शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अनर्थ टळला! उड्डाण घेण्यापूर्वी इंजिनातून धूर आल्यानं पायलटनं विमान केले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2022 22:51 IST

१८७ प्रवाशांना घेऊन मुंबईला जाण्यासाठी रवाना होणार असलेले विमान थांबवण्यात आले

वास्को: मंगळवारी दुपारी दाबोळी विमानतळावरून मुंबईला जाण्यासाठी उड्डाण घेण्याकरिता १८७ प्रवाशांना घेऊन ‘इंडिगो एअरलाईन्स’ चे विमान ‘पेरलर टॅक्सी बे’ वरून धावपट्टीवर येण्याकरिता वैमानिकाने विमान चालू केले असता विमानाच्या उजव्या इंजिनात स्पार्क होऊन धूर येण्याची घटना घडली.

मुंबईला जाण्यासाठी उड्डाणाची तयारी करित असतानाच विमानाच्या उजव्या इंजिनात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याचे वैमानिकाला समजताच त्यांनी अनर्थ टाळण्यासाठी त्वरित विमान बंद केले. ही घटना घडली तेंव्हा मुंबईला जाण्यासाठी त्या विमानात १८७ प्रवासी असून त्यात चार चिमुकल्यांचा समावेश होता. वेळेतच वैमानिकाला विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे समजल्याने त्यांनी विमान बंद केल्याने सुदैवाने येथे होणारा अनर्थ टळला.

दाबोळी विमानतळाचे संचालक धनंजय राव यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी १.२६ वाजता ही घटना घडली. इंडीगो एअरलाईन्सच्या ‘६इ ६०९७’ विमानात १८७ प्रवाशी बसल्यानंतर त्या विमानाने मुंबईला जाण्यासाठी उड्डाण घेण्याच्या तयारीला सुरवात केली. वैमानिकाने मुंबईला जाण्यासाठी उड्डाण घेण्याकरिता विमान ‘पेरलर टॅक्सी बे’ वरून धावपट्टीवर आणण्यासाठी विमान चालू केले असता अचानक विमानाच्या उजव्या इंजिनात ‘स्पार्क’ (आगीची कीट्टी पेटली) होऊन इंजिनातून धूर आला. विमानाच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाला समजताच त्यांनी त्वरित विमान बंद केले. मुंबईला रवाना होणार असलेल्या त्या विमानाच्या इंजिनात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याचे नौदलाच्या बचाव पथकाला समजताच त्यांनी त्वरित विमान उभे असलेल्या ठिकाणी धाव घेतली. तसेच त्या विमानात असलेल्या प्रवाशी आणि विमानाला धोका नसल्याची खात्री त्यांनी करून घेतली. त्यानंतर ते विमान ‘बे ९’ वर नेऊन नंतर विमानात असलेल्या सर्व प्रवाशांना विमानातून उतरविण्यात आले.

सुदैवाने याघटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसून विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याचे वैमानिकाला वेळेतच समजल्याने मोठा अनर्थ टळला. ‘इंडीगो एअरलाइन्स’ च्या त्या विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने त्या विमानातून मुंबईला जाणार असलेल्या १८७ प्रवाशांना नंतर दुसºया विमानातून मुंबईला पाठवण्यात आल्याची माहीती सूत्रांनी दिली. तांत्रिक बिघाड निर्माण झालेले ते विमान विमानतळाच्या ‘बे ९’ वर उभे केले असून त्या विमानाच्या कंपनीचे संबंधित तांत्रिक येऊन विमानाची दुरूस्ती केल्यानंतर ते येथून रवाना होणार असल्याची माहीती दाबोळी विमानतळाचे संचालक धनंजय राव यांच्याकडून प्राप्त झाली.