शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

ग्राहक हक्कांसाठी भरारी पथके नेमणार; धान्याची जबाबदारी दुकानदारांची: रवी नाईक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 10:53 IST

राज्य ग्राहक संवर्धन मंडळाची पहिली बैठक नुकतीच मंत्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: धान्य कोटा सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी यापुढे रेशन दुकानदारांची राहील. ग्राहक हक्क संवर्धनासाठी लवकरच भरारी पथके तसेच ग्राहकांची गा-हाणी ऐकण्यासाठी उपसमिती स्थापन केली जाईल, असे नागरी पुरवठामंत्री रवी नाईक यांनी काल स्पष्ट केले.

राज्य ग्राहक संवर्धन मंडळाची पहिली बैठक नुकतीच मंत्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नागरी पुरवठा खात्याचे सचिव आयएएस अधिकारी संजित रॉड्रिग्स, खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर, ग्राहक चळवळीतील संघटना 'गोवा कॅन'चे रोलंड मार्टिन्स व इतर याप्रसंगी उपस्थित होते.

रोलंड मार्टिन्स यांनी पत्रकारांना अधिक माहिती देताना सांगितले, लोकांना ग्राहक न्यायालयांमध्ये खटला सादर करताना ई-फायलिंगव्दारे सादर करावा लागतो. त्यात अडचणी येतात. त्यामुळे आता ई-फायलिंग कसे करावे, याबाबत प्रशिक्षण दिले जाईल. ग्राहक न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही नवीन प्रकरणे कशी हाताळावीत याचे प्रशिक्षण देण्यात येईल. मोटर वाहन कायदा, अन्नसुरक्षा कायदा, ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड कायदा या कायद्यांमध्ये दुरुस्त्या केलेल्या आहेत. तसेच ग्राहक हक्क संरक्षण कायदा हा नवा आला आहे. या पाचही कायद्यांच्या बाबतीत जनजागृती केली जाईल.

आता पर्यटकांनाही तक्रार करता येणार

८ सप्टेंबर रोजी ग्राहक साक्षरता दिन पाळला जावा, अशी विनंती करण्यात आली. भरारी पथकांच्या बाबतीत रोलंड म्हणाले, अनेकदा पर्यटकांचीही फसवणूक होते. तक्रार कुठे करणार म्हणून ते गप्प बसतात. परंतु भरारी पथके स्थापन झाल्यानंतर पर्यटकही तक्रारी करु शकतील.

 

टॅग्स :goaगोवा