शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

'३० पार'ची घोषणा काँग्रेसने चोरली, आमदार सांभाळून ठेवायला शिका; सोपटेंचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2024 08:28 IST

भाजपचा आरोप 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: दक्षिण गोव्याची जागा काँग्रेसला राखण्यात यश आल्यामुळे आता काँग्रेसवाले भलत्याच भ्रमात राहून घोषणा करू लागले आहेत. २०२७च्या विधानसभा निवडणुकीत '३० पार' ही घोषणा भाजपची असून, ती काँग्रेसने चोरल्याचा आरोप भाजपचे नेते माजी आमदार दयानंद सोपटे यांनी केला.

पणजी मुख्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेत आमदार संकल्प आमोणकर व प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर उपस्थित होते.

सोपटे म्हणाले की, उत्तर गोव्यात १७ आणि दक्षिण गोव्यात ८ मिळून २५ विधानसभा मतदारसंघात भाजपने आघाडी मिळविली आहे. शिवाय ५ मतदारसंघात काँग्रेसला नाममात्र आघाडी मिळाली आहे. त्यामुळे एकूण ३० मतदारसंघात येत्या निवडणुकीत भाजपला विजय मिळविण्यासाठी पूर्ण संधी आहे, असे ते म्हणाले. भाजपचा हा निष्कर्ष काँग्रेसने चोरून आपल्या नावाने खपविल्याचाही आरोप त्यांनी केला. काँग्रेस जरी आता इंडिया आघाडीच्या गोष्टी करीत असली तरी ही आघाडी टिकणार नाही. १३ आमदार निवडून आले होते, त्यातील किती राहिलेत ते काँग्रेसे पाहावे, असा टोलाही त्यांनी हाणला.

संकल्प आमोणकर म्हणाले की, भाजपच्या मतांची टक्केवारी काँग्रेसपेक्षा अधिक आहे. केवळ तीन मतदारसंघात मोठी आघाडी मिळाल्यामुळे काँग्रेसचा विजय झाला आहे. परंतु, इतर सर्व ठिकाणी भाजपने बाजी मारली आहे. इंडिया आघाडीच्या नावाने शंख वाजविणाऱ्यांनी या आघाडीची काय दशा झाली आहे ते अगोदर पाहावे. देशभरात भाजपला २४१ जागा, तर एनडीएला २९३ जागा मिळाल्या आहेत, हेही पाहावे, असे आमोणकर म्हणाले.

२०२७ मध्ये मांद्रेत भाजप आमदार

दयानंद सोपटे हे २०२७ मध्ये भाजपला राज्यात ३० जागा मिळतील इतके सांगून थांबले नाहीत, तर ते पुढे म्हणाले की, त्यांच्या मांदे मतदारसंघातही भाजपचा आमदार निवडून येणार आहे. त्यांचा हा टोला अप्रत्यक्षपणे भाजप सरकारला पाठिंबा असलेले मांद्रेतील मगो आमदार जीत आरोलकर यांना होता, हे लपून राहिले नाही.

'त्या' ३० जागा आमच्याच : रवी

काँग्रेसचे काही नेते आगामी विधानसभा निवडणुकीत ३० जागा जिंकण्याची भाषा करत आहेत. मात्र, त्यांनी स्वप्ने पाहणे सोडावे. भाजपने वेगवेगळ्या योजनांद्वारे तळागाळात काम केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्या ३० जागा आमच्याच असतील, असे मंत्री रवी नाईक यांनी सांगितले. तसेच लोकसभेत उमेदवाराचा पराभव का झाला? याची कारणमीमांसा शोधली जाईल. आता आगामी विधानसभेच्या दृष्टीने आम्ही तयारीला लागणार आहोत, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा