शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

काणकोणातील समुद्राचे निळे पाणी अचानक झाले हिरवे, तज्ज्ञांनी दिली धोक्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 14:27 IST

Canacona Goa : समुद्रातील पाण्यातील ऑक्सिजन कमी होत असल्याने मासे आणि समुद्रातील इतर जीव जंतूंसाठी ते घातक ठरु शकते

सुशांत कुंकळयेकर

मडगाव - गोव्यातील अत्यंत निसर्गरम्य परिसर म्हणून ज्याला ओळखले जाते त्या काणकोण परिसरातील समुद्राचे निळे पाणी अकस्मात हिरवे झाल्याने स्थानिकांमध्ये आश्चर्य पसरले आहे. या अचानक झालेल्या बदलाने पर्यटकांनीही इथल्या समुद्र किनाऱ्याकडे पाठ फिरवली आहे.

सुरुवातीला हा प्रकार केवळ आगोंद येथे आढळून आला होता. त्यानंतर पालोळे, पाटणे, कोळंब, राजबाग या ठिकाणीही असा प्रकार दिसून आला. मागच्या कित्येक वर्षात प्रथमच असा प्रकार आपण पाहिल्याचे स्थानिक नागरसेवक दिवाकर पागी यांनी सांगितले. या पाण्याला कुजका वास येत असल्यामुळे पर्यटकांनीही किनाऱ्याकडे पाठ फिरवली. मात्र कालपासून हे पाणी निवळू लागले आहे अशी माहिती सायमन रिबेलो या अन्य एका व्यावसायिकाने दिली.

समुद्राचे पाणी अकस्मात हिरवे होण्यामागे समुद्रातील शेवाळ (अल्गल ब्लूम्स) असे सांगण्यात येत असले आणि त्यामागे तापमान वाढ हे मुख्य कारण असे सांगितले जात असले तरी अशा शेवळाची वाढ प्रक्रिया न केलेले सांडपाणी मोठ्या प्रमाणावर समुद्रात सोडल्याने होऊ शकते. समुद्रात असे बदल होणे ही धोक्याची सूचना असून सारे काही आलबेल नाही हेच त्याच्यातून सूचित होत असल्याचे मत मरिन झूओलॉजिस्ट डॉ. मनोज बोरकर यांनी व्यक्त केले.

डॉ. बोरकर यांनी पाण्यातील जीवसृष्टीवर अभ्यास केलेला असून ते म्हणाले, मानवी मैला आणि इतर प्रकारच्या सांडपाण्यावर हे शेवाळ वाढते. ते वाढण्यामागे जागतिक पर्यावरण बदल हे जरी कारण असले तरी सांडपाण्याच्या कारणाकडे दुर्लक्ष करता कामा नये असे ते म्हणाले. शेतात पीक येण्यासाठी जर अती प्रमाणात खत वापरले आणि हे खतमिश्रित पाणी पावसाने वाहून समुद्रात आले तरी त्यामुळे असे शेवाळ वाढू शकते याकडे त्यांनी लक्ष वेधले.

बुधवारी सकाळी काणकोण तालुक्यातील आगोंद किनाऱ्यावर हिरव्या पाण्याच्या लाटा येऊ लागल्यानंतर सगळेच आश्चर्यचकीत झाले होते. या पाण्याला एकप्रकारचा घाण वास येत होता.

यावर एनआयओचे संचालक सुनील कुमार सिंग यांनी खुलासा करताना हा बदल 'अल्गल ब्लूम्स' (शेवाळ)मुळे असल्याचे म्हटले होते. महाराष्ट्र आणि कर्नाटक किनारपट्टीवर असे शेवाळ सापडते. हे शेवाळ विषारी नसल्याने मानवाला ते हानिकारक नाही पण त्यामुळे समुद्रातील पाण्यातील ऑक्सिजन कमी होत असल्याने मासे आणि समुद्रातील इतर जीव जंतूंसाठी ते घातक ठरु शकते असे सिंग यांनी सांगितले.

मात्र या घटनेकडे तसेच या दिवसात गोव्यातील समुद्रात होणाऱ्या इतर बदलाकडे गंभीरपणे पाहून अभ्यास करण्याची गरज डॉ. बोरकर यांनी व्यक्त केली. गोव्यातील समुद्रावर मोठ्या प्रमाणावर जेली फिश मिळतात हीही एक धोक्याची सूचना असून काही ठिकाणी समुद्राच्या लाटातून निल किरणे ( बायो ईल्युमिन्स) दिसू लागल्याने समुद्राच्या पाण्यात विपरीत बदल होत असल्याच्या गोष्टीवर शिक्कामोर्तब होत असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवा