शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

काणकोणातील समुद्राचे निळे पाणी अचानक झाले हिरवे, तज्ज्ञांनी दिली धोक्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 14:27 IST

Canacona Goa : समुद्रातील पाण्यातील ऑक्सिजन कमी होत असल्याने मासे आणि समुद्रातील इतर जीव जंतूंसाठी ते घातक ठरु शकते

सुशांत कुंकळयेकर

मडगाव - गोव्यातील अत्यंत निसर्गरम्य परिसर म्हणून ज्याला ओळखले जाते त्या काणकोण परिसरातील समुद्राचे निळे पाणी अकस्मात हिरवे झाल्याने स्थानिकांमध्ये आश्चर्य पसरले आहे. या अचानक झालेल्या बदलाने पर्यटकांनीही इथल्या समुद्र किनाऱ्याकडे पाठ फिरवली आहे.

सुरुवातीला हा प्रकार केवळ आगोंद येथे आढळून आला होता. त्यानंतर पालोळे, पाटणे, कोळंब, राजबाग या ठिकाणीही असा प्रकार दिसून आला. मागच्या कित्येक वर्षात प्रथमच असा प्रकार आपण पाहिल्याचे स्थानिक नागरसेवक दिवाकर पागी यांनी सांगितले. या पाण्याला कुजका वास येत असल्यामुळे पर्यटकांनीही किनाऱ्याकडे पाठ फिरवली. मात्र कालपासून हे पाणी निवळू लागले आहे अशी माहिती सायमन रिबेलो या अन्य एका व्यावसायिकाने दिली.

समुद्राचे पाणी अकस्मात हिरवे होण्यामागे समुद्रातील शेवाळ (अल्गल ब्लूम्स) असे सांगण्यात येत असले आणि त्यामागे तापमान वाढ हे मुख्य कारण असे सांगितले जात असले तरी अशा शेवळाची वाढ प्रक्रिया न केलेले सांडपाणी मोठ्या प्रमाणावर समुद्रात सोडल्याने होऊ शकते. समुद्रात असे बदल होणे ही धोक्याची सूचना असून सारे काही आलबेल नाही हेच त्याच्यातून सूचित होत असल्याचे मत मरिन झूओलॉजिस्ट डॉ. मनोज बोरकर यांनी व्यक्त केले.

डॉ. बोरकर यांनी पाण्यातील जीवसृष्टीवर अभ्यास केलेला असून ते म्हणाले, मानवी मैला आणि इतर प्रकारच्या सांडपाण्यावर हे शेवाळ वाढते. ते वाढण्यामागे जागतिक पर्यावरण बदल हे जरी कारण असले तरी सांडपाण्याच्या कारणाकडे दुर्लक्ष करता कामा नये असे ते म्हणाले. शेतात पीक येण्यासाठी जर अती प्रमाणात खत वापरले आणि हे खतमिश्रित पाणी पावसाने वाहून समुद्रात आले तरी त्यामुळे असे शेवाळ वाढू शकते याकडे त्यांनी लक्ष वेधले.

बुधवारी सकाळी काणकोण तालुक्यातील आगोंद किनाऱ्यावर हिरव्या पाण्याच्या लाटा येऊ लागल्यानंतर सगळेच आश्चर्यचकीत झाले होते. या पाण्याला एकप्रकारचा घाण वास येत होता.

यावर एनआयओचे संचालक सुनील कुमार सिंग यांनी खुलासा करताना हा बदल 'अल्गल ब्लूम्स' (शेवाळ)मुळे असल्याचे म्हटले होते. महाराष्ट्र आणि कर्नाटक किनारपट्टीवर असे शेवाळ सापडते. हे शेवाळ विषारी नसल्याने मानवाला ते हानिकारक नाही पण त्यामुळे समुद्रातील पाण्यातील ऑक्सिजन कमी होत असल्याने मासे आणि समुद्रातील इतर जीव जंतूंसाठी ते घातक ठरु शकते असे सिंग यांनी सांगितले.

मात्र या घटनेकडे तसेच या दिवसात गोव्यातील समुद्रात होणाऱ्या इतर बदलाकडे गंभीरपणे पाहून अभ्यास करण्याची गरज डॉ. बोरकर यांनी व्यक्त केली. गोव्यातील समुद्रावर मोठ्या प्रमाणावर जेली फिश मिळतात हीही एक धोक्याची सूचना असून काही ठिकाणी समुद्राच्या लाटातून निल किरणे ( बायो ईल्युमिन्स) दिसू लागल्याने समुद्राच्या पाण्यात विपरीत बदल होत असल्याच्या गोष्टीवर शिक्कामोर्तब होत असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवा