शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
4
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
5
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
6
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
7
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
9
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
10
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
11
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
13
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
14
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
15
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
16
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
17
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
18
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
19
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
20
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळात फेरबदल अटळ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2024 08:16 IST

दोन वर्षे राहिली, सरकारला चांगले आऊटपूट द्यावेच लागेल; कामात 'इंटरेस्ट' नसलेल्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन घरी जावे

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : काही कालावधी लागेल, परंतु मंत्रिमंडळ फेरबदल करावेच लागतील, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. काल, सोमवारी एका मुलाखतीत ते बोलत होते. 

अलीकडेच संपलेल्या विधानसभा अधिवेशनात काही मंत्र्यांची अत्यंत खराब कामगीरी दिसून आल्याने त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, विधानसभा निवडणुकीला दोन वर्षे राहिली आहेत. सरकारला चांगले आऊटपूट द्यावे लागेल. विकसित भारत २०४७ व विकसित गोव्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर कार्यक्षमतेला महत्त्व द्यावे लागेल. वेळ लागेल, परंतु बदल करावेच लागतील.

रस्त्यांवरील खड्ड्यांबदद्‌ल सावंत म्हणाले की, 'जास्त पाऊस पडल्याने रस्ते वाहून गेले हे मानायला मी तयार नाही. कंत्राटदार, अभियंत्यांचीही जबाबदारी आहे. खराब रस्ता एक पैसाही खर्च न करता कंत्राटदाराकडून पुन्हा करुन घेऊ.' डोंगरफोड प्रकरणी तलाठ्यांना जबाबदार धरण्याचा निर्णयाचेही मुख्यमंत्र्यांनी समर्थन केले. 

ऑल इज वेल : मुख्यमंत्री

सरकारमधील एक आमदारच 'ऑल इज नॉट वेल असे म्हणतो त्यावर तुमचे काय म्हणणे आहे? असा सवाल केला असता सावंत म्हणाले की, 'सरकारमध्ये सर्च काही सुरळीतच आहे. बघण्याचा दृष्टिकोन योग्य असल्यास चांगलेच दिसते. कधी विकास झाला नाही एवढा गेल्या दहा वर्षात मी केला. राज्याला महसूलही मोठ्या प्रमाणात मिळू लागला आहे. एखादी चूक असेल तर सत्ताधारी आमदाराने सार्वजनिक ठिकाणी का बोलावे? त्याने माझ्याकडे बोलता आले असते. विरोधी आमदार असला तर त्यानेही मला सांगावे. गोव्याचे नाव बाद करु नये. पर्यटक मोसम तोंडावर काही विरोधी आमदारही स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी काहीबाही आरोप करतात व गोव्याचे नाव खराब करतात.

समन्वयाच्या अभावामुळे विधेयके मागे घेण्याची वेळ

विधेयके मागे घेण्याची वेळ सरकारवर आली, त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, 'टीसीपी विधेयक नगरनियोजन खाते व कायदा खाते यांच्यात समन्वयाच्या अभावामुळेच योग्यरित्या ड्राफ्ट झाले नाही व ते मागे घ्यावे लागले. कायदा खात्याने अभ्यास करायचा असतो. घाईघाईत हे विधेयक आणले. परंतु लोकभावनेचा आदर करुन मागे घ्यावे लागले. आयपीबी विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवावे लागले.

नियम कडक करून जमीन विक्रीस प्रतिबंध

पेडण्यात लोकांना जमिनी वाचवण्यासाठी 'रखणदाराला' गाहाणे घालावे लागले. परप्रांतीय येतात व येथे मोठमोठी बांधकामे करतात. यारबद्दल विचारले असता सावंत म्हणाले की, 'कायदे करणे हे सरकारचे काम व त्याचे पालन करणे हे जनतेचे काम. वैयक्तिकपणे जमीन कोण कोणाला विकणार यावर बंधन घालणे शक्य नाही. फक्त शेतकऱ्यांनाच जमीन विकता येईल हे विधेयक मीच आणले. झोन बदल शुल्क महाग करुन ठेवले. सरकार नियम कडक करुन जमीन विकण्यासाठी प्रतिबंध करु शकते.'

...तर कर्मचाऱ्यांची बढती रोखण्याची कारवाई सुरू होईल

दरम्यान, एका प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी कामचुकार तसेच सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. कामात 'इंटरेस्ट' नसलेल्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन घरी जावे, असे त्यांनी बजावले. सावंत म्हणाले की, काही खात्यांमध्ये कर्मचारी थोडे सुस्तावले आहेत. कामचुकार कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा, निलंबन, पेन्शन अडवून ठेवणे, गोपनीय अहवालात शेरा मारणे तसेच ७ पेक्षा कमी गुण मिळाल्यास बढती रोखण्याची कारवाई सुरु होईल. काहीजणांना नोटिसा पाठवलेल्या आहेत. आमदार, मंत्री आदी लोकप्रितिनिधी जनतेचे जसे सेवक असतात तसे अधिकारीही जनतेच्या सेवेला बांधील असतात. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत