शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कुक्कुटपालन व्यवसायातून स्वयंपूर्ण बना: मुख्यमंत्री सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2024 13:24 IST

चिकन, अंड्यांना राज्यात मोठी मागणी; युवकांनी पुढे येण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : राज्यात मोठ्या प्रमाणात चिकन व अंड्यांना मागणी आहे. कुक्कुटपालन व्यवसायात गोव्यातील लोक कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे प्रतिदिन कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय अन्य राज्यातील लोकांना द्यावा लागत आहे. गोव्यातील तरुणांनी सरकारी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा कुक्कुटपालन व्यवसाय करावा. गोव्यातील किमान ४०० ते ५०० युवक या व्यवसायासाठी पुढे आले तर गोव्यातील चिकन व अंड्यांसाठी अन्य राज्यावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. गोवा स्वयंपूर्ण करण्यासाठी मदत होईल. या व्यवसायात युवकांनी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

कुक्कुटपालन क्षेत्रात नवीन उद्योजक तयार व्हावेत, यासाठी अखिल गोवा पोल्ट्री फार्म अँड ट्रेडर्सेशन व पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा खात्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते वेबसाइटचे अनावरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा खात्याचे संचालक डॉ. नितीन नाईक आणि औषध संचालनालयाचे संचालिका श्वेता देसाई, अखिल गोवा पोल्ट्री फार्म व ट्रेडर असोसिएशनचे अध्यक्ष जयकृष्ण नाईक, सचिन दामोदर बावचीकर, खजिनदार दीपक देसाई, जनार्दन नाईक, श्रद्धा नाईक, वि. के. मनोहर ओन्ली बरेंटो, प्रिस्को सिक्वेरा, कन्हैया लाल आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जयकृष्णा नाईक यांनी सांगितले की, हॉटेल व्यवसायाबरोबरच अन्य लोकांनाही मोठ्या प्रमाणात अंडी व चिकनसाठी मागणी आहे. या व्यवसायामध्ये युवक मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या सक्षम बनू शकतात. मागील काही वर्षांपूर्वी गोव्यात कुक्कुटपालन व्यवसायात सुमारे ४०० पेक्षा जास्त शेतकरी होते. मात्र सध्या २० ते २५ शेतकरी शिल्लक आहेत. विविध कारणांमुळे कुक्कुटपालन व्यवसायात शेतकऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागले. सध्या सरकारच्या सहकार्याने या व्यवसायात मोठ्या प्रमाणात प्रगती करण्यास वाव आहे. त्यासाठी युवकांनी आधुनिक पद्धतीने व्यवसाय करून स्वावलंबी व्हावे.

सरकार पाठिंबा देणार... 

हा व्यवसाय करण्यासाठी जास्त कष्ट घेण्याची आवश्यकता नाही. एकदा व्यवसाय बसला की सुरळीतपणे सुरू राहतो. हा व्यवसाय सुरळीतपणे चालवण्यासाठी असोसिएशनने कोंबड्यांसाठी लागत असलेले खाद्य स्वतः आणावे, तसेच चिकनचे रेट तसेच अन्य गोष्टींकडे लक्ष द्यावे. सरकार या व्यवसायासाठी जी काही मदत लागेल. त्याला नेहमीच पाठिंबा देणार, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारPramod Sawantप्रमोद सावंत