शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

ड्रग्स व्यवहार रोखण्यास भाजप सरकारला अपयश, विद्यार्थी परिषदेचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 22:22 IST

किनारी भागात अंमली पदार्थांचे व्यवहार वाढले असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेने केला आहे. या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे. 

पणजी - किनारी भागात अंमली पदार्थांचे व्यवहार वाढले असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेने केला आहे. या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे. विद्यार्थी परीषदेचे संयोजक हृषिकेश शेटगावकर यांनी संघटनेच्या पणजी येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले, ‘ विद्यार्थी परिषदेच्या एका सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती आढळून आले आहे. विद्यार्थी अर्ध्यावर  शिक्षण सोडण्याचे प्रमाण वाढल्यामुळे हे सर्वेक्षण करण्यात आले होते. ड्रग्स सारख्या व्यवहारात युवक अडकले गेले असल्यामुळेच त्यांनीशिक्षण अर्ध्यावर सोडण्यात आल्याचे पहाणीतून आढळून आले आहे. हे अत्यंत घातक असून युवक भरकटत चालला असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.ड्रग्स लॉबीवर अंकूश ठेवण्यास सरकारला अपयश आल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीचीही सरकारे आणि विद्यमान भाजप सरकारही त्याला जबाबदार असल्याचा आरोप शेटगावकर यांनी केला. पोलीस कारवाईच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले की, पोलीस लहान सहान ड्रग्स एजंटना पकडतात. परंतु या व्यवहाराच्या मुळापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे ड्रग्सचे लागेबांधे कुठपर्यंत पोहोचले याचा अंदाज मिळत नाही तसेच ही विषवल्ली मुळासकट उपसून काढणे होत नाही. विद्यार्थी परीषदेने २०१६ मध्ये उत्तर गोव्यातील किनारी भागात सर्व्हेक्षण केले होते. विद्याथ्यांचे अनेक गट करून किनारी भागातील लोकांना भेटी देऊन ही पाहाणी करण्यात आली होती. Þड्रग्सचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आणि या दुष्टचक्रात युवक सापडत असल्याचे पाहाणीतून आढळून आले होते असे अभिदीप देसाई यांनी सांगितले.एनआसयुआय या कॉंग्रेस प्रणीत विद्यार्थी संघटनेच्या अलिकडील ड्रग्स प्रकरणातील आरोपांबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की ड्रग्सच्या विरोधात लढा देण्यासाठी एनएसयुआय पुढे आली तर त्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी परीषदेचे पदाधिकारी सौरभ बोरकरही यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Drugsअमली पदार्थgoaगोवा