागाकडे त्यानंतर वर्ग केला होता. उच्च न्यायालयात आरजी नेते मनोज परब यांची बाजू काँग्रेसचे हळदोणेचे आमदार अॅड. कार्लस फरेरा यांनी प्रखरपणे बाजू मांडली होती. त्यानंतर न्यायालयात परब तसेच अन्य जणांविरोधातील गुन्हा चार वर्षांनी रद्द केला आहे.

काय आहे प्रकरण ?

सत्तरी येथील शेळ मेळावली येथे सरकारने आयआयटी उभारण्यासाठी जागा प्रस्तावित केली होती. मात्र, या प्रकल्पाला तेथील स्थानिकांनी विरोध करीत आंदोलन केले. सदर प्रकल्प आमच्या जागेत नको, अशी भूमिका त्यांनी घेतली. या आंदोलनाला आरजी पक्षाने पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर पोलिसांनी मनोज परब यांच्यासह पक्षाचे अन्य नेते व इतरांविरोधात गुन्हे नोंद केले होते. 

टॅग्स :goaगोवाCourtन्यायालय