शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

भाजप सरकार दलालगिरीचे

By admin | Updated: July 26, 2016 02:41 IST

सरकार : विश्वजीत राणे वाळपई : भाजपने सरकार स्थापन केल्यानंतर दलालगिरी शिवाय काहीही केले नसून कंपनी सुरू करण्याच्या नावाखाली

सरकार : विश्वजीत राणे वाळपई : भाजपने सरकार स्थापन केल्यानंतर दलालगिरी शिवाय काहीही केले नसून कंपनी सुरू करण्याच्या नावाखाली सरकारने कंपन्यांशी फक्त दलालगिरी केली आहे, असा आरोप वाळपईचे आमदार विश्वजीत राणे यांनी वाळपईतील आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. राणे म्हणाले की, सरकारने कंपनी सुरू करण्याच्या नावाखाली कंपन्यांशी व्यवहार केला; पण प्रत्यक्षात कंपन्या सुरूच झाल्या नाहीत. ज्या काही मोजक्याच सुरू झाल्या त्यात गोव्यातील युवकांना रोजगार दिला नाही. गोव्याबाहेरील लोकांना रोजगार दिला. त्यामुळे सरकारने फक्त दलालगिरी केली. सरकारने आपली चूक मान्य करून कंपन्या सुरू करण्यासाठी त्यांना सहा महिन्यांची मुदत देण्याची मागणी केली. रोजगारपूर्व प्रशिक्षण नावाखाली गोव्यातील युवकांची घोर फसवणूक केली. त्या युवकांना मागील काँग्रेस सरकारने नोकरीत सामावून घेतले. जे भाजप सरकार ऊर्जा योजनेखाली बल्बचे वितरण करीत आहे तो पैसा भाजपाचा नसून सरकारचा आहे; पण सरकारने त्यात राजकारण केले असून त्या वितरणावेळी समारंभाचे व्यासपीठ हे भाजपाच्या कार्यकर्त्यांचे व्यासपीठ बनले आहे. बल्ब वितरणाच्या नावाखाली भाजप आपला प्रचार करीत असल्याचे दिसत आहे. सरकारला जनतेचा जर पुळका होता तर वाढीव वीज दर कमी केले असते. ग्रामीण भागात विजेचा दरदिवशी लपंडाव सुरू असतो. तो सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले असते. तीन महिन्यांनी वीज बिले देऊन गरीब जनतेवर अन्याय केला आहे. जो वीज बिलात घोळ सुरू आहे तो घोळ न सोडविता बल्ब वितरण करणे म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार झाला आहे, असे राणे म्हणाले. जनतेचे बुरे दिन सुरू आहेत; कारण वीज व पाणी बिले भरमसाट झाली आहेत. युवकांची फसवणूक सुरू आहे. अशावेळी जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम सरकार करीत आहे. अशावेळी अच्छे दिन कसे असतील, असा सवाल त्यांनी सरकारला केला. योग्यवेळी महाआघाडी येणारे सरकार काँग्रेसचे असणार असून योग्यवेळी महाआघाडी केली जाईल. विधानसभेत भाजप सरकारला उघडे पाडण्याचा इशारा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)