शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

सर्वाेत्तम शिक्षण हाच पर्याय

By admin | Updated: November 3, 2014 01:16 IST

मनोहर पर्रीकर : ‘आनंददायी बालशिक्षण’ अधिवेशनाचा समारोप

साखळी : आपल्या पुढील पिढीला जे उत्तम आहे, ज्यातून स्वत:बरोबरच समाजाचा विकास साधता येतो, अशी साधने भेट देण्याचे कर्तव्य पार पाडायचे आहे. त्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम आहे़ त्यामुळे बालवयात मुलांना देण्यात येणारे शिक्षण चांगल्या पद्धतीने देणे गरजेचे आहे़ पालकांनीही आपल्या मर्जीनुसार मुलांच्या डोक्यावर शिक्षणाचे ओझे देऊ नये, त्यांच्या आवडी-निवडीचा विचार करावा, असे आवाहन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले़ गोमंतक बालशिक्षण परिषद, महाराष्ट्र बालशिक्षण परिषद, राजभाषा संचालनालय आणि रवींद्र भवन साखळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आनंददायी बालशिक्षण’ अधिवेशनाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते़ व्यासपीठावर उपसभापती अनंत शेट, साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत, राजभाषा संचालनालयाचे संचालक डॉ. प्रकाश वझरीकर, गोमंतक बालशिक्षण परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा दीक्षित, महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या अध्यक्षा अलका बियाणी, रमेश पानसे, रामचंद्र गर्दे आणि मनोज सावईकर उपस्थित होते. या वेळी, उपसभापती अनंत शेट म्हणाले की, बालशिक्षण हे शास्त्रीय पद्धतीने होणे गरजेचे आहे. परिणामकारकरित्या शिकविलेल्या शिक्षणाची फलश्रुती प्रत्येक विद्यार्थ्याला जीवनभर प्राप्त होत असते. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, पालक हे पाल्याच्या शिक्षणाबरोबर आपल्या मनातील इच्छा पल्लवित करण्याचा प्रयत्न करतात. तसे न करता मुलाच्या आवडीप्रमाणे त्याला शिक्षण द्यायला हवे़ त्याचप्रमाणे तीच आपली कायम ठेव आहे, हे मानून त्यातच गुंतवणूक केल्यास या ठेवीचा फायदा वृद्धापकाळात मिळेल़ कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्याध्यक्ष रामचंद्र गर्दे यांनी स्वागत केले. सुरेखा दीक्षित यांनी दोन्ही परिषदेचा अहवाल सादर केला. या वेळी पूनम बुर्ये यांनी आपले अधिवेशन संबंधीचे मनोगत व्यक्त केले. रविवारच्या पहिल्या सत्रात अलका बियाणी यांनी निसर्गातील शिक्षण मुलांच्या मनातील भीती घालवून जिज्ञासा जागृत करते. विविध अनुभवांतून त्याचा आत्मविश्वास बळावतो. विविध कृतींतून अलगदपणे मुले शाळांच्या समीप जातात. खेडोपाड्यातील शाळांबरोबरच शहरातील विद्यालयांनीही निसर्गसानिध्यात शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे सांगितले़ दुसऱ्या ‘अभिव्यक्तीचा आनंद’ या सत्रात केदार नाईक म्हणाले की, कला हा नैसर्गिक अविष्कार आहे़ मुले प्रतिभाशक्तीतून कलेची झेप घेत असतात. मात्र, ज्या वातावरणात मुले विकसित होत असतात त्याच वातावरणातील मुलांचे कल्पक आविष्कार समोर येतात. मुलांत ठासून भरलेल्या प्रतिभाशक्तीला वाट करून देण्याचे काम पालकांनी केले पाहीजे. ‘माझी शाळा’ या तिसऱ्या सत्रात दृकश्राव्य फितीच्या आधारे विविध शाळांतील शिकवणी मुलांच्या आवडीनिवडी निसर्गाकडे असलेली त्यांची ओढी यावर सविस्तर माहिती दाखविण्यात आली. ‘खुले अधिवेशन’ या चौथ्या सत्रात शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे, अलका बियाणी, सुरेखा दीक्षित यांनी सहभाग घेतला, तर या सत्रात संध्या च्यारी, देशपांडे वैजयंती देवलापुरे, रामचंद्र देशमुख, अनुराधा गरुड, विनिता दंडारी, ज्योती जंजाळकर, कुष्टा मळीक, मोहन साखळकर, आदींनी बालशिक्षणविषयी आपल्या मनातील प्रश्न विचारून उत्तरे मिळविले. कार्याक्रमाचे सूत्रसंचालन गौरी गर्दे यांनी केले, तर आभार मनोज सावईकर यांनी मानले. (प्रतिनिधी)