शहरं
Join us  
Trending Stories
1
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
2
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पिहिली प्रतिक्रिया 
3
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
4
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
5
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
6
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
7
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
8
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
9
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
10
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
11
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
12
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
13
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
14
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
15
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
16
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
17
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
18
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
19
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
20
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात भाजप सरकारचा आरोपींची शिक्षा रद्द करण्याचा आदेश न्यायालयाने केला रद्द; नारी शक्ती झिंदाबाद: युरी आलेमाव

By सूरज.नाईकपवार | Updated: January 8, 2024 15:50 IST

बिल्किस बानो सामूहिक बलात्कार आणि हत्येचे दोषी पुन्हा कारागृहात जाणार आहेत. सुप्रीम कोर्टाने गुजरातच्या भाजप सरकारचा माफी आदेश रद्द केला.

मडगाव : बिल्किस बानो सामूहिक बलात्कार आणि हत्येचे दोषी पुन्हा कारागृहात जाणार आहेत. सुप्रीम कोर्टाने गुजरातच्या भाजप सरकारचा माफी आदेश रद्द केला. सदर भयानक गुन्ह्यातील दोषी ११ पुरुषांना माफी देण्याबद्दल गुजरातमधील भाजप सरकारवर सर्वोच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढले आहेत. नारी शक्ती झिंदाबाद असे गोव्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

२००२ मध्ये बिलकीस बानोवर बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या ११ पुरुष संशयितांना सोडण्याचा गुजरात सरकारने जारी केलेला आदेश रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर करताना, आलेमाव यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना महिला शक्ती नेहमीच सर्वोच्च असते असे म्हटले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने भाजपचे महिलाविरोधी आणि गुन्हेगारी समर्थक धोरण पुन्हा एकदा पूर्णपणे उघडे पडले आहे. गुजरातचे भाजप सरकार सदर गुन्हेगारांना माफी व शिक्षा कमी करण्याचा आदेश देवू शकत नाही असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने गुजरातची कृती म्हणजे "ॲक्ट ऑफ फ्रॉड" असे संबोधले आहे, असे त्यांनी नमूद केले.

आजच्या निकालाचा धागा पकडून मला सिद्धी नाईक यांच्या रहस्यमय मृत्यूच्या प्रलंबित तपासाबाबत मला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आठवण करून द्यायची आहे. सरकारने आजच्या निकालातून धडा घ्यावा आणि तपासाला गती द्यावी आणि निष्पाप मुलीच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दोषींना पकडावे. तपासाला आणखी उशीर झाल्यास भाजपचे गोवा सरकारही तरुण मुलीचे आयुष्य हिसकावून घेणाऱ्या गुन्हेगारांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे हे स्पष्ट होईल असा इशारा युरी आलेमाव यांनी दिला आहे.

भाजप सरकारांनी नेहमीच मुली आणि महिलांचा बळी घेणाऱ्या व त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. गुन्हेगार आणि समाजकंटकांना भाजपचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांचे आशीर्वाद मिळाल्याच्या अनेक घटना आहेत. हे कायमचे थांबण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.गुन्हेगार हे गुन्हेगार असून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. काही गुन्हेगारांना त्यांच्या राजकीय संबंध आणि धर्माच्या आधारावर विशेष वागणूक दिली जाते हे दुर्दैवी आहे. जनतेला विशेषत: महिलांना सत्तेत असलेल्या सरकारांकडून संपूर्ण सुरक्षा मिळायला हवी असे त्यांनी सांगितले.