शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

घरे वाचविण्यासाठी याच अधिवेशनात विधेयक; मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 08:52 IST

लोकांच्या समस्यांची सरकारला पूर्णपणे जाणीव

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लोकांची घरे वाचविण्यासाठी विशेष कायदा बनविण्यासाठी चालू अधिवेशनातच विधेयक आणणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सांगितले आहे. अवैध बांधकामांबाबतीत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनेक घरे पाडली जाण्याची भीती निर्माण झाल्यामुळे विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा आमदार विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला होता.

अवैध बांधकामांबाबत उच्च न्यायालयाच्या आमदार सरदेसाई यांनी शून्य तासाला हा मुद्दा उपस्थित करून चिंता व्यक्त केली होती. न्यायालयाने घरे पाडण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिल्यामुळे लोकांत दहशत पसरली आहे असे ते म्हणाले. ही मुदत लक्षात ठेवूनच सरकारने प्राधान्यक्रमाने त्यावर तोडगा काढावा आणि लोकांची घरे वाचवावीत, अशी मागणी त्यांनी केली होती.

प्रक्रिया सुरू आहे...

यावर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आश्वासन दिले की, सरकारला या समस्येची जाणीव आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी संबंधित संस्थांशी विचारविनिमय सुरू आहे. सरकार जे काही करू शकते ते सर्व पर्याय सरकार वापरणार आहे असे त्यांनी सांगितले. घरे राखण्यासाठी कायदा बनविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याच अधिवेशनात विधेयक सादर केले जाणार आहे, असे ते म्हणाले.

विधेयकातील तरतुदींकडे लक्ष

दरम्यान, घरासंबंधीचा मुद्दा हा राज्यात सर्वच ठिकाणी आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पंचायत सचिव, तलाठी वगैरे घरांची पाहणी करण्यासाठी फिरू लागल्यामुळे लोक भयभीत झाले आहेत. लोक स्थानिक लोकप्रतिधींकडे धाव घेत आहेत. सरकारने यासाठी विशेष कायदा करून लोकांना दिलासा द्यावा, अशी मागणी विरोधी व सत्ताधारी अशा दोन्ही पक्षांच्या आमदारांनी केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनीही यासंबंधी अनेकवेळा घरे राखण्यासाठी कायदा बनविला जाईल, अशी विधाने केली आहेत. बहुतेक घरे ही कोमुनिदादच्या जमिनीत असल्यामुळे कोमुनिदादच्या जमिनीतील घरे नियमित करण्याचा सरकारचा विचार असल्याचेही सांगण्यात येत आहे. परंतु कोमुनिदादने त्यासाठी तीव्र विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर सरकार कोणते विधेयक आणते यावर सर्वांचे लक्ष्य लागून आहे. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतvidhan sabhaविधानसभा