शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
4
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
5
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
6
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
7
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
8
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
9
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
10
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
11
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
12
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
13
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
14
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
16
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
17
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
18
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
19
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
20
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा

भाऊसाहेबांवरून नव्या वादाला तोंड; विजय सरदेसाईंच्या विधानाचा मुख्यमंत्र्यांसह ढवळीकर बंधूंकडून समाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2025 13:52 IST

वेंझींचीही कडाडून टीका

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांना गोव्याच्या अस्मितेची अॅलर्जी होती व त्यामुळेच या प्रश्नावर जनमत कौल घेण्याची वेळ आली होती, अशा अर्थाचे विधान गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केल्यानंतर आता राज्यात मोठा वाद निर्माण झालेला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अन्य काही नेत्यांनी काल सरदेसाई यांच्या विधानास आक्षेप घेत टीका केली.

सरदेसाई यांनी हे विधान करताना विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही गोव्याच्या अस्मितेची अॅलर्जी असल्याचा आरोप केला आहे. जनमत कौल दिन सरकारी पातळीवर साजरा करण्याचे आश्वासन विधानसभेत देऊनही सावंत यांनी ते पाळले नाही, अशी टीका सरदेसाई यांनी केली आहे.

दरम्यान, आमदार विजय सरदेसाई यांच्या विधानानंतर मुख्यमंत्र्यांसह मगोपचे नेते मंत्री सुदिन ढवळीकर व दीपक ढवळीकर यांनीही त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे. दरम्यान, राज्यभरातून टीका होऊ लागल्यानंतर आमदार विजय सरदेसाई यांनी काल सायंकाळी पत्रकारांशी बोलताना भाऊसाहेबांबद्दल आपल्या आदर असल्याचे सांगत मुख्यमंत्री सावंत यांचा अहंकार जागा झाल्याची टीका केली. तसेच यावेळी त्यांनी आपचे आमदार वेंझी व्हिएगश यांचाही खरपूस समाचार घेतला.

मी केवळ लोकांना इतिहास सांगितला

मी भाऊसाहेबांचा पूर्ण आदर करतो. खरंतर हा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याच अहंकाराचा मुद्दा आहे. त्यांची तुलना भाऊसाहेबांशी करून त्यांची खुशामत केल्यानंतर त्यांचा अहंकार सुखावला गेला आहे. आपण केवळ ऐतिहासिक सत्य लोकांसमोर आणले आहे, असे स्पष्टीकरण आमदार विजय सरदेसाई यांनी काल सायंकाळी पत्रकारांशी आमदार बोलताना दिले. ज्या घरामधून ओपिनियन पोलचा लढा लढला गेला, त्या घराण्याचा मी वारस आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांना केवळ जॅक सिक्वेरा यांनाच नाकारायचे नाही तर ज्या नेत्यांनी गोव्याचे वेगळे अस्तित्व कायम ठेवले त्या रवींद्र केळेकर, उदय भेंब्रे, शंकर भांडारी, उल्हास बुयांव तसेच अन्य नेत्यांनाही श्रेय द्यायची इच्छा नाही. मात्र, या लोकांनी गोव्याचे अस्तित्व वेगळे ठेवले, यासाठीच प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री होऊ शकले. अन्यथा ते कुठल्या तरी पंचायतीचे सरपंच झाले असते याची जाणीव त्यांनी ठेवावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांकडून निषेध

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, भाऊसाहेब बांदोडकर यांना गोव्याच्या अस्मितेची कधीच अॅलर्जी नव्हती. त्यांना भाऊसाहेबांनी त्यावेळी चूक केली किंवा अस्मितेची अॅलर्जी होती, असे म्हणणे हा निव्वळ खोटारडेपणाच नव्हे, तर गोव्याच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या वारशाचा घोर अपमान आहे. खरी समस्या सरदेसाई यांच्या अहंकाराची आहे. भाऊसाहेबांबद्दल काढलेल्या या उद्गारांचा तसेच गोवाविरोधी वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो.

कुठल्याच मुख्यमंत्र्याची भाऊंशी तुलना नको

मगोपचे ज्येष्ठ नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, सरदेसाईंचा हेतूच मला समजलेला नाही. विलीनीकरणासाठी त्यावेळी सुदिन ढवळीकर वीजमंत्री भाऊसाहेबांवर वरिष्ठ नेत्यांकडून दबाव होता. भाऊसाहेबांना दोष देता येणार नाही. तसेच गोव्याच्या कुठल्याच मुख्यमंत्र्यांची भाऊसाहेबांशी तुलना करता येणार नाही. १९६३ ते १९७३ या काळात भाऊसाहेबांनी राज्याचा सर्वांगीण विकास केला.

भाऊंनी सिक्वेरांना आतून पाठिंबा दिलेला

मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर म्हणाले की, बांदोडकर यांच्या काळातील माजी आमदार रोहिदास नाईक व इतर काही जण हयात आहेत, त्यांच्याकडून सरदेसाई यांनी आधी इतिहास जाणून घ्यावा. भाऊसाहेबांनी त्यावेळी जॅक सिक्वेरा यांना आतून पाठिंबाही दिला होता. सरदेसाई यांना मगोप, मराठी आणि भाऊसाहेबांबद्दल अॅलर्जी असल्यानेच ते अशी विधाने करत आहेत.

वेलिंगकरांकडून धिक्कार

भाऊसाहेब बांदोडकर यांना गोव्याच्या अस्मितेचा तिटकारा होता, असा शोध लावलेल्या विकृतीचा मी तीव्र धिक्कार करतो, असे प्रा. सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, गोव्याची संस्कृती, गोव्याची अस्मिता ही मूलतःच शुद्ध भारतीय आहे आणि जुलमी पोर्तुगीज राजवटीत रक्तबंबाळ करण्यात आलेली हीच अस्मिता दृढमूल करण्यासाठी बांदोडकरांनी सत्तेवर येताच हजारो मराठी शाळा सुरू केल्या.

तेव्हा अस्मिता कुठे गेली?

२०१७ साली भाजपशी मोट बांधून सरकार स्थापनेसाठी त्या पक्षाला पाठिंबा दिला तेव्हा सरदेसाईंची अस्मिता पेंड खायला गेली होती का? हिंमत असेल तर त्यांनी भू- रुपांतरणे बंद करावीत. सरदेसाई हे स्वतःच मुळात भाजपसोबत आहेत. लोकांना दाखवण्यासाठी ते विरोधात भाषणे करतात, सणसणीत टोला आपचे आमदार वेंझी व्हिएगश यांनी लगावला.

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण