शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

भाजप सरकार दलालगिरीचे

By admin | Updated: July 26, 2016 02:41 IST

सरकार : विश्वजीत राणे वाळपई : भाजपने सरकार स्थापन केल्यानंतर दलालगिरी शिवाय काहीही केले नसून कंपनी सुरू करण्याच्या नावाखाली

सरकार : विश्वजीत राणे वाळपई : भाजपने सरकार स्थापन केल्यानंतर दलालगिरी शिवाय काहीही केले नसून कंपनी सुरू करण्याच्या नावाखाली सरकारने कंपन्यांशी फक्त दलालगिरी केली आहे, असा आरोप वाळपईचे आमदार विश्वजीत राणे यांनी वाळपईतील आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. राणे म्हणाले की, सरकारने कंपनी सुरू करण्याच्या नावाखाली कंपन्यांशी व्यवहार केला; पण प्रत्यक्षात कंपन्या सुरूच झाल्या नाहीत. ज्या काही मोजक्याच सुरू झाल्या त्यात गोव्यातील युवकांना रोजगार दिला नाही. गोव्याबाहेरील लोकांना रोजगार दिला. त्यामुळे सरकारने फक्त दलालगिरी केली. सरकारने आपली चूक मान्य करून कंपन्या सुरू करण्यासाठी त्यांना सहा महिन्यांची मुदत देण्याची मागणी केली. रोजगारपूर्व प्रशिक्षण नावाखाली गोव्यातील युवकांची घोर फसवणूक केली. त्या युवकांना मागील काँग्रेस सरकारने नोकरीत सामावून घेतले. जे भाजप सरकार ऊर्जा योजनेखाली बल्बचे वितरण करीत आहे तो पैसा भाजपाचा नसून सरकारचा आहे; पण सरकारने त्यात राजकारण केले असून त्या वितरणावेळी समारंभाचे व्यासपीठ हे भाजपाच्या कार्यकर्त्यांचे व्यासपीठ बनले आहे. बल्ब वितरणाच्या नावाखाली भाजप आपला प्रचार करीत असल्याचे दिसत आहे. सरकारला जनतेचा जर पुळका होता तर वाढीव वीज दर कमी केले असते. ग्रामीण भागात विजेचा दरदिवशी लपंडाव सुरू असतो. तो सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले असते. तीन महिन्यांनी वीज बिले देऊन गरीब जनतेवर अन्याय केला आहे. जो वीज बिलात घोळ सुरू आहे तो घोळ न सोडविता बल्ब वितरण करणे म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार झाला आहे, असे राणे म्हणाले. जनतेचे बुरे दिन सुरू आहेत; कारण वीज व पाणी बिले भरमसाट झाली आहेत. युवकांची फसवणूक सुरू आहे. अशावेळी जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम सरकार करीत आहे. अशावेळी अच्छे दिन कसे असतील, असा सवाल त्यांनी सरकारला केला. योग्यवेळी महाआघाडी येणारे सरकार काँग्रेसचे असणार असून योग्यवेळी महाआघाडी केली जाईल. विधानसभेत भाजप सरकारला उघडे पाडण्याचा इशारा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)