शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

भाऊसाहेबांवरून नव्या वादाला तोंड; विजय सरदेसाईंच्या विधानाचा मुख्यमंत्र्यांसह ढवळीकर बंधूंकडून समाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2025 13:52 IST

वेंझींचीही कडाडून टीका

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांना गोव्याच्या अस्मितेची अॅलर्जी होती व त्यामुळेच या प्रश्नावर जनमत कौल घेण्याची वेळ आली होती, अशा अर्थाचे विधान गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केल्यानंतर आता राज्यात मोठा वाद निर्माण झालेला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अन्य काही नेत्यांनी काल सरदेसाई यांच्या विधानास आक्षेप घेत टीका केली.

सरदेसाई यांनी हे विधान करताना विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही गोव्याच्या अस्मितेची अॅलर्जी असल्याचा आरोप केला आहे. जनमत कौल दिन सरकारी पातळीवर साजरा करण्याचे आश्वासन विधानसभेत देऊनही सावंत यांनी ते पाळले नाही, अशी टीका सरदेसाई यांनी केली आहे.

दरम्यान, आमदार विजय सरदेसाई यांच्या विधानानंतर मुख्यमंत्र्यांसह मगोपचे नेते मंत्री सुदिन ढवळीकर व दीपक ढवळीकर यांनीही त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे. दरम्यान, राज्यभरातून टीका होऊ लागल्यानंतर आमदार विजय सरदेसाई यांनी काल सायंकाळी पत्रकारांशी बोलताना भाऊसाहेबांबद्दल आपल्या आदर असल्याचे सांगत मुख्यमंत्री सावंत यांचा अहंकार जागा झाल्याची टीका केली. तसेच यावेळी त्यांनी आपचे आमदार वेंझी व्हिएगश यांचाही खरपूस समाचार घेतला.

मी केवळ लोकांना इतिहास सांगितला

मी भाऊसाहेबांचा पूर्ण आदर करतो. खरंतर हा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याच अहंकाराचा मुद्दा आहे. त्यांची तुलना भाऊसाहेबांशी करून त्यांची खुशामत केल्यानंतर त्यांचा अहंकार सुखावला गेला आहे. आपण केवळ ऐतिहासिक सत्य लोकांसमोर आणले आहे, असे स्पष्टीकरण आमदार विजय सरदेसाई यांनी काल सायंकाळी पत्रकारांशी आमदार बोलताना दिले. ज्या घरामधून ओपिनियन पोलचा लढा लढला गेला, त्या घराण्याचा मी वारस आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांना केवळ जॅक सिक्वेरा यांनाच नाकारायचे नाही तर ज्या नेत्यांनी गोव्याचे वेगळे अस्तित्व कायम ठेवले त्या रवींद्र केळेकर, उदय भेंब्रे, शंकर भांडारी, उल्हास बुयांव तसेच अन्य नेत्यांनाही श्रेय द्यायची इच्छा नाही. मात्र, या लोकांनी गोव्याचे अस्तित्व वेगळे ठेवले, यासाठीच प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री होऊ शकले. अन्यथा ते कुठल्या तरी पंचायतीचे सरपंच झाले असते याची जाणीव त्यांनी ठेवावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांकडून निषेध

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, भाऊसाहेब बांदोडकर यांना गोव्याच्या अस्मितेची कधीच अॅलर्जी नव्हती. त्यांना भाऊसाहेबांनी त्यावेळी चूक केली किंवा अस्मितेची अॅलर्जी होती, असे म्हणणे हा निव्वळ खोटारडेपणाच नव्हे, तर गोव्याच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या वारशाचा घोर अपमान आहे. खरी समस्या सरदेसाई यांच्या अहंकाराची आहे. भाऊसाहेबांबद्दल काढलेल्या या उद्गारांचा तसेच गोवाविरोधी वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो.

कुठल्याच मुख्यमंत्र्याची भाऊंशी तुलना नको

मगोपचे ज्येष्ठ नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, सरदेसाईंचा हेतूच मला समजलेला नाही. विलीनीकरणासाठी त्यावेळी सुदिन ढवळीकर वीजमंत्री भाऊसाहेबांवर वरिष्ठ नेत्यांकडून दबाव होता. भाऊसाहेबांना दोष देता येणार नाही. तसेच गोव्याच्या कुठल्याच मुख्यमंत्र्यांची भाऊसाहेबांशी तुलना करता येणार नाही. १९६३ ते १९७३ या काळात भाऊसाहेबांनी राज्याचा सर्वांगीण विकास केला.

भाऊंनी सिक्वेरांना आतून पाठिंबा दिलेला

मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर म्हणाले की, बांदोडकर यांच्या काळातील माजी आमदार रोहिदास नाईक व इतर काही जण हयात आहेत, त्यांच्याकडून सरदेसाई यांनी आधी इतिहास जाणून घ्यावा. भाऊसाहेबांनी त्यावेळी जॅक सिक्वेरा यांना आतून पाठिंबाही दिला होता. सरदेसाई यांना मगोप, मराठी आणि भाऊसाहेबांबद्दल अॅलर्जी असल्यानेच ते अशी विधाने करत आहेत.

वेलिंगकरांकडून धिक्कार

भाऊसाहेब बांदोडकर यांना गोव्याच्या अस्मितेचा तिटकारा होता, असा शोध लावलेल्या विकृतीचा मी तीव्र धिक्कार करतो, असे प्रा. सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, गोव्याची संस्कृती, गोव्याची अस्मिता ही मूलतःच शुद्ध भारतीय आहे आणि जुलमी पोर्तुगीज राजवटीत रक्तबंबाळ करण्यात आलेली हीच अस्मिता दृढमूल करण्यासाठी बांदोडकरांनी सत्तेवर येताच हजारो मराठी शाळा सुरू केल्या.

तेव्हा अस्मिता कुठे गेली?

२०१७ साली भाजपशी मोट बांधून सरकार स्थापनेसाठी त्या पक्षाला पाठिंबा दिला तेव्हा सरदेसाईंची अस्मिता पेंड खायला गेली होती का? हिंमत असेल तर त्यांनी भू- रुपांतरणे बंद करावीत. सरदेसाई हे स्वतःच मुळात भाजपसोबत आहेत. लोकांना दाखवण्यासाठी ते विरोधात भाषणे करतात, सणसणीत टोला आपचे आमदार वेंझी व्हिएगश यांनी लगावला.

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण