शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

मृत्यूनंतरही विष्णू सूर्या वाघ यांच्याविषयी वाद, मृत्यूच्या चौकशीची भावाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 12:51 IST

अवलिया कलावंत विष्णू सूर्या वाघ यांच्या जीवनात सतत काही ना काही वाद झालेले आहेत. ते गंभीर आजारी असतानाही, अंथरूणाला खिळलेले असतानाही त्यांच्या सुदिरसुक्त या काव्यसंग्रहावरून गोव्यात मोठा वाद झाला होता.

ठळक मुद्दे अवलिया कलावंत विष्णू सूर्या वाघ यांच्या जीवनात सतत काही ना काही वाद झालेले आहेत.गोवा विद्यापीठातील प्रा. रामराव वाघ यांनी भावाच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केलेली आहे. विष्णूला केपटाउनमध्ये का नेले. तिथे काय उपचार केले, याविषयी कागदपत्रे जाहीर करावीत, असे रामराव यांचे म्हणणे आहे.

सुरेश गुदलेपणजी - अवलिया कलावंत विष्णू सूर्या वाघ यांच्या जीवनात सतत काही ना काही वाद झालेले आहेत. ते गंभीर आजारी असतानाही, अंथरूणाला खिळलेले असतानाही त्यांच्या सुदिरसुक्त या काव्यसंग्रहावरून गोव्यात मोठा वाद झाला होता. आता त्यांच्या निधनानंतरही वाद काही त्यांची पाठ सोडत नाही. त्यांचे बंधू आणि गोवा विद्यापीठातील प्रा. रामराव वाघ यांनी भावाच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केलेली आहे. हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. एवढे दिवस मरण गुप्त का ठेवले गेले, याची चौकशी व्हावी. विष्णूला केपटाउनमध्ये का नेले. तिथे काय उपचार केले, याविषयी कागदपत्रे जाहीर करावीत, असे रामराव यांचे म्हणणे आहे.

एकूण काय वाघ आणि वाद हे समीकरण कायम राहिलेले आहे. वाघांनी निवडलेले अनेक विषयही वादाची किनार असलेले. समकालीन सामाजिक आणि राजकीय घटनांचे संदर्भ घेतलेले लिखाण त्यांनी केले. त्यात ‘साम्राज्य’सारख्या नाटकाचा समावेश आहे. मगो पक्षाशी एका रात्रीत फारकत घेऊन कॉँग्रेसमध्ये जात मुख्यमंत्री बनलेले रवी नाईक यांच्या राजकीय जीवनाचा आलेख या नाटकात असल्याची खमंग चर्चासोबत घेऊनच नाटकाचे प्रयोग झाले.

फोंडा (गोवा) येथे प्रशासकीय जबाबदारी सांभाळणाऱ्या एका अधिकाऱ्याने आपली कल्पकता कामाला लावत एक विहीर खणल्याचे कागदोपत्री दाखवले आणि पैसे उकळले. हा संदर्भ पकडून विष्णू यांनी लिहिलेले ‘पेद्रू पडलो बांयत’ (अधिकारी पडला विहिरीत) हे तियात्रही खूपच गाजले. अलीकडेच वादाच्या वावटळीत सापडलेले त्यांचे पुस्तक म्हणजे सुदिरसूूक्त हा काव्यसंग्रह. तो कोंकणीत आहे. गोव्यातील भाषावादात वाघांनी मराठीची बाजू सातत्याने लावून धरली. साहजिकच बराच काळ कोंकणी समर्थकांसाठी ते अस्पृश्य राहिले. त्यांचे सुदिरसूक्त एक तर कुणी चोखंदळाने वाचले नाही किंवा त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. पण कोंकणी अकादमीने आपल्या पुरस्कारासाठी तो काव्यसंग्रह विचारात घेतल्याचे वृत्त आल्यावर गदारोळ उठला होता. आता मत्यूनंतरही वादामुळे आणखी काही दिवस ते बातमीत राहतील एवढे नक्की.तुका अभंग अभंग

विष्णू सूर्या वाघ यांचे तुका अभंग अभंग नाटक खूप गाजले. आजही गोव्यासह महाराष्ट्रातील राज्य नाट्य स्पर्धात या नाटकाचे प्रयोग होतात. ब्राह्णण्यवादी शक्तींनी संत तुकारामांचा खून केला आणि ते सदेह वैकुंठाला गेल्याचे कुंभाड रचले गेले असे या नाटकात म्हटले होते.बंधू रामराव म्हणतात...आम्हाला काही माहितीच नाहीविष्णू वाघ या माझ्या भावाच्या जाण्याने मला अतिव दु:ख झालेले आहे. अंत्यसंस्कार कोठे आणि कधी केले जाणार आहेत, याविषयी तुम्ही माझ्याकडे याक्षणी काही विचारणा करू नका. ही माहिती योग्यवेळी समजेल, अशी अपेक्षा करूया. यावेळी माझ्या कुटुंबीयांना आपल्या पाठिंब्याची गरज आहे. माझ्या भावाच्या मृत्यूविषयी तुम्हाला जी माहिती आहे, तेवढीच मलाही आहे. माझ्या भावाला दक्षिण आफ्रिकेत नेल्याची माहिती मला नव्हती आणि कोणीही सांगितलेही नाही. तेथे काय झाले याचीही काही कल्पना नाही. योग्यवेळी गोष्टी समजतील. 

 

 

टॅग्स :goaगोवा