शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

गोव्यात गाजतोय बिहारचा 'मजूरवाद'; मुख्यमंत्री सावंत यांचे सुदिनकडून समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 12:27 IST

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी लावला वेगळा सूर

पणजी : बिहार व उत्तर प्रदेशचे मजूर गोव्यात येतात व गुन्हे करतात अशा अर्थाचे विधान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केल्यानंतर नवा वाद सुरू झाला. गोव्यापासून बिहारपर्यंत या वादाचे पडसाद उमटू लागले आहेत. पटणा येथे मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रारही करण्यात आली आहे.

राज्यातही विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले जात असताना वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी मात्र काल मुख्यमंत्री सावंत यांच्या विधानाचे जोरदार समर्थन केले. मात्र बिहारचे राज्यपाल असलेले गोमंतकीय नेते राजेंद्र आर्लेकर यांनी वेगळा सूर लावत बिहारची बाजू घेतली आहे.

मुळीच माफी मागू नये: ढवळीकर

मुख्यमंत्र्यांनी मुळीच माफी मागू नये, असे आवाहन करीत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सावंत यांनी परप्रांति यांबद्दल केलेल्या विधानाचे जोरदार समर्थन केले. मुख्यमंत्री खरे तेच बोलले. बिहारचे मजूर येथे येतात आणि काय करतात ते आम्हाला ठाऊक आहे. मी स्वतः बिल्डर म्हणून याचा अनुभव घेतला आहे. गोव्यात बांधकाम मजूर तसेच कारागिर उपलब्ध नसल्याने बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगालमधून मजूर आणावे लागतात. पूर्वी बिल्डर म्हणून मी दीडेकशे मजूर या राज्यांमधून आणायचो.

करार संपल्यानंतर तीन महिन्यात परत पाठवायचो. जिल्हाधिकारी यावर नजर ठेवत असत. आता ती पध्दत बंद झाली आहे. कोणीही मजूर येतो आणि येथे तळ ठोकतो. काहीजण शिस्त पाळत नाहीत. मुख्यमंत्र्यांविरुध्द बिहारात कोर्टात जाणाऱ्यांनी आम्हाला येऊन भेटावे आम्ही हे मजूर येथे काय करतात ते त्यांना दाखवून देऊ. बिहार, युपीचे सर्वचजण वाईट असे मी म्हणत नाही परंतु काहीजण गुन्हे करतात आणि इतरांचे नाव खराब होते.

जागतिक कामगारदिनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वरील विधानावरून त्यांच्याविरुद्ध पाटणा येथील स्थानिक रहिवासी, सत्ताधारी जद (यू) नेते मनीष कुमार चे सिंह यानी तक्रारही सादर केली आहे.

मागील काही वर्षात बिहार राज्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे, अभूतपूर्व असा विकास होण्याबरोबर बिहार देशातील विकासाच्या पथावर असणारे राज्य ठरले आहे. बिहार बिमारू राज्य' असा काही लोकांचा असलेला समज २५ वर्षापूर्वीचा आहे. सध्या तेथील प्रशासन, लोकविकास भारावून टाकणारा आहे. - राजेंद्र आर्लेकर, राज्यपाल, बिहार

प्रशासनात अनेक वरिष्ठ अधिकारीही बिहार, उत्तर प्रदेशचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाने त्यांच्याही भावना दुखावल्या असतील. या परप्रांतीय अधिकाऱ्यांवर ते विश्वास - ठेवणार का? परप्रांतीय कामगार आणि अधिकाऱ्यांच्या अशा पद्धतीने भावना दुखवणे चुकीचे आहे. -गिरीश चोडणकर, काँग्रेस नेते

 

टॅग्स :goaगोवा