शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

गोव्यात गाजतोय बिहारचा 'मजूरवाद'; मुख्यमंत्री सावंत यांचे सुदिनकडून समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 12:27 IST

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी लावला वेगळा सूर

पणजी : बिहार व उत्तर प्रदेशचे मजूर गोव्यात येतात व गुन्हे करतात अशा अर्थाचे विधान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केल्यानंतर नवा वाद सुरू झाला. गोव्यापासून बिहारपर्यंत या वादाचे पडसाद उमटू लागले आहेत. पटणा येथे मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रारही करण्यात आली आहे.

राज्यातही विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले जात असताना वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी मात्र काल मुख्यमंत्री सावंत यांच्या विधानाचे जोरदार समर्थन केले. मात्र बिहारचे राज्यपाल असलेले गोमंतकीय नेते राजेंद्र आर्लेकर यांनी वेगळा सूर लावत बिहारची बाजू घेतली आहे.

मुळीच माफी मागू नये: ढवळीकर

मुख्यमंत्र्यांनी मुळीच माफी मागू नये, असे आवाहन करीत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सावंत यांनी परप्रांति यांबद्दल केलेल्या विधानाचे जोरदार समर्थन केले. मुख्यमंत्री खरे तेच बोलले. बिहारचे मजूर येथे येतात आणि काय करतात ते आम्हाला ठाऊक आहे. मी स्वतः बिल्डर म्हणून याचा अनुभव घेतला आहे. गोव्यात बांधकाम मजूर तसेच कारागिर उपलब्ध नसल्याने बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगालमधून मजूर आणावे लागतात. पूर्वी बिल्डर म्हणून मी दीडेकशे मजूर या राज्यांमधून आणायचो.

करार संपल्यानंतर तीन महिन्यात परत पाठवायचो. जिल्हाधिकारी यावर नजर ठेवत असत. आता ती पध्दत बंद झाली आहे. कोणीही मजूर येतो आणि येथे तळ ठोकतो. काहीजण शिस्त पाळत नाहीत. मुख्यमंत्र्यांविरुध्द बिहारात कोर्टात जाणाऱ्यांनी आम्हाला येऊन भेटावे आम्ही हे मजूर येथे काय करतात ते त्यांना दाखवून देऊ. बिहार, युपीचे सर्वचजण वाईट असे मी म्हणत नाही परंतु काहीजण गुन्हे करतात आणि इतरांचे नाव खराब होते.

जागतिक कामगारदिनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वरील विधानावरून त्यांच्याविरुद्ध पाटणा येथील स्थानिक रहिवासी, सत्ताधारी जद (यू) नेते मनीष कुमार चे सिंह यानी तक्रारही सादर केली आहे.

मागील काही वर्षात बिहार राज्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे, अभूतपूर्व असा विकास होण्याबरोबर बिहार देशातील विकासाच्या पथावर असणारे राज्य ठरले आहे. बिहार बिमारू राज्य' असा काही लोकांचा असलेला समज २५ वर्षापूर्वीचा आहे. सध्या तेथील प्रशासन, लोकविकास भारावून टाकणारा आहे. - राजेंद्र आर्लेकर, राज्यपाल, बिहार

प्रशासनात अनेक वरिष्ठ अधिकारीही बिहार, उत्तर प्रदेशचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाने त्यांच्याही भावना दुखावल्या असतील. या परप्रांतीय अधिकाऱ्यांवर ते विश्वास - ठेवणार का? परप्रांतीय कामगार आणि अधिकाऱ्यांच्या अशा पद्धतीने भावना दुखवणे चुकीचे आहे. -गिरीश चोडणकर, काँग्रेस नेते

 

टॅग्स :goaगोवा