शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

तानावडे म्हणतात.... मी आहे तिथेच समाधानी; लोकसभा उमेदवारीबाबतच्या चर्चेवर भाष्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 15:33 IST

लोकसभेच्या दोन्ही जागा भाजप जिंकणार असा दावा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर गोव्यातून यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या नावाची चर्चा असताना तानावडे यांनी मात्र मी आहे तिथेच समाधानी आहे', असे म्हटले आहे.

एका मुलाखतीच्या वेळी तानावडे म्हणाले की, 'विधानसभा निवडणुकीच्या वेळीही मला थिवीतून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. परंतु, ती फोल ठरली. पक्षाने मला बूथ अध्यक्षपदापासून प्रदेश अध्यक्षपदापर्यंत पोहचविले. पंच, सरपंच, आमदारपद मी भोगले. प्रदेशाध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी माझा चांगला समन्वय आहे. पक्षाने सध्या जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे त्यावर मी पूर्ण समाधानी आहे.'

लोकसभेच्या दोन्ही जागा भाजप जिंकणार असा दावा तानावडे यांनी केला. श्रीपाद नाईक पाचवेळा निवडून आले आहेत. उत्तर गोवा मतदारसंघात प्रस्थापितांविरुद्धच्या लाटेचा पक्षाला फटका बसणार नाही का?, या प्रश्नावर तानावडे म्हणाले की, 'अशी लाट आली तरी त्याचा काही परिणाम होणार नाही. उत्तर गोव्यात आणि दक्षिणेतही भाजपचा उमेदवारच विजयी होईल.'

प्रदेशाध्यक्षपदाचा तीन वर्षांचा सर्वात कठीण काळ कोणता? असा प्रश्न केला असता तानावडे म्हणाले की, ‘माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, मायकल लोबो आणि उत्पल पर्रीकर यांनी भाजप सोडला तो माझ्यासाठी कठीण काळ होता. पार्सेकर यांनी पक्ष सोडला तेव्हा मी फार भावनाविवश झालो होतो.

तानावडे म्हणाले की, 'लोबो यांनी पक्ष सोडू नये म्हणून अनेकदा मी त्यांच्या घरी गेलो आणि समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यावेळी ते ऐकले नाहीत. कॉंग्रेस सत्तेवर येईल या समजुतीने त्या पक्षात त्यांनी प्रवेश केला व त्यांचे गणित चुकले.'

विधानसभेत पुरेसे संख्याबळ असताना आठ कॉंग्रेसी आमदारांना पक्षात प्रवेश देण्याची गरज का भासली? याआधी २०१९ मध्ये कॉंग्रेसच्या दहा फुटीर आमदारांना प्रवेश दिला. परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी काही वाढली नाही, याकडे तुम्ही कसे पाहता? असा सवाल केला असता, तानावडे म्हणाले की, 'आमदार आमच्याकडे आले तरी त्यांचे मतदार आमच्याकडे वळणे तसे एकदम शक्य नसते. पक्ष मोठा व्हावा, यासाठी तसेच सत्तेसाठी काही गोष्टी कराव्या लागतात. '

काही गोष्टी पक्ष हितासाठी विसरायच्या असतात....

२००५ साली दिगंबर कामत यांनी पक्षाला दगा दिला असतानाही त्यांना पुन्हा प्रवेश कसा काय दिला? या प्रश्नावर तानावडे म्हणाले की, तो निर्णय केंद्रातून घेण्यात आला. काँग्रेसची सत्ता असताना सर्वात जास्त त्रास त्या सरकारने मला केला. परंतु, पक्षाच्या हितासाठी काही गोष्टी विसरायच्या असतात.

मतांची टक्केवारी वाढवणार

२०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची मते ४० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या ३२ ते ३३ टक्क्यांपर्यंतच व्होट शेअर घुटमळत आहे. आम्हाला मतांची टक्केवारी वाढवायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे काम चालू आहे.

'पार्सेकर, उत्पल यांचा निर्णय केंद्रीय नेतेच घेतील'

एका प्रश्नावर उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष तानावडे म्हणाले की, लक्ष्मीकांत पार्सेकर किंवा उत्पल पर्रीकर यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्याबाबत आमच्या हातात काहीच नाही. तो निर्णय सर्वस्वी पक्षाचे केंद्रीय नेतेच घेतील' असे त्यांनी स्पष्ट केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा