शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात गाजतोय बिहारचा 'मजूरवाद'; मुख्यमंत्री सावंत यांचे सुदिनकडून समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 12:27 IST

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी लावला वेगळा सूर

पणजी : बिहार व उत्तर प्रदेशचे मजूर गोव्यात येतात व गुन्हे करतात अशा अर्थाचे विधान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केल्यानंतर नवा वाद सुरू झाला. गोव्यापासून बिहारपर्यंत या वादाचे पडसाद उमटू लागले आहेत. पटणा येथे मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रारही करण्यात आली आहे.

राज्यातही विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले जात असताना वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी मात्र काल मुख्यमंत्री सावंत यांच्या विधानाचे जोरदार समर्थन केले. मात्र बिहारचे राज्यपाल असलेले गोमंतकीय नेते राजेंद्र आर्लेकर यांनी वेगळा सूर लावत बिहारची बाजू घेतली आहे.

मुळीच माफी मागू नये: ढवळीकर

मुख्यमंत्र्यांनी मुळीच माफी मागू नये, असे आवाहन करीत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सावंत यांनी परप्रांति यांबद्दल केलेल्या विधानाचे जोरदार समर्थन केले. मुख्यमंत्री खरे तेच बोलले. बिहारचे मजूर येथे येतात आणि काय करतात ते आम्हाला ठाऊक आहे. मी स्वतः बिल्डर म्हणून याचा अनुभव घेतला आहे. गोव्यात बांधकाम मजूर तसेच कारागिर उपलब्ध नसल्याने बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगालमधून मजूर आणावे लागतात. पूर्वी बिल्डर म्हणून मी दीडेकशे मजूर या राज्यांमधून आणायचो.

करार संपल्यानंतर तीन महिन्यात परत पाठवायचो. जिल्हाधिकारी यावर नजर ठेवत असत. आता ती पध्दत बंद झाली आहे. कोणीही मजूर येतो आणि येथे तळ ठोकतो. काहीजण शिस्त पाळत नाहीत. मुख्यमंत्र्यांविरुध्द बिहारात कोर्टात जाणाऱ्यांनी आम्हाला येऊन भेटावे आम्ही हे मजूर येथे काय करतात ते त्यांना दाखवून देऊ. बिहार, युपीचे सर्वचजण वाईट असे मी म्हणत नाही परंतु काहीजण गुन्हे करतात आणि इतरांचे नाव खराब होते.

जागतिक कामगारदिनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वरील विधानावरून त्यांच्याविरुद्ध पाटणा येथील स्थानिक रहिवासी, सत्ताधारी जद (यू) नेते मनीष कुमार चे सिंह यानी तक्रारही सादर केली आहे.

मागील काही वर्षात बिहार राज्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे, अभूतपूर्व असा विकास होण्याबरोबर बिहार देशातील विकासाच्या पथावर असणारे राज्य ठरले आहे. बिहार बिमारू राज्य' असा काही लोकांचा असलेला समज २५ वर्षापूर्वीचा आहे. सध्या तेथील प्रशासन, लोकविकास भारावून टाकणारा आहे. - राजेंद्र आर्लेकर, राज्यपाल, बिहार

प्रशासनात अनेक वरिष्ठ अधिकारीही बिहार, उत्तर प्रदेशचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाने त्यांच्याही भावना दुखावल्या असतील. या परप्रांतीय अधिकाऱ्यांवर ते विश्वास - ठेवणार का? परप्रांतीय कामगार आणि अधिकाऱ्यांच्या अशा पद्धतीने भावना दुखवणे चुकीचे आहे. -गिरीश चोडणकर, काँग्रेस नेते

 

टॅग्स :goaगोवा