शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

गोवा, बिहारात खूप फरक; पण बिहारी माणूस फार जिद्दी व बुद्धिमान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 11:56 IST

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी 'लोकमत' कार्यालयात जागविल्या आठवणी.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजीः गोवा व बिहारमध्ये खूप फरक आहे. परंतु, बिहारी लोक फार जिद्दी तसेच बुद्धिमानही आहेत म्हणून स्पर्धा परीक्षांमध्येही चमकतात, असे प्रतिपादन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले.

आर्लेकर यांनी काल 'लोकमत' कार्यालयाला दिलेल्या भेटीवेळी वरील आठवणी जागविल्या. ते म्हणाले की, हिमाचल प्रदेशसारख्या थंड आणि शांत प्रदेशातून बिहारला उष्ण आणि अशांत प्रदेशात जाताना खूप गोष्टी जुळवून घ्याव्या लागल्या. बिहारात शिक्षणाच्या बाबतीत अनेक सुधारणा होणे आवश्यक आहे. कुलपती या नात्याने मी आतापर्यंत तेथील चार विद्यापीठांना भेटी दिल्या. पदवीदान समारंभांमध्येही भाग घेण्याची संधी सोडत नाही.

बिहारात इयत्ता बारावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी कोणीच थांबत नाहीत. पुढील शिक्षण बाहेर जाऊन इतर राज्यांमध्ये घेतात. ही परिस्थिती बदलायला हवी. बिहारमध्ये १७ विद्यापीठे आहेत. परंतु उच्च शिक्षणाच्या बाबतीत तेथे अनेक वर्षांपासूनच्या अडचणी आहेत. कुलपती या नात्याने मी या अडचणी माझ्या परीने सोडविण्याचा प्रयत्न करत आहे.

आर्लेकर यांचा दीनक्रम सकाळी १० वाजता सुरू होतो. आधी ते विद्यापीठांचे कामकाज हाताळतात व नंतर गाठीभेटी सुरू होतात. बिहारचे मुख्यमंत्री, मंत्री सर्वांशी आपले चांगले संबंध आहेत. मी सरकारच्या कामात हस्तक्षेप करायला आलेलो नाही, असे आधीच स्पष्ट केलेले आहे. आर्लेकर म्हणाले की, बिहार राजभवनात १९० कर्मचारी माझ्या दिमतीला आहेत. तेथे मोठी बाग आहे ज्यात ३० ते ३५ प्रकारांचे आंबे आहेत. भागलपूरचा आंबा हा तेथे प्रसिद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

परिस्थिती बदलणार

बिहार हा एकेकाळी शिक्षणाच्यादृष्टीने पुढारलेला प्रदेश! आर्य चाणक्य याच भूमीतील, परंतु आज तेथे शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला आहे. ही परिस्थिती मला बदलायची आहे म्हणून विद्यापीठांच्या सिनेटच्या बैठकांमध्येही मी भाग घेत असतो. आतापर्यंत एकाही राज्यपालाने सिनेट बैठकांमध्ये भाग घेतला नव्हता. या माझ्या कामगिरीमुळे बिहार विधान परिषदेतही माझ्या अभिनंदनाचा ठराव संमत केलेला आहे.'

मासळीची आठवण येते पण.....

गोव्यातील जेवणाची तुम्हाला आठवण येते. काय? असे विचारले असता, आर्लेकर हसले. ते म्हणाले की, माशाची आठवण येते पण भी बिहारमध्ये शाकाहारीच जेवण जेवत असतो. सिमलाला देखील मी शाकाहारीच जेवत होतो. बिहारमध्ये ताटात जे काही शाकाहारी पदार्थ येतात, ते मला पुरेसे असतात. मी गोव्याहून स्वयंपाकी वगैरे राजभवनवर नेलेला नाही. गोव्याच्या जेवणाची आवड कधी तरी निर्माण होते. पण माझे काही अडत नाही.

 

टॅग्स :goaगोवा