शहरं
Join us  
Trending Stories
1
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
2
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
3
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
4
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
5
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
6
Nashik Leopard: बिबट्याची नाशिक पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालय आवारातच एन्ट्री, सीसीटीव्हीमध्ये दिसला
7
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
8
आता परत सलमानवर जोक करणार का? पापाराझीच्या प्रश्नावर प्रणित मोरेने हातच जोडले; म्हणाला...
9
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
10
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
11
U19 Asia Cup 2025 : वैभव सूर्यवंशीचा धमाका! सिक्सर मारत स्टाईलमध्ये साजरी केली फिफ्टी
12
खळबळजनक! ३ वर्षे इंजिनिअरने केले रुग्णांवर उपचार; भावोजींची डिग्री, पण औषधं द्यायचा मेहुणा
13
‘शेतात जाणाऱ्या महिलाही सुरक्षित नाहीत’, पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर हजारो जोडप्यांचे व्हिडीओ बनल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट
14
नगराध्यक्ष ते राज्यपाल! कसा होता शिवराज पाटील चाकूरकरांचा प्रवास; तब्बल ७ वेळा बनले खासदार
15
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
16
Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
17
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
18
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
19
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
20
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
Daily Top 2Weekly Top 5

'३० पार'ची घोषणा काँग्रेसने चोरली, आमदार सांभाळून ठेवायला शिका; सोपटेंचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2024 08:28 IST

भाजपचा आरोप 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: दक्षिण गोव्याची जागा काँग्रेसला राखण्यात यश आल्यामुळे आता काँग्रेसवाले भलत्याच भ्रमात राहून घोषणा करू लागले आहेत. २०२७च्या विधानसभा निवडणुकीत '३० पार' ही घोषणा भाजपची असून, ती काँग्रेसने चोरल्याचा आरोप भाजपचे नेते माजी आमदार दयानंद सोपटे यांनी केला.

पणजी मुख्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेत आमदार संकल्प आमोणकर व प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर उपस्थित होते.

सोपटे म्हणाले की, उत्तर गोव्यात १७ आणि दक्षिण गोव्यात ८ मिळून २५ विधानसभा मतदारसंघात भाजपने आघाडी मिळविली आहे. शिवाय ५ मतदारसंघात काँग्रेसला नाममात्र आघाडी मिळाली आहे. त्यामुळे एकूण ३० मतदारसंघात येत्या निवडणुकीत भाजपला विजय मिळविण्यासाठी पूर्ण संधी आहे, असे ते म्हणाले. भाजपचा हा निष्कर्ष काँग्रेसने चोरून आपल्या नावाने खपविल्याचाही आरोप त्यांनी केला. काँग्रेस जरी आता इंडिया आघाडीच्या गोष्टी करीत असली तरी ही आघाडी टिकणार नाही. १३ आमदार निवडून आले होते, त्यातील किती राहिलेत ते काँग्रेसे पाहावे, असा टोलाही त्यांनी हाणला.

संकल्प आमोणकर म्हणाले की, भाजपच्या मतांची टक्केवारी काँग्रेसपेक्षा अधिक आहे. केवळ तीन मतदारसंघात मोठी आघाडी मिळाल्यामुळे काँग्रेसचा विजय झाला आहे. परंतु, इतर सर्व ठिकाणी भाजपने बाजी मारली आहे. इंडिया आघाडीच्या नावाने शंख वाजविणाऱ्यांनी या आघाडीची काय दशा झाली आहे ते अगोदर पाहावे. देशभरात भाजपला २४१ जागा, तर एनडीएला २९३ जागा मिळाल्या आहेत, हेही पाहावे, असे आमोणकर म्हणाले.

२०२७ मध्ये मांद्रेत भाजप आमदार

दयानंद सोपटे हे २०२७ मध्ये भाजपला राज्यात ३० जागा मिळतील इतके सांगून थांबले नाहीत, तर ते पुढे म्हणाले की, त्यांच्या मांदे मतदारसंघातही भाजपचा आमदार निवडून येणार आहे. त्यांचा हा टोला अप्रत्यक्षपणे भाजप सरकारला पाठिंबा असलेले मांद्रेतील मगो आमदार जीत आरोलकर यांना होता, हे लपून राहिले नाही.

'त्या' ३० जागा आमच्याच : रवी

काँग्रेसचे काही नेते आगामी विधानसभा निवडणुकीत ३० जागा जिंकण्याची भाषा करत आहेत. मात्र, त्यांनी स्वप्ने पाहणे सोडावे. भाजपने वेगवेगळ्या योजनांद्वारे तळागाळात काम केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्या ३० जागा आमच्याच असतील, असे मंत्री रवी नाईक यांनी सांगितले. तसेच लोकसभेत उमेदवाराचा पराभव का झाला? याची कारणमीमांसा शोधली जाईल. आता आगामी विधानसभेच्या दृष्टीने आम्ही तयारीला लागणार आहोत, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा