शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

ड्रग्स व्यवहार रोखण्यास भाजप सरकारला अपयश, विद्यार्थी परिषदेचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 22:22 IST

किनारी भागात अंमली पदार्थांचे व्यवहार वाढले असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेने केला आहे. या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे. 

पणजी - किनारी भागात अंमली पदार्थांचे व्यवहार वाढले असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेने केला आहे. या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे. विद्यार्थी परीषदेचे संयोजक हृषिकेश शेटगावकर यांनी संघटनेच्या पणजी येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले, ‘ विद्यार्थी परिषदेच्या एका सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती आढळून आले आहे. विद्यार्थी अर्ध्यावर  शिक्षण सोडण्याचे प्रमाण वाढल्यामुळे हे सर्वेक्षण करण्यात आले होते. ड्रग्स सारख्या व्यवहारात युवक अडकले गेले असल्यामुळेच त्यांनीशिक्षण अर्ध्यावर सोडण्यात आल्याचे पहाणीतून आढळून आले आहे. हे अत्यंत घातक असून युवक भरकटत चालला असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.ड्रग्स लॉबीवर अंकूश ठेवण्यास सरकारला अपयश आल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीचीही सरकारे आणि विद्यमान भाजप सरकारही त्याला जबाबदार असल्याचा आरोप शेटगावकर यांनी केला. पोलीस कारवाईच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले की, पोलीस लहान सहान ड्रग्स एजंटना पकडतात. परंतु या व्यवहाराच्या मुळापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे ड्रग्सचे लागेबांधे कुठपर्यंत पोहोचले याचा अंदाज मिळत नाही तसेच ही विषवल्ली मुळासकट उपसून काढणे होत नाही. विद्यार्थी परीषदेने २०१६ मध्ये उत्तर गोव्यातील किनारी भागात सर्व्हेक्षण केले होते. विद्याथ्यांचे अनेक गट करून किनारी भागातील लोकांना भेटी देऊन ही पाहाणी करण्यात आली होती. Þड्रग्सचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आणि या दुष्टचक्रात युवक सापडत असल्याचे पाहाणीतून आढळून आले होते असे अभिदीप देसाई यांनी सांगितले.एनआसयुआय या कॉंग्रेस प्रणीत विद्यार्थी संघटनेच्या अलिकडील ड्रग्स प्रकरणातील आरोपांबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की ड्रग्सच्या विरोधात लढा देण्यासाठी एनएसयुआय पुढे आली तर त्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी परीषदेचे पदाधिकारी सौरभ बोरकरही यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Drugsअमली पदार्थgoaगोवा