शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

पुढील पर्यटन हंगामाबाबत गोव्यातील व्यावसायिक आशावादी पण किनाऱ्यांवरील ८0 टक्के शॅकवाल्यांनी धंदा गुंडाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 12:48 IST

गोव्यात पावसाळ्यानंतर येणारा पुढील पर्यटन हंगाम व्यवसायाच्यादृष्टिने चांगला जाईल, अशी आशा या क्षेत्रातील व्यावसायिक बाळगून आहेत.

पणजी : गोव्यात पावसाळ्यानंतर येणारा पुढील पर्यटन हंगाम व्यवसायाच्यादृष्टिने चांगला जाईल, अशी आशा या क्षेत्रातील व्यावसायिक बाळगून आहेत. दुसरीकडे किनाऱ्यांवरील ८0 टक्के शॅकवाल्यांनी आपला व्यवसाय गुंडाळला आहे. जीएसटी तसेच अन्य कारणांमुळे मंदीमुळे यंदा पर्यटकांचे प्रमाण तुलनेत कमी असल्याचा दावा व्यावसायिकांकडून केला जात आहे. तर पर्यटन खात्याचे म्हणणे असे आहे की, देशी आणि विदेशी दोन्ही पर्यटकांची संख्या वाढलेली आहे. 

अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ म्हणाले की, दक्षिण गोव्यात केळशी किनाऱ्यावर १७ पैकी केवळ एकच शॅक कार्यरत आहे. कळंगुट, कांदोळी, बागा किनाऱ्यांवर ६0 टक्के शॅक काढण्यात आले. नोटाबंदीचा परिणाम अजून जाणवत आहे. अन्न पदार्थ तसेच इतर वस्तूंवर जीएसटी लागू केल्याने पर्यटक दुरावले आहेत. दुसरी बाब म्हणजे पर्यटन क्षेत्रात पायाभूत सुविधांमध्ये वाढ होण्याची गरज आहे. पर्यटनाच्या बाबतीत श्रीलंका, थायलँड, मलेशिया या राष्ट्रांपेक्षा भारत मागे आहे. तेथे स्वस्ताईमुळेही पर्यटक आकर्षित होत आहेत. पर्यटन संचालक मिनीन डिसोझा म्हणाले की, पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात साधारणपणे ८0 लाख पर्यटकांनी गोव्याला भेट दिली होती. यंदा हे प्रमाण आणखी वाढलेले आहे. दुसरीकडे खाजगी जमिनींमधील शॅकना यापुढे पावसाळ्यात शॅक काढावे लागणार नाहीत. त्यासाठी सीआरझेड कायद्यात दुरुस्ती आणली जात आहे. १८ जूनपर्यंत सरकारने हरकती व सूचना मागविल्या आहेत. खाजगी जमिनीत असलेली शॅक बांधकामे न हटविता ती केवळ प्लास्टिकची आश्चादने करुन झाकून ठेवल्याचेही चित्र काही किनाºयांवर दिसत आहे.   अद्याप नुकसान भरपाई नाहीदरम्यान, काही दिवसांपूर्वी ओखी वादळात किनाऱ्यांवरील शॅकमध्ये समुद्राचे पाणी घुसून झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप शॅकमालकांना मिळालेली नाही, असे कार्दोझ यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘मोरजी, मांद्रे, हरमल, केळशी, बाणावली भागात किनाऱ्यांवर शॅकमध्ये पाणी घुसून मोठी हानी झाली होती. एका अंदाजानुसार ७५ लाख रुपयांहून अधिक हानी झाली असून सरकारने यावर काहीच हालचाली केलेल्या नाहीत. या विषयाचा आता पाठपुरावा करणार आहोत.’         पुढील पर्यटन हंगामाबाबत आशावादी दरम्यान, पावसाळ्यानंतर येणारा पुढील पर्यटन हंगाम चांगला जाईल, याबाबत खास करुन चार्टर टूर ऑपरेटर्स आशावादी आहेत. ट्रॅव्हल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अर्नेस्ट डायस म्हणाले की, ‘दाबोळी विमानतळावरील धावपट्टीच्या वापराबाबत नौदलाकडून निर्बंध कायम राहतील, असे वाटले होते. परंतु गेल्याच आठवड्यात नौदल अधिकारी आणि विमानतळ प्राधिकरण अधिकारी यांच्यासोबत झालेली बैठक फलदायी ठरल्याने चार्टर विमानांसमोर असलेला अडसर दूर झालेला आहे.’