शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

मंत्रिमंडळ फेरबदल चतुर्थीपूर्वी?; दामू नाईक यांची बी. एल. संतोष यांच्याशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 08:08 IST

रिपोर्ट कार्डेही तयार केल्याची माहिती त्यांना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मंत्रिमंडळ फेरबदल चतुर्थीपूर्वीच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत व भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल दिल्लीत पक्षाच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेतली. दामू यांनी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्याशी तासभर चर्चा केली व अधिवेशनातील मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला. तसेच रिपोर्ट कार्डेही तयार केल्याची माहिती त्यांना दिली.

राष्ट्रीय सरचिटणीस संतोष यांनी काही गोष्टी बारकाईने जाणून घेतल्या. प्राप्त माहितीनुसार पहिल्या टप्प्यात दोन आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल. त्यासाठी दिगंबर कामत व रमेश तवडकर यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. काँग्रेसमधून फुटून आलेल्या आठ आमदारांपैकी दिगंबर कामत यांचे मंत्रिपद गेला बराच काळ रखडले आहे. आज होईल, उद्या होईल या आशेवर ते आहेत. परंतु आता ती वेळ आलेली असल्याची माहिती मिळाली आहे.

गोविंद गावडे यांना डच्चू दिल्याने त्यांची जागा रिकामी आहे. मुख्यमंत्र्यांकडे सुमारे २४ खाती आहेत. दोघांना मंत्रिमंडळात स्थान द्यायचे झाले तर आणखी एकाला वगळावे लागेल. पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा हे आजारातून बरे तसे अजून झालेले नाहीत. विधानसभा अधिवेशनात त्यांनी उपस्थिती लावली. परंतु त्यांच्या खात्यांच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला सभागृहात मुख्यमंत्र्यांनीच उत्तर दिले. आजारपणामुळे सिक्वेरा यांना वगळले जाण्याची शक्यता आहे.

'लोकमत'ने दामू नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राजकीय गोष्टींवर संतोष यांच्याशी चर्चा झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. परंतु अधिक काही सांगण्याचे टाळले. ते म्हणाले की, 'मंत्रिमंडळाचा विषय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित येतो. त्यामुळे मी यावर भाष्य करू इच्छित नाही. मुख्यमंत्रीच काय ते सांगतील. संतोष यांच्याकडे संघटनात्मक बाबींवर मी सखोल चर्चा केलेली आहे.'

मंत्री कामच करत नाहीत : लोबो

म्हापसा : राज्यात मंत्री असताना, प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्रीच देतात. प्रत्येक विषयाची हाताळणी तेच करतात. यावरून मंत्र्यांकडून अपेक्षित काम योग्य प्रकारे होत नसल्याचे स्पष्ट होते अशी टीका कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केली. मंत्र्यांनी आपली कामे योग्यरीतीने करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कळंगुट येथे बांदोडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आमदार लोबो यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सध्या प्रत्येक प्रश्नाला मुख्यमंत्रीच उत्तर देतात आणि मंत्री काम करत नाहीत. मंत्र्यांनी चांगल्या पद्धतीने काम करण्याची गरज आहे. 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारPoliticsराजकारण