शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

पुढील पर्यटन हंगामाबाबत गोव्यातील व्यावसायिक आशावादी पण किनाऱ्यांवरील ८0 टक्के शॅकवाल्यांनी धंदा गुंडाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 12:48 IST

गोव्यात पावसाळ्यानंतर येणारा पुढील पर्यटन हंगाम व्यवसायाच्यादृष्टिने चांगला जाईल, अशी आशा या क्षेत्रातील व्यावसायिक बाळगून आहेत.

पणजी : गोव्यात पावसाळ्यानंतर येणारा पुढील पर्यटन हंगाम व्यवसायाच्यादृष्टिने चांगला जाईल, अशी आशा या क्षेत्रातील व्यावसायिक बाळगून आहेत. दुसरीकडे किनाऱ्यांवरील ८0 टक्के शॅकवाल्यांनी आपला व्यवसाय गुंडाळला आहे. जीएसटी तसेच अन्य कारणांमुळे मंदीमुळे यंदा पर्यटकांचे प्रमाण तुलनेत कमी असल्याचा दावा व्यावसायिकांकडून केला जात आहे. तर पर्यटन खात्याचे म्हणणे असे आहे की, देशी आणि विदेशी दोन्ही पर्यटकांची संख्या वाढलेली आहे. 

अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ म्हणाले की, दक्षिण गोव्यात केळशी किनाऱ्यावर १७ पैकी केवळ एकच शॅक कार्यरत आहे. कळंगुट, कांदोळी, बागा किनाऱ्यांवर ६0 टक्के शॅक काढण्यात आले. नोटाबंदीचा परिणाम अजून जाणवत आहे. अन्न पदार्थ तसेच इतर वस्तूंवर जीएसटी लागू केल्याने पर्यटक दुरावले आहेत. दुसरी बाब म्हणजे पर्यटन क्षेत्रात पायाभूत सुविधांमध्ये वाढ होण्याची गरज आहे. पर्यटनाच्या बाबतीत श्रीलंका, थायलँड, मलेशिया या राष्ट्रांपेक्षा भारत मागे आहे. तेथे स्वस्ताईमुळेही पर्यटक आकर्षित होत आहेत. पर्यटन संचालक मिनीन डिसोझा म्हणाले की, पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात साधारणपणे ८0 लाख पर्यटकांनी गोव्याला भेट दिली होती. यंदा हे प्रमाण आणखी वाढलेले आहे. दुसरीकडे खाजगी जमिनींमधील शॅकना यापुढे पावसाळ्यात शॅक काढावे लागणार नाहीत. त्यासाठी सीआरझेड कायद्यात दुरुस्ती आणली जात आहे. १८ जूनपर्यंत सरकारने हरकती व सूचना मागविल्या आहेत. खाजगी जमिनीत असलेली शॅक बांधकामे न हटविता ती केवळ प्लास्टिकची आश्चादने करुन झाकून ठेवल्याचेही चित्र काही किनाºयांवर दिसत आहे.   अद्याप नुकसान भरपाई नाहीदरम्यान, काही दिवसांपूर्वी ओखी वादळात किनाऱ्यांवरील शॅकमध्ये समुद्राचे पाणी घुसून झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप शॅकमालकांना मिळालेली नाही, असे कार्दोझ यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘मोरजी, मांद्रे, हरमल, केळशी, बाणावली भागात किनाऱ्यांवर शॅकमध्ये पाणी घुसून मोठी हानी झाली होती. एका अंदाजानुसार ७५ लाख रुपयांहून अधिक हानी झाली असून सरकारने यावर काहीच हालचाली केलेल्या नाहीत. या विषयाचा आता पाठपुरावा करणार आहोत.’         पुढील पर्यटन हंगामाबाबत आशावादी दरम्यान, पावसाळ्यानंतर येणारा पुढील पर्यटन हंगाम चांगला जाईल, याबाबत खास करुन चार्टर टूर ऑपरेटर्स आशावादी आहेत. ट्रॅव्हल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अर्नेस्ट डायस म्हणाले की, ‘दाबोळी विमानतळावरील धावपट्टीच्या वापराबाबत नौदलाकडून निर्बंध कायम राहतील, असे वाटले होते. परंतु गेल्याच आठवड्यात नौदल अधिकारी आणि विमानतळ प्राधिकरण अधिकारी यांच्यासोबत झालेली बैठक फलदायी ठरल्याने चार्टर विमानांसमोर असलेला अडसर दूर झालेला आहे.’