शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तानावडे म्हणतात.... मी आहे तिथेच समाधानी; लोकसभा उमेदवारीबाबतच्या चर्चेवर भाष्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 15:33 IST

लोकसभेच्या दोन्ही जागा भाजप जिंकणार असा दावा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर गोव्यातून यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या नावाची चर्चा असताना तानावडे यांनी मात्र मी आहे तिथेच समाधानी आहे', असे म्हटले आहे.

एका मुलाखतीच्या वेळी तानावडे म्हणाले की, 'विधानसभा निवडणुकीच्या वेळीही मला थिवीतून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. परंतु, ती फोल ठरली. पक्षाने मला बूथ अध्यक्षपदापासून प्रदेश अध्यक्षपदापर्यंत पोहचविले. पंच, सरपंच, आमदारपद मी भोगले. प्रदेशाध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी माझा चांगला समन्वय आहे. पक्षाने सध्या जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे त्यावर मी पूर्ण समाधानी आहे.'

लोकसभेच्या दोन्ही जागा भाजप जिंकणार असा दावा तानावडे यांनी केला. श्रीपाद नाईक पाचवेळा निवडून आले आहेत. उत्तर गोवा मतदारसंघात प्रस्थापितांविरुद्धच्या लाटेचा पक्षाला फटका बसणार नाही का?, या प्रश्नावर तानावडे म्हणाले की, 'अशी लाट आली तरी त्याचा काही परिणाम होणार नाही. उत्तर गोव्यात आणि दक्षिणेतही भाजपचा उमेदवारच विजयी होईल.'

प्रदेशाध्यक्षपदाचा तीन वर्षांचा सर्वात कठीण काळ कोणता? असा प्रश्न केला असता तानावडे म्हणाले की, ‘माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, मायकल लोबो आणि उत्पल पर्रीकर यांनी भाजप सोडला तो माझ्यासाठी कठीण काळ होता. पार्सेकर यांनी पक्ष सोडला तेव्हा मी फार भावनाविवश झालो होतो.

तानावडे म्हणाले की, 'लोबो यांनी पक्ष सोडू नये म्हणून अनेकदा मी त्यांच्या घरी गेलो आणि समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यावेळी ते ऐकले नाहीत. कॉंग्रेस सत्तेवर येईल या समजुतीने त्या पक्षात त्यांनी प्रवेश केला व त्यांचे गणित चुकले.'

विधानसभेत पुरेसे संख्याबळ असताना आठ कॉंग्रेसी आमदारांना पक्षात प्रवेश देण्याची गरज का भासली? याआधी २०१९ मध्ये कॉंग्रेसच्या दहा फुटीर आमदारांना प्रवेश दिला. परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी काही वाढली नाही, याकडे तुम्ही कसे पाहता? असा सवाल केला असता, तानावडे म्हणाले की, 'आमदार आमच्याकडे आले तरी त्यांचे मतदार आमच्याकडे वळणे तसे एकदम शक्य नसते. पक्ष मोठा व्हावा, यासाठी तसेच सत्तेसाठी काही गोष्टी कराव्या लागतात. '

काही गोष्टी पक्ष हितासाठी विसरायच्या असतात....

२००५ साली दिगंबर कामत यांनी पक्षाला दगा दिला असतानाही त्यांना पुन्हा प्रवेश कसा काय दिला? या प्रश्नावर तानावडे म्हणाले की, तो निर्णय केंद्रातून घेण्यात आला. काँग्रेसची सत्ता असताना सर्वात जास्त त्रास त्या सरकारने मला केला. परंतु, पक्षाच्या हितासाठी काही गोष्टी विसरायच्या असतात.

मतांची टक्केवारी वाढवणार

२०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची मते ४० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या ३२ ते ३३ टक्क्यांपर्यंतच व्होट शेअर घुटमळत आहे. आम्हाला मतांची टक्केवारी वाढवायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे काम चालू आहे.

'पार्सेकर, उत्पल यांचा निर्णय केंद्रीय नेतेच घेतील'

एका प्रश्नावर उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष तानावडे म्हणाले की, लक्ष्मीकांत पार्सेकर किंवा उत्पल पर्रीकर यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्याबाबत आमच्या हातात काहीच नाही. तो निर्णय सर्वस्वी पक्षाचे केंद्रीय नेतेच घेतील' असे त्यांनी स्पष्ट केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा