शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

गोव्यात गाजतोय बिहारचा 'मजूरवाद'; मुख्यमंत्री सावंत यांचे सुदिनकडून समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 12:27 IST

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी लावला वेगळा सूर

पणजी : बिहार व उत्तर प्रदेशचे मजूर गोव्यात येतात व गुन्हे करतात अशा अर्थाचे विधान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केल्यानंतर नवा वाद सुरू झाला. गोव्यापासून बिहारपर्यंत या वादाचे पडसाद उमटू लागले आहेत. पटणा येथे मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रारही करण्यात आली आहे.

राज्यातही विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले जात असताना वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी मात्र काल मुख्यमंत्री सावंत यांच्या विधानाचे जोरदार समर्थन केले. मात्र बिहारचे राज्यपाल असलेले गोमंतकीय नेते राजेंद्र आर्लेकर यांनी वेगळा सूर लावत बिहारची बाजू घेतली आहे.

मुळीच माफी मागू नये: ढवळीकर

मुख्यमंत्र्यांनी मुळीच माफी मागू नये, असे आवाहन करीत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सावंत यांनी परप्रांति यांबद्दल केलेल्या विधानाचे जोरदार समर्थन केले. मुख्यमंत्री खरे तेच बोलले. बिहारचे मजूर येथे येतात आणि काय करतात ते आम्हाला ठाऊक आहे. मी स्वतः बिल्डर म्हणून याचा अनुभव घेतला आहे. गोव्यात बांधकाम मजूर तसेच कारागिर उपलब्ध नसल्याने बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगालमधून मजूर आणावे लागतात. पूर्वी बिल्डर म्हणून मी दीडेकशे मजूर या राज्यांमधून आणायचो.

करार संपल्यानंतर तीन महिन्यात परत पाठवायचो. जिल्हाधिकारी यावर नजर ठेवत असत. आता ती पध्दत बंद झाली आहे. कोणीही मजूर येतो आणि येथे तळ ठोकतो. काहीजण शिस्त पाळत नाहीत. मुख्यमंत्र्यांविरुध्द बिहारात कोर्टात जाणाऱ्यांनी आम्हाला येऊन भेटावे आम्ही हे मजूर येथे काय करतात ते त्यांना दाखवून देऊ. बिहार, युपीचे सर्वचजण वाईट असे मी म्हणत नाही परंतु काहीजण गुन्हे करतात आणि इतरांचे नाव खराब होते.

जागतिक कामगारदिनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वरील विधानावरून त्यांच्याविरुद्ध पाटणा येथील स्थानिक रहिवासी, सत्ताधारी जद (यू) नेते मनीष कुमार चे सिंह यानी तक्रारही सादर केली आहे.

मागील काही वर्षात बिहार राज्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे, अभूतपूर्व असा विकास होण्याबरोबर बिहार देशातील विकासाच्या पथावर असणारे राज्य ठरले आहे. बिहार बिमारू राज्य' असा काही लोकांचा असलेला समज २५ वर्षापूर्वीचा आहे. सध्या तेथील प्रशासन, लोकविकास भारावून टाकणारा आहे. - राजेंद्र आर्लेकर, राज्यपाल, बिहार

प्रशासनात अनेक वरिष्ठ अधिकारीही बिहार, उत्तर प्रदेशचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाने त्यांच्याही भावना दुखावल्या असतील. या परप्रांतीय अधिकाऱ्यांवर ते विश्वास - ठेवणार का? परप्रांतीय कामगार आणि अधिकाऱ्यांच्या अशा पद्धतीने भावना दुखवणे चुकीचे आहे. -गिरीश चोडणकर, काँग्रेस नेते

 

टॅग्स :goaगोवा