शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

भाजप आमदारांचा, मंत्र्यांचा कार्निव्हल

By admin | Updated: June 13, 2014 07:04 IST

पणजी : साध्या साध्या गोष्टींवरून काँग्रेस पक्षावर उठसूठ टीकेची झोड उठविणाऱ्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज कोलांटउडी मारली.

पणजी : साध्या साध्या गोष्टींवरून काँग्रेस पक्षावर उठसूठ टीकेची झोड उठविणाऱ्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज कोलांटउडी मारली. त्यांच्या कृपेने सहा आमदार आणि मंत्री ब्राझीलमध्ये कार्निव्हल साजरा करणार आहेत. राज्याच्या भंडारात खडखडाट असताना आमदार आणि मंत्री मात्र ब्राझीलमध्ये जिवाचा गोवा करण्यास जाणार आहेत. यास विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला असला तरी पर्रीकर मात्र भाजप आमदारांचे, मंत्र्यांचे समर्थन करत होते. क्रीडामंत्री रमेश तवडकर यांच्यासह या दौऱ्यात मच्छीमारमंत्री आवेर्तीन फुर्तादो, वीजमंत्री मिलिंद नाईक, आमदार कार्लुस आल्मेदा, आमदार कायतान सिल्वा व आमदार ग्लेन टिकलो सहभागी होणार आहेत. या सहाजणांना अभ्यास दौऱ्याच्या गोंडस नावाखाली सरकारी खर्चातून फुटबॉल सामने पाहण्यासाठी ब्राझीलला पाठवण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यास प्रदेश काँग्रेसने जोरदार विरोध केला आहे. सरकारी तिजोरीतून ८९ लाख रुपयांच्या उधळपट्टीला हरकत घेताना काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी जनतेच्या पैशांचा हा निव्वळ अपव्यय असल्याचे म्हटले आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेच्या पैशांची उधळपट्टी करू नका, असा सल्ला देत आहेत तर दुसरीकडे भाजपचेच सरकार येथे सरकारी तिजोरीचा आपल्याला हवा तसा वापर करीत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिष्टमंडळात फक्त आमदारांचाच समावेश असून अधिकाऱ्यांचा समावेश केलेला नाही. चालू महिन्याच्या अखेरीस या सहाजणांचा दौरा आयोजिला आहे. फुटबॉल क्षेत्रातील प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार विजेते ब्रह्मानंद शंखवाळकर व ब्रुनो कुतिन्हो या दोघांनी ब्राझीलला जाण्याची इच्छा दर्शविली होती; परंतु त्यांचा या शिष्टमंडळात समावेश केलेला नाही. गोव्यातील फुटबॉलप्रेम सर्वज्ञात आहे. या विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी १३ जुलै रोजी ब्राझीलमध्ये रियो येथे होणार आहे. कामत पुढे म्हणतात की, प्रादेशिक आराखडा, कॅसिनो, बेकायदा खाणींच्या प्रश्नावर २0१२च्या विधानसभा निवडणुकीत पर्रीकरांनी आश्वासने दिली होती, त्या प्रत्येक बाबतीत शब्द फिरवला. जनतेचा पैशांची उधळपट्टी न करण्याच्या आश्वासनावरही त्यांनी ‘यू टर्न’ घेतला. फुटबॉलची जाण असलेल्या व या क्षेत्रातील तीन तज्ज्ञांना पाठवले असते तर समजता येण्यासारखे होते. मात्र, सरकारने अर्जुन पुरस्कार विजेत्यांनाही डावलले. एकीकडे उपमुख्यमंत्री राज्य आर्थिक अडचणीत असल्याचे सांगतात, दुसरीकडे सरकारच अशी उधळपट्टी करते. (प्रतिनिधी)