शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

ड्रग्स व्यवहार रोखण्यास भाजप सरकारला अपयश, विद्यार्थी परिषदेचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 22:22 IST

किनारी भागात अंमली पदार्थांचे व्यवहार वाढले असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेने केला आहे. या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे. 

पणजी - किनारी भागात अंमली पदार्थांचे व्यवहार वाढले असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेने केला आहे. या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे. विद्यार्थी परीषदेचे संयोजक हृषिकेश शेटगावकर यांनी संघटनेच्या पणजी येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले, ‘ विद्यार्थी परिषदेच्या एका सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती आढळून आले आहे. विद्यार्थी अर्ध्यावर  शिक्षण सोडण्याचे प्रमाण वाढल्यामुळे हे सर्वेक्षण करण्यात आले होते. ड्रग्स सारख्या व्यवहारात युवक अडकले गेले असल्यामुळेच त्यांनीशिक्षण अर्ध्यावर सोडण्यात आल्याचे पहाणीतून आढळून आले आहे. हे अत्यंत घातक असून युवक भरकटत चालला असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.ड्रग्स लॉबीवर अंकूश ठेवण्यास सरकारला अपयश आल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीचीही सरकारे आणि विद्यमान भाजप सरकारही त्याला जबाबदार असल्याचा आरोप शेटगावकर यांनी केला. पोलीस कारवाईच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले की, पोलीस लहान सहान ड्रग्स एजंटना पकडतात. परंतु या व्यवहाराच्या मुळापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे ड्रग्सचे लागेबांधे कुठपर्यंत पोहोचले याचा अंदाज मिळत नाही तसेच ही विषवल्ली मुळासकट उपसून काढणे होत नाही. विद्यार्थी परीषदेने २०१६ मध्ये उत्तर गोव्यातील किनारी भागात सर्व्हेक्षण केले होते. विद्याथ्यांचे अनेक गट करून किनारी भागातील लोकांना भेटी देऊन ही पाहाणी करण्यात आली होती. Þड्रग्सचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आणि या दुष्टचक्रात युवक सापडत असल्याचे पाहाणीतून आढळून आले होते असे अभिदीप देसाई यांनी सांगितले.एनआसयुआय या कॉंग्रेस प्रणीत विद्यार्थी संघटनेच्या अलिकडील ड्रग्स प्रकरणातील आरोपांबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की ड्रग्सच्या विरोधात लढा देण्यासाठी एनएसयुआय पुढे आली तर त्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी परीषदेचे पदाधिकारी सौरभ बोरकरही यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Drugsअमली पदार्थgoaगोवा