शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पोलिसांची दादागिरीच; गैर पद्धतीने वागत असतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2024 10:15 IST

राज्यातील पोलिस दलात पूर्वीसारखी भीती राहिलेली नाही

राज्यातील पोलिस दलात पूर्वीसारखी भीती राहिलेली नाही, माशेल भागात एका फास्ट फूड व्यावसायिकाला पोलिसांच्या एका गटाने बेदम मारहाण केली. व्हिडीओ पाहून अनेक गोमंतकीयांच्या मनात प्रचंड संताप दाटून आला. साध्या कारणावरून सामान्य व्यक्तीला अशी मारहाण करणारे मुळात पोलिस कसे असू शकतात, असा प्रश्न पडतो. गोव्यात अशा प्रकारच्या घटना अनेकदा घडत असतात. सामान्य माणूस काहीवेळा तक्रार करायला जात नाही. 

माशेल येथील प्रकार तर फारच गंभीर आहे. चेहऱ्यावर आणि शरीरावर जोरदार ठोसे मारून त्या फास्ट फूड व्यावसायिकाला जखमी केले गेले, अमानुष पद्धतीची ही मारहाण आहे. विराज माशेलकर असे फास्ट फूड मालकाचे नाव आहे. पोलिस खात्याने या घटनेची गंभीर दखल घेऊन लगेच कारवाई सुरू केली, ही चांगली गोष्ट आहे. या प्रकरणी एका हेड कॉन्स्टेबलला सेवेतून निलंबित करण्यात आले, तर दुसऱ्या एका पोलिसाला अटक झाली आहे. आपल्यालाही अटक होऊ शकते याची कल्पना आल्याने आणखी एकटा फरारच झाला आहे. यांना पोलिस म्हणायचे काय असा प्रश्न पडतोच.

राज्यात काही पोलिस खूप गैर पद्धतीनेच वागत असतात, काहीजण तर दादागिरीही करत असतात. लाचखोरीची तक्रार तर काही पोलिसांबाबत अनेकदा येत असते. किनारी भागात आपल्याला ठरावीक ठिकाणीच पोस्टिंग मिळायला हवी म्हणून अनेक पोलिस धडपडत असतात. अनेकदा काही वाहतूक पोलिस पर्यटकांना बरेच छळतात. वारंवार पर्यटकांच्या गाड्या थांबविल्या जातात किंवा परराज्यांतून येणारे ट्रक थांबवून वारंवार कागदपत्रे दाखविण्यास सांगितले जाते, फक्त गोवा राज्यातच हे घडते; मात्र याबाबत पोलिस खात्याच्या प्रमुखांनीही कधी कडक भूमिका घेतली नाही व गृह खात्यालाही कधी हे गंभीरपणे घ्यावे असे वाटले नाही. 

चक्क पर्यटनमंत्री रोहन खंवटे तसेच भाजपचेच आमदार मायकल लोबो यांनी देखील अशा प्रकारांबाबत पूर्वी जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. गोव्याच्या पर्यटनावर अशा काही वाहतूक पोलिसांमुळे परिणाम होत आहे. काही पोलिस आपल्याला लुटतात, अशी नापसंतीची भावना मनात घेऊन पर्यटक माघारी परतत असतात; मात्र पोलिस दल याबाबत सुधारणा करत नाही, पोलिसांनी कसेही वागले तरी चालते असे काही जणांना वाटते की काय?

आम्हाला आज आठवतंय की (स्व.) मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रिपदी असताना अनेक पोलिस सेवेतून निलंबित केले जात होते. पोलिस खात्यात नोकरी करणाऱ्यांनी गैरप्रकार करू नयेत, लाचखोरी करू नये म्हणून पर्रीकर दक्ष असायचे. मुख्यमंत्र्यांचा धाक असावाच लागतो. गेल्यावर्षी कळंगुटच्या पट्ट्यात खंडणी प्रकरण गाजले होते. अगदी कळंगुटच्या आमदारालादेखील अंधारात ठेवून काहीजण खंडणीराज सुरू करू पाहत होते, काही रेस्टॉरंट मालकांनीच तेव्हा तक्रार केली होती, हप्तेबाजीचा कळस गाठायचा असा काही जणांचा हेतू होता. 

आमदार लोबो यांनीच त्या प्रकरणाचे बिंग फोडले, मग तो प्रकार थांबला, किनारी भागात मध्यरात्रीनंतरही मोठ्या पार्यो चालतात, कर्णकर्कश संगीताचा वापर होतो. म्युझिक रात्री दहा वाजता बंद होतच नाही. काही पोलिस व काही राजकारण्यांच्या आशीर्वादाने हे चालते. काही पोलिस कॉन्स्टेबलनादेखील वाट्टेल तसे वागण्याची मुभा मिळाली आहे. पोलिस खात्यात भरती करतानादेखील उमेदवारांची नीट छाननी होत नाही, वशिल्याने काहीजण सेवेत घुसतात. काहीजण पैसे चारूनच नोकरी मिळवतात. गुंड प्रवृत्ती अशा मार्गाने पोलिस दलात प्रवेश करते. त्यांना मग ठरावीक काळाने बढत्याही मिळतात. काहींचे राजकीय नेत्यांकडून सत्कार होतात. सगळी व्यवस्था मग सडू लागते, लोकांना पोलिसांकडून न्याय मिळत नाही. 

साधा एफआयआर देखील काही पोलिस स्थानके नोंदच करत नाहीत. पोलिसांत जाणे म्हणजे कंटाळा असे अन्याय झालेल्या व्यक्तीला वाटू लागते. ही स्थिती बदलावी लागेल, मध्यंतरी दक्षिण गोव्यातील एक पोलिस चक्क चोरट्यालाच सामील झाला होता. त्याने उत्तर गोव्यात जाऊन चोऱ्या कर असा सल्ला चोरट्याला दिला होता. त्याला मग नोकरीवरून कायमचे काढून टाकण्यात आले. सारी व्यवस्थाच सड लागली आहे. हे बदलावे लागेल. 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस