शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकार दलालगिरीचे

By admin | Updated: July 26, 2016 02:41 IST

सरकार : विश्वजीत राणे वाळपई : भाजपने सरकार स्थापन केल्यानंतर दलालगिरी शिवाय काहीही केले नसून कंपनी सुरू करण्याच्या नावाखाली

सरकार : विश्वजीत राणे वाळपई : भाजपने सरकार स्थापन केल्यानंतर दलालगिरी शिवाय काहीही केले नसून कंपनी सुरू करण्याच्या नावाखाली सरकारने कंपन्यांशी फक्त दलालगिरी केली आहे, असा आरोप वाळपईचे आमदार विश्वजीत राणे यांनी वाळपईतील आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. राणे म्हणाले की, सरकारने कंपनी सुरू करण्याच्या नावाखाली कंपन्यांशी व्यवहार केला; पण प्रत्यक्षात कंपन्या सुरूच झाल्या नाहीत. ज्या काही मोजक्याच सुरू झाल्या त्यात गोव्यातील युवकांना रोजगार दिला नाही. गोव्याबाहेरील लोकांना रोजगार दिला. त्यामुळे सरकारने फक्त दलालगिरी केली. सरकारने आपली चूक मान्य करून कंपन्या सुरू करण्यासाठी त्यांना सहा महिन्यांची मुदत देण्याची मागणी केली. रोजगारपूर्व प्रशिक्षण नावाखाली गोव्यातील युवकांची घोर फसवणूक केली. त्या युवकांना मागील काँग्रेस सरकारने नोकरीत सामावून घेतले. जे भाजप सरकार ऊर्जा योजनेखाली बल्बचे वितरण करीत आहे तो पैसा भाजपाचा नसून सरकारचा आहे; पण सरकारने त्यात राजकारण केले असून त्या वितरणावेळी समारंभाचे व्यासपीठ हे भाजपाच्या कार्यकर्त्यांचे व्यासपीठ बनले आहे. बल्ब वितरणाच्या नावाखाली भाजप आपला प्रचार करीत असल्याचे दिसत आहे. सरकारला जनतेचा जर पुळका होता तर वाढीव वीज दर कमी केले असते. ग्रामीण भागात विजेचा दरदिवशी लपंडाव सुरू असतो. तो सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले असते. तीन महिन्यांनी वीज बिले देऊन गरीब जनतेवर अन्याय केला आहे. जो वीज बिलात घोळ सुरू आहे तो घोळ न सोडविता बल्ब वितरण करणे म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार झाला आहे, असे राणे म्हणाले. जनतेचे बुरे दिन सुरू आहेत; कारण वीज व पाणी बिले भरमसाट झाली आहेत. युवकांची फसवणूक सुरू आहे. अशावेळी जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम सरकार करीत आहे. अशावेळी अच्छे दिन कसे असतील, असा सवाल त्यांनी सरकारला केला. योग्यवेळी महाआघाडी येणारे सरकार काँग्रेसचे असणार असून योग्यवेळी महाआघाडी केली जाईल. विधानसभेत भाजप सरकारला उघडे पाडण्याचा इशारा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)